शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

१२५ शिक्षकांना मिळणार नियुक्तीपत्रे; तीन वर्षे चालली भरती प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2024 13:11 IST

या शिक्षक भरतीसाठी तब्बल ३ वर्षे प्रक्रिया चालली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : प्रदीर्घ भरती प्रक्रियेतून निवडलेल्या १२५ शिक्षकांना या आठवड्यात नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. निवडणूक आचारसंहिता जारी होण्यापूर्वी नियुक्तीपत्रे न दिल्यास प्रक्रिया पुन्हा रखडण्याची तसेच विद्यार्थ्यांना शिक्षक मिळण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता ओळखून हा निर्णय घेण्यात आला आहे.

या शिक्षक भरतीसाठी तब्बल ३ वर्षे प्रक्रिया चालली होती. तीनवेळा निवडणूक आचारसंहिता लागल्यामुळे त्यात खंडही पडला होता. त्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर करून शिक्षण खात्याने गुणवत्ता यादीनुसार आणि राखिवता निकषांनुसार यशस्वी उमेदवारांना इच्छापत्रेही पाठविली होती. तसेच निवडण्यात आलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणीही झाली आहे. परंतु त्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे नियुक्तीपत्रे देण्यात आली नव्हती. आर्थिक दृष्ट्या मागास गटातील राखिवतेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे पुढील प्रक्रिया रखडली होती.

दरम्यान, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले की, निवडण्यात आलेल्या उमेदवारांना निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. नियुक्तीनंतर त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाTeacherशिक्षक