शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

१२५ शिक्षकांना मिळणार नियुक्तीपत्रे; तीन वर्षे चालली भरती प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2024 13:11 IST

या शिक्षक भरतीसाठी तब्बल ३ वर्षे प्रक्रिया चालली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : प्रदीर्घ भरती प्रक्रियेतून निवडलेल्या १२५ शिक्षकांना या आठवड्यात नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. निवडणूक आचारसंहिता जारी होण्यापूर्वी नियुक्तीपत्रे न दिल्यास प्रक्रिया पुन्हा रखडण्याची तसेच विद्यार्थ्यांना शिक्षक मिळण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता ओळखून हा निर्णय घेण्यात आला आहे.

या शिक्षक भरतीसाठी तब्बल ३ वर्षे प्रक्रिया चालली होती. तीनवेळा निवडणूक आचारसंहिता लागल्यामुळे त्यात खंडही पडला होता. त्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर करून शिक्षण खात्याने गुणवत्ता यादीनुसार आणि राखिवता निकषांनुसार यशस्वी उमेदवारांना इच्छापत्रेही पाठविली होती. तसेच निवडण्यात आलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणीही झाली आहे. परंतु त्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे नियुक्तीपत्रे देण्यात आली नव्हती. आर्थिक दृष्ट्या मागास गटातील राखिवतेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे पुढील प्रक्रिया रखडली होती.

दरम्यान, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले की, निवडण्यात आलेल्या उमेदवारांना निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. नियुक्तीनंतर त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाTeacherशिक्षक