शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

गोव्यातील १२ हजार विद्यार्थी अद्याप रेनकोट, गणवेशापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 13:30 IST

पालकांकडून नाराजी व्यक्त

पणजी : गोव्यात प्राथमिक शाळांमधील तब्बल १२ हजार विद्यार्थ्यांना जून उलटला तरी अद्याप रेनकोट आणि गणवेश मिळालेले नाहीत. यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मान्सून सुरु होऊन पंधरा दिवस झाले. गरीब, गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना भिजतच शाळेत जावे लागते. प्राप्त माहितीनुसार खादी ग्रामोद्योग मंडळाकडून रेनकोट व गणवेश घेतले जातात. लोकसभा तसेच विधानसभेच्या चार मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीनिमित्त २६ मेपर्यंत आचारसंहिता लागू होती त्यामुळे त्याआधीच प्रक्रिया सुरु केलेली होती. असे असतानाही विद्यार्थ्यांना या वस्तू मिळू शकलेल्या नाहीत. सरकारी व अनुदानित प्राथमिक शाळांमधील इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना रेनकोट व गणवेश दिले जातात. दर दोन वर्षांनी इयत्ता पहिली व तिसरीच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतो. त्यासाठी खात्याने भरीव आर्थिक तरतूदही केलेली असते. परंतु यंदा या योजनेत किंचित बदल करण्याच्या हालचाली चालल्याची माहिती मिळते. वह्या आणि पाठ्यपुस्तके मात्र मिळालेली आहेत. विद्यार्थ्यांना रेनकोट, गणवेश न मिळाल्याचा विषय आगामी विधानसभा अधिवेशनात उपस्थित करण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी कंबर कसली आहे. शिक्षण खात्याचे संचालक नागराज होन्नेकेरी यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता त्यांनी मोबाइल फोन कॉलला उत्तर दिले नाही.  

टॅग्स :Schoolशाळा