शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात 1.2 लाख लोक बेरोजगार, कामगारमंत्र्यांकडून विधानसभेत माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 19:41 IST

पणजी: सरकारी दाव्यानुसार गोव्यात 1.2क् लाख लोक बेरोजगार असल्याची नोंद आहे. विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना कामगारमंत्री रोहन खंवटे यांनी ही माहिती विधानसभेत दिली. 

पणजी: सरकारी दाव्यानुसार गोव्यात 1.2क् लाख लोक बेरोजगार असल्याची नोंद आहे. विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना कामगारमंत्री रोहन खंवटे यांनी ही माहिती विधानसभेत दिली. बेरोजगारीची समस्या ही इतर राज्यांप्रमाणो गोव्यालाही भेडसावत आहे. बेरोजगारांना रोजगार भत्ता देण्यासंबंधी भाजपने मागील निवडणुकीपूर्वी आश्वासने देण्यात आली होती. त्या अनुशंगाने कवळेकर यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडताना एकूण गोव्यातील बेरोजगारांची संख्या विचारली होती. मंत्री खवंटे यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार राज्यात एकूण 1.2क् लाख लोकांना रोजगार नाही. त्यात 63818 पुरूष तर 57113 महिला आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे 76470 हे उत्तर गोव्यात तर दक्षीण गोव्यात 44461 लोकांचा समावेश आहे. सरकारने मिळविलेली माहिती ही राज्यातील दोन्ही रोजगार विनिमय केंद्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे. या केंद्रातून मिळालेली माहिती ही तंतोतंत खरी असण्याची शक्यता फार कमीच असते. कारण बेरोजगारांची संख्या ठरविताना केंद्राकडून जे निकष वापरले जातात त्यातून राज्यातील वस्तुनिष्ट स्थिती स्पष्ट होणो कठीणच असते.  एखाद्या युवकाला विनिमय केंद्रातून नोकरीसाठीच्या मुलाखतीसाठी कॉल लेटर पाठविल्यानंतर त्या युवकाला ती नोकरी मिळाली तर रोजगार केंद्रातील प्रतीक्षा यादीतून त्याचे नाव वगळले जाते. तसेच केंद्रात ज्या युवक युवतींनी नावे नोंदविली असतात त्यांना ठरावीक मुदतीनंतर त्यांचे नूतनीकरण करावे लागते. नूतनीकरण न केल्यास त्यांना रोजगार मिळाला असे गृहीत धरून  नूतनीकरण न केलेल्यांची नावे गाळली जातात. जे कुणी उमेदवार खाजगी कंपन्यात किंवा इतरत्र नोक:या करतात त्यांची नावे ही रोजगार केंद्रातील प्रतिक्षा यादीतून वगळली जातातच असेही नाही. त्यामुळे केंद्राकडे असलेली माहिती ही 1क्क् टक्के वस्तुनिष्ठ असण्याची शक्यता कमीच असते. जे युवक युवती रोजगाराविना आहेत त्यांना रोजगार भत्ता वगैरे दिला जातो का असा प्रश्नही कवळेकर यांनी केला होता. या प्रश्नाला मंत्र्याकडून ‘नाही’ असे उत्तर देण्यात आले आहे.