शहरं
Join us  
Trending Stories
1
Imtiaz Jaleel Attack: एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले
2
‎६५ लाखांचे बक्षीस असलेले २६ जहाल माओवादी शरण; छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या मोहिमेला मोठे यश
3
सोन्यात गुंतवणूक न करता मिळवू शकता सोन्यासारखा रिटर्न; पाहा म्युच्युअल फंडाद्वारे कशी करू शकता गुंतवणूक?
4
अंबरनाथमध्ये भाजपशी युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना दणका; पक्षाने केलं निलंबित
5
जगाचा रिमोट कंट्रोल 'तैवान'च्या हाती! सेमीकंडक्टर स्पर्धेत चीन का पडला मागे? भारत नेमका कुठे?
6
मुंबईत ७५ वर्ष जुन्या हेरिटेज बंगल्याची २५० कोटींना होणार विक्री; कोणाची आहे मालकी आणि काय आहे खास?
7
Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीची विश्वविक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा पहिला कॅप्टन
8
Pune Crime: मुलीच्या इन्स्टाग्रामवरून मेसेज, 'तू कात्रज घाटात ये'; अमनची दगड, कोयत्याने हत्या, मृतदेहही पुरला
9
Video: अमेरिकेकडून रशियन तेलवाहू टँकरचा पाठलाग; मॉस्कोने सुरक्षेसाठी पाठवली नेव्ही, आता पुढे...
10
आकाराने गोव्यापेक्षाही लहान, नांदतात सगळेच श्रीमंत! 'हा' छोटासा देश कसा बनला कुबेराचा खजिना?
11
कुटुंब रंगलंय निवडणूक प्रचारात; शिंदेसेनेच्या उमेदवारांची घरच्यांसाठीच तिकीट घेण्यात आघाडी
12
मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले
13
Ritual: सावधान! हातातील पूजेचा धागा 'इतक्या' दिवसांनंतर बनतो नकारात्मक ऊर्जेचं कारण!
14
आरक्षण मिळाल्यानंतर पुन्हा जनरल कॅटेगरीवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
एक्स गर्लफ्रेंडशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी रचला कट; अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा
16
वैभव सूर्यवंशीचा धमाक्यावर धमाका! षटकार-चौकारांची 'बरसात' करत ठोकली सलग दुसरी फिफ्टी
17
Dhule: शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?
18
Nashik Municipal Election 2026 : शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष
19
भयंकर! सुंदर दिसण्याची ओढ बेतली जीवावर; कॉस्मेटिक सर्जरीनंतर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
20
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड न्यूज; DA-DR मध्ये होणार बंपर वाढ?
Daily Top 2Weekly Top 5

जळालेली डीपी व वाकलेल्या विद्युत खांबांची अजुनही दुरुस्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 05:00 IST

नियमित विद्युत पुरवठा सुरू असताना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यामुळे तेथील  प्रभाकर गव्हारे यांच्या घराजवळ असलेली डीपी पूर्णतः जळाली. काही दिवसांतच वसंत सुरजागडे यांच्या घराजवळील विद्युत खांब वाकला. त्यामुळे विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या. ही घटना घडली असता त्यावेळी गावातील नागरिक कुणीच खांबाजवळ नव्हते. नाही तर जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन अनुचित प्रकार घडला असता.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी :  तालुक्याच्या ग्रामपंचायत     कुनघाडा रै. अंतर्गत येणाऱ्या उमरेड टोला येथे गेल्या पंधरा दिवसांपासून विद्युत डीपी जळून, विद्युत खांब वाकल्याने विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या आहेत.. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे दुसऱ्या डीपीवरून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला असला तरी, वेळोवेळी पुरवठा खंडित होत असल्यामुळे विजेचा लपंडाव अद्यापही कायमच आहे. मात्र, याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. कुनघाडा रै. ग्रामपंचायतअंतर्गत वॉर्ड ४ मधील  उमरेड टोला हे छोटेसे  गाव बांध तलावाच्या काठावर वसले आहे. गावाची लोकसंख्या जवळपास दीडशे ते दोनशे आहे. गावात विजेची समस्या लक्षात घेऊन, गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत लाईन टाकण्यात आली आहे. गावात विद्युत पुरवठा होण्यासाठी  विद्युत डीपी लावून मुख्य ठिकाणी  विद्युत खांब गाडण्यात  आले आहेत. नियमित विद्युत पुरवठा सुरू असताना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यामुळे तेथील  प्रभाकर गव्हारे यांच्या घराजवळ असलेली डीपी पूर्णतः जळाली. काही दिवसांतच वसंत सुरजागडे यांच्या घराजवळील विद्युत खांब वाकला. त्यामुळे विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या. ही घटना घडली असता त्यावेळी गावातील नागरिक कुणीच खांबाजवळ नव्हते. नाही तर जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन अनुचित प्रकार घडला असता. या घटनेस पंधरा दिवस उलटले.   डीपी जोडून विद्युत खांब पूर्ववत कण्यासंदर्भात नागरिकांनी वेळोवेळी महावितरण कंपनीच्या तळोधी उपकेंद्राला कळविले आहे. मात्र, महावितरणने याकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन विद्युत डीपी व विद्युत खांब  पूर्ववत करून नियमित विद्युत पुरवठा सुरू करावा,  अशी मागणी उमरेडवासीयांनी केली आहे. पाठपुरावा करूनही महावितरणच्या कर्मचारी दुर्गम भागात वीज सुरळीत करण्यासाठी लवकर पाेहाेचत नाही. परिणामी वादळाने वीज पुरवठा खंडित झाल्यास दाेन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लगते. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत हाेत असते.

महावितरण कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रकार घडल्याचा आराेपउमरेट टोला हे गाव कुनघाडा रै. ग्रामपंचायतअंतर्गत वाॅर्ड ४ मधील एक भाग आहे, गावात विजेची समस्या लक्षात घेऊन विजेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तेथील डीपी जळून, विद्युत खांब वाकले, तसेच विद्युत तारा खाली कोसळल्या. त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. हा प्रकार महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे घडला असून, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे यांनी केली आहे. सध्या दुसऱ्या डीपीवरून गावात विद्युत पुरवठा सुरू आहे. मात्र, हा विद्युत पुरवठा सायंकाळच्या वेळी वेळोवेळी खंडित होत आहे. तत्काळ डीपी लावून विद्युत पुरवठा सुरू करावा तसेच वाकलेले खांब सरळ करून वीज तारा जोडण्यात याव्यात, अशी मागणी अनिल कोठारे यांनी केली आहे.

 

टॅग्स :electricityवीज