शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

राज्यभरातील तरुणाई अवतरली गडचिरोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर राहतील. प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही. भुसारी यांचीही यावेळी उपस्थित राहील.

ठळक मुद्देआजपासून आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव : ‘इंद्रधनुष्य’मधून उधळणार विविध कलारंग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठात आयोजित राज्यस्तरिय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’साठी राज्यभरातील विविध विद्यापीठांचे विद्यार्थी, प्राध्यापक गडचिरोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा परिसर तरुणाईने फुलून गेला आहे. सोमवार दि.२ रोजी सकाळी ११ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर राहतील. प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही. भुसारी यांचीही यावेळी उपस्थित राहील.रविवारी सकाळपासून विविध विद्यापीठांच्या चमू आपापल्या वाहनांनी गडचिरोलीत दाखल होत होत्या. काही चमू तर शनिवारी रात्रीच गडचिरोलीत पोहोचल्या आहेत. त्या सर्वांची राहण्याची व्यवस्था शहरातील शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे वसतिगृह, कृषी महाविद्यालय, महिला आर्थिक विकास मंडळाचे सभागृह, तसेच येणाऱ्या अतिथींची व्यवस्था शासकीय विश्रामगृह आणि हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे.प्रथमच राज्यस्तरिय महोत्सव ‘इंद्रधनुष्य’चे आयोजन करण्याचा बहुमान यावर्षी गोंडवाना विद्यापीठाला मिळाला आहे. पाच प्रकारच्या कलाप्रकारातील २६ स्पर्धांमध्ये हे विद्यार्थी कलावंत कलेचे सादरीकरण करणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्दी असणाºया गडचिरोलीकर प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.दि.६ ला बक्षीस वितरण व महोत्सवाचा समारोप होणार आहे. प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते विजेत्या चमूंना बक्षीस वितरण होणार आहे.‘गडचिरोली जसे वाटले होते त्यापेक्षा चांगले’राज्यातील विविध २० विद्यापीठांचे संघ या सांस्कृतिक युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी दाखल होत आहेत. त्यातील बहुतांश युवक-युवती प्रथमच गडचिरोलीत आले आहेत. नक्षलग्रस्त, मागास गडचिरोलीत जाताना त्यांच्या मनात विविध कल्पना होत्या. आपली योग्य व्यवस्था होणार का, याबद्दलही काहींच्या मनात शंका होती. मात्र गडचिरोलीत आल्यानंतर येथील व्यवस्था, योग्य आदरातिथ्य पाहून समाधान वाटल्याची प्रतिक्रिया काही चमुंनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केली. गडचिरोलीबद्दल जसा विचार केला होता त्यापेक्षा चांगले असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :universityविद्यापीठ