शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील तरुणाई अवतरली गडचिरोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर राहतील. प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही. भुसारी यांचीही यावेळी उपस्थित राहील.

ठळक मुद्देआजपासून आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव : ‘इंद्रधनुष्य’मधून उधळणार विविध कलारंग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठात आयोजित राज्यस्तरिय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’साठी राज्यभरातील विविध विद्यापीठांचे विद्यार्थी, प्राध्यापक गडचिरोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा परिसर तरुणाईने फुलून गेला आहे. सोमवार दि.२ रोजी सकाळी ११ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर राहतील. प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही. भुसारी यांचीही यावेळी उपस्थित राहील.रविवारी सकाळपासून विविध विद्यापीठांच्या चमू आपापल्या वाहनांनी गडचिरोलीत दाखल होत होत्या. काही चमू तर शनिवारी रात्रीच गडचिरोलीत पोहोचल्या आहेत. त्या सर्वांची राहण्याची व्यवस्था शहरातील शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे वसतिगृह, कृषी महाविद्यालय, महिला आर्थिक विकास मंडळाचे सभागृह, तसेच येणाऱ्या अतिथींची व्यवस्था शासकीय विश्रामगृह आणि हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे.प्रथमच राज्यस्तरिय महोत्सव ‘इंद्रधनुष्य’चे आयोजन करण्याचा बहुमान यावर्षी गोंडवाना विद्यापीठाला मिळाला आहे. पाच प्रकारच्या कलाप्रकारातील २६ स्पर्धांमध्ये हे विद्यार्थी कलावंत कलेचे सादरीकरण करणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्दी असणाºया गडचिरोलीकर प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.दि.६ ला बक्षीस वितरण व महोत्सवाचा समारोप होणार आहे. प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते विजेत्या चमूंना बक्षीस वितरण होणार आहे.‘गडचिरोली जसे वाटले होते त्यापेक्षा चांगले’राज्यातील विविध २० विद्यापीठांचे संघ या सांस्कृतिक युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी दाखल होत आहेत. त्यातील बहुतांश युवक-युवती प्रथमच गडचिरोलीत आले आहेत. नक्षलग्रस्त, मागास गडचिरोलीत जाताना त्यांच्या मनात विविध कल्पना होत्या. आपली योग्य व्यवस्था होणार का, याबद्दलही काहींच्या मनात शंका होती. मात्र गडचिरोलीत आल्यानंतर येथील व्यवस्था, योग्य आदरातिथ्य पाहून समाधान वाटल्याची प्रतिक्रिया काही चमुंनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केली. गडचिरोलीबद्दल जसा विचार केला होता त्यापेक्षा चांगले असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :universityविद्यापीठ