शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईने रॅलीतून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

गोंडवाना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन. व्ही. कल्याणकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्यासह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. सदर रॅली एमआयडीसी मार्गावरील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हा न्यायालय ते चंद्रपूर मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते टी पार्इंट अशी फिरविण्यात आली.

ठळक मुद्देकॉम्प्लेक्स परिसरात रॅली : पर्यावरण व मानवी सुरक्षिततेचे आवाहन करणारे देखावे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाच्या निमित्ताने सोमवारी (दि.२) कॉम्प्लेक्स परिसरात महाविद्यालयीन युवक, युवती व विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध प्रकारचे पथनाट्य, फलकाच्या माध्यमातून तसेच घोषणाबाजी करून तरुणाईने भारतीय आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविले. याशिवाय पर्यावरण व मानवी सुरक्षितता टिकली पाहिजे, असे आवाहनही केले. या रॅलीत राज्यभरातील ७०० पेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.गोंडवाना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन. व्ही. कल्याणकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्यासह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. सदर रॅली एमआयडीसी मार्गावरील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हा न्यायालय ते चंद्रपूर मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते टी पार्इंट अशी फिरविण्यात आली. येथून रॅली पुन्हा विद्यापीठात पोहोचली. सदर रॅलीमध्ये गोंडवाना विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतीकारकांच्या इतिहासाबद्दल बॅनर व फलकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच रेलानृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीची ओळख करून दिली. इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जंगल वाचवा, प्राणी वाचवा असा संदेश पथनाट्यातून दिला. मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महिला व युवतीवरील अत्याचार थांबले पाहिजे, असे आवाहन फलकातून केले. नुकत्याच हैदराबाद येथे घडलेल्या डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावरील अत्याचाराच्या घटनेचा निषेधही विद्यार्थ्यांनी केला. अशा प्रकारच्या घटनांना आळा घातल्या गेला पाहिजे, असे आवाहन केले. दरम्यान रॅलीत काही विद्यार्थी ‘मुली वाचवा, अत्याचार थांबवा’ ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ असा संदेश फलकातून दिला. सदर रॅलीतून विद्यार्थ्यांनी आदिवासी, महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकuniversityविद्यापीठ