शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
3
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
4
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
7
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
8
जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
9
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
10
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
11
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
12
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
13
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
14
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
15
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
16
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
18
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
19
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही पाऊस कमीच पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:55 IST

पावसाळ्याच्या सुरूवातीला पडलेल्या पावसावरून यावर्षी पाऊस वार्षिक सरासरी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यावर्षीही सरासरीच्या दोन टक्के पाऊस कमी झाला आहे.

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यातील बहुतांश दिवस कोरडे : सरासरी पेक्षा अधिक पडण्याचा अंदाज ठरला खोटा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्याच्या सुरूवातीला पडलेल्या पावसावरून यावर्षी पाऊस वार्षिक सरासरी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यावर्षीही सरासरीच्या दोन टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यातही काही तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी ९० टक्केपेक्षा कमी आहे.१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीतील पावसाचे प्रमाण हवामान खात्यामार्फत मोजले जाते. याच कालावधीला पावसाळा संबोधल्या जाते. गडचिरोली जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीपर्यंत सरासरी १३४७.७ एवढा सरासरी पाऊस पडतो. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपीक करपले होते. एवढेच नाही तर उशीरा पाऊस पडल्याने रोवणी सुध्दा लांबली होती. याचा मोठा परिणाम धान पिकावर झाला होता. यावर्षी मात्र अगदी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे यावर्षीचा पाऊस वार्षिक सरासरी गाठेल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाने कायमची उसंत घेतली. आठ दिवसांपूर्वी झालेला पाऊस वगळता, संपूर्ण सप्टेंबर महिना कोरडा गेला. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरूवातीला नागरिक व हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खोटा ठरत पावसाने सरासरी तर गाठलीच नाही. उलट वार्षिक सरासरीच्या दोन टक्के पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात केवळ १३२८.३ टक्के एवढाच पाऊस पडला आहे.मागील एक महिन्यापासून पावसाने उसंत घेतली आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांधीतील पाणी आटले आहे. ज्या शेतकºयांजवळ सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत, असे शेतकरी धान पिकाला पाणी देत आहेत. मात्र ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकºयांना स्वत:चे धान करपतेवेळी बघावे लागत आहे.आॅगस्ट महिन्यापर्यंत दिवसरात्र पाऊस पडत होता. त्यामुळे कापूस, तूर, सोयाबिन या पिकांची वाढ खुंटली होती. कापूस पिकाला आता बोंड येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पावसाने दगा दिल्याने कापूस पीक सुध्दा कोमेजायला लागले आहे. परिणामी कापसाच्या उत्पादनातही कमालीची घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.सात तालुक्यांमध्ये ९० टक्केपेक्षा कमी पाऊसयावर्षी जिल्हाभरात पावसाचे प्रमाण अतिशय व्यस्त आहे. काही तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडला आहे. तर काही तालुक्यांमध्ये मात्र ९० टक्केपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. गडचिरोली तालुक्यात सरासरीच्या ८४.९ टक्के, धानोरा तालुक्यात ८३.५ टक्के, देसाईगंज तालुक्यात ८९.८ टक्के, आरमोरी तालुक्यात ८२.५ टक्के, कुरखेडा तालुक्यात ७७.६ टक्के, कोरची तालुक्यात ७७.४ टक्के झाला आहे.सप्टेंबर महिन्यात सरासरी २१७.४ मिमी एवढा पाऊस पडणे अपेक्षित होता. मात्र यावर्षी केवळ १०६.७ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पडणाºया वार्षिक सरासरीच्या केवळ ४९.१ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात कमी पडलेल्या पावसामुळे यावर्षी पाऊस वार्षिक सरासरी सुध्दा ओलांडू शकला नाही.

टॅग्स :Rainपाऊस