शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

यावर्षी शाळकरी मुलींना सायकलींचे वाटपच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 01:27 IST

मानव विकास मिशनअंतर्गत जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील गावापासून शाळेपर्यंत अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप केले जाते. या योजनेंतर्गत शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला.

ठळक मुद्देनिधीचा तुटवडा : सत्र संपत असताना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मानव विकास मिशनअंतर्गत जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील गावापासून शाळेपर्यंत अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप केले जाते. या योजनेंतर्गत शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला. मात्र तीन महिने उलटूनही सदर प्रस्तावावर कार्यवाही झाली नाही. या योजनेसाठी निधीच मंजूर न केल्याने शालेय सत्र अंतिम टप्प्यात असताना दोन हजारांवर विद्यार्थिनी सायकलच्या प्रतिक्षेत आहेत.जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील शेकडो माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. विद्यार्थी रहिवासी असलेल्या गावात शाळा नसल्याने गावातील अनेक विद्यार्थी पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील दुसºया गावातील शाळांमध्ये शिक्षणासाठी जातात. ज्या विद्यार्थ्यांना मानव विकास मिशनची बस सुविधा मिळू शकत नाही, अशा विद्यार्थिनींना मोफत सायकल उपलब्ध करून दिली जाते. गेल्या तीन ते चार वर्षात सातत्याने अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना सायकलीचा लाभ देण्यात आला. मात्र यंदा शालेय सत्राचे सहामाही सत्र संपूनही सायकल वाटपाची कार्यवाही हाती घेण्यात आली नाही.मानव विकास मिशनचा निधी प्राप्त झाल्यानंतर हा निधी शिक्षण विभागातर्फे संबंधित शाळांच्या खात्यात वळविला जातो. यासाठी शिक्षण विभागाने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानंतर प्राप्त प्रस्तावाबाबत नियोजन आराखडा ठरवून परिपूर्ण प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर करण्यात आला. परंतू निधीअभावी त्या प्रस्तावाला मंजुरीच मिळाली नसल्याची माहिती आहे.विद्यार्थिनींना सायकल वाटप योजनेबाबतचा प्रस्ताव मानव विकास मिशनच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही आर्थिक तरतूद करून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नाही. यासंदर्भात महिनाभरापूर्वी नियोजन विभागाकडे विचारणाही केली होती.- रमेश उचे, शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.गडचिरोलीएक कोटी रुपयांचा खर्चशिक्षणासाठी दररोज दुसऱ्या गावी जाणाऱ्या जवळपास तीन हजार विद्यार्थिनींना सायकली वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. यासाठी जवळपास एक कोटी रुपये लागणार आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता एका सायकलमागे ५०० रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी तीन हजार रुपयांचे अनुदान एका विद्यार्थ्याला मिळत होते. आता प्रतीविद्यार्थी ३ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. मात्र यासाठीचा प्रस्ताव मानव विकास मिशनच्या नियोजन विभागाने अद्यापही मंजूर केला नसल्याने विद्यार्थिनींची शाळेपर्यंतच्या प्रवासाची पायपीट सुरूच आहे. हे सत्र संपण्यासाठी अवघे २ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यंदाच्या सत्रात विद्यार्थिनींना सायकली मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी