आदिवासी संस्कृती आणि पर्यावरण यांचा अगदी जवळचा संबंध आहे. जंगल व जंगलात वावरणारे पशुपक्षी, कीटक व अन्य जीवजंतू यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे वृक्षांना फार महत्त्वाचे स्थान आहे. त्याकरिता दरवर्षी लोकबिरादरी प्रकल्पातर्फे वृक्षदिंडी काढून जागतिक आदिवासी गौरवदिनी वृक्षारोपण केले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जागतिक आदिवासी गौरवदिनाचे औचित्य साधून प्रकल्पाच्या जागेवर विविध जातींच्या रोपट्याचे रोपण करण्यात आले.
सर्वप्रथम वृक्षदिंडी काढण्यात आली. पर्यावरणावर आधारित विविध घोषणा देत आश्रमशाळा ते प्राणी अनाथालयाच्या मागच्या बाजूला मोकळ्या जागेत वृक्षदिंडी पोहचली. तद्नंतर क्रांतिवीर बिरसा मुंडा, कर्मयोगी बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांपुढे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी मुंबई येथील वास्तुविशारद मार्बन आणि ऊर्मी, लोकबिरादरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे, प्राचार्य डॉ. विलास तळवेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर येम्पलवार, मुख्याध्यापक शरीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते. ‘एक कुटुंब, एक झाड’ उपक्रमांतर्गत प्रकल्पातील प्रत्येक कुटुंबांतील सदस्यांनी व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींचे रोपटे लावले. यामध्ये जाईंट बांबू, ब्रॅन्डीस बांबू, अपल बोर, फणस, अव्हाकोडा, अंजीर, काळा जांब, स्टार फ्रूट, कलमी चिंच, रिठा, आवळा, लाँजस टोनिया, फालसा, टेबुबिया, व्हॉट्स ॲपल, कापूर, चकोतरा, जांभूळ, मिलन टोनिया, खैर, दशहरी आंबा, बारमाही आंबा, आम्रपाली आंबा, लंगडा आंबा, लिची, अंजीर, संत्रा, शहतूत आदी वृक्षांचे रोपटे लावण्यात आले. वृक्षारोपणाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक विवेक दुबे व चमूने सहकार्य केले.
090821\05261647-img-20210809-wa0012.jpg
लोकबिरादरी प्रकल्पात विध्यार्थी व तेथील कर्यकर्ते व्रुक्षारोपन करताना