शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
6
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
7
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
8
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
9
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
10
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
11
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
12
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
13
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
14
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
15
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
16
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
17
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
18
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
19
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
20
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

अन् तेलंगणात अडकलेल्या मजुरांना मिळाला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

तेलंगणा राज्यात अडकून पडलेले जवळपास दोन हजार मजूर सिरोंचा, दरूर, कोडसा धाबा, गोंडपिपरी, शिरपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात येत होते. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरच महाराष्ट्र पोलिसांनी अडकवून ठेवले. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी यांना माहित झाली. ते रात्रीच सीमावर्ती भागात पोहोचले. सर्वप्रथम गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याशी संपर्क केला असता, तीन ते चार दिवसात नियोजन करून त्यांना परत आणू, असे सांगितले.

ठळक मुद्देपाठपुराव्यानंतर महाराष्ट्रात प्रवेशाची परवानगी : गोंडपिपरी व राजुरा तहसीलदारांनी केली जेवणाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेले मजूर आता परतायला लागले आहेत. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर अडकवून ठेवले होते. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी २ मेच्या रात्री उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सदर मजुरांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात आला.तेलंगणा राज्यात अडकून पडलेले जवळपास दोन हजार मजूर सिरोंचा, दरूर, कोडसा धाबा, गोंडपिपरी, शिरपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात येत होते. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरच महाराष्ट्र पोलिसांनी अडकवून ठेवले. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी यांना माहित झाली. ते रात्रीच सीमावर्ती भागात पोहोचले. सर्वप्रथम गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याशी संपर्क केला असता, तीन ते चार दिवसात नियोजन करून त्यांना परत आणू, असे सांगितले. त्यानंतर आमदार डॉ.होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला.गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याही सदर बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर मजुरांची आरोग्य तपासणी करून जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले. त्यामुळे मजुरांना स्वगावी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. रविवारी जवळपास तीन हजार मजूर विविध वाहनांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पोहोचले. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातून खासगी वाहनाने पुन्हा त्यांना स्वगावी पाठविण्यात आले. राजुरा व गोंडपिपरीच्या तहसीलदारांशी संपर्क साधून मजुरांच्या जेवनाची व्यवस्था केली. तसेच डॉ. होळी यांनी काही मजुरांसाठी काळी-पिवळी वाहन उपलब्ध करून दिल्याने त्यांचा प्रवास सुखर झाला.पायदळच गाठली सीमाकाही मजुरांना वाहन न मिळाल्याने या मजुरांनी रात्रभर पायदळ प्रवास करून आष्टी गाठले. आष्टी येथील काही नागरिक तसेच पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली. त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना खासगी वाहनाने स्वगावी पाठविण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या