शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

अन् तेलंगणात अडकलेल्या मजुरांना मिळाला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

तेलंगणा राज्यात अडकून पडलेले जवळपास दोन हजार मजूर सिरोंचा, दरूर, कोडसा धाबा, गोंडपिपरी, शिरपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात येत होते. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरच महाराष्ट्र पोलिसांनी अडकवून ठेवले. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी यांना माहित झाली. ते रात्रीच सीमावर्ती भागात पोहोचले. सर्वप्रथम गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याशी संपर्क केला असता, तीन ते चार दिवसात नियोजन करून त्यांना परत आणू, असे सांगितले.

ठळक मुद्देपाठपुराव्यानंतर महाराष्ट्रात प्रवेशाची परवानगी : गोंडपिपरी व राजुरा तहसीलदारांनी केली जेवणाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेले मजूर आता परतायला लागले आहेत. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर अडकवून ठेवले होते. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी २ मेच्या रात्री उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सदर मजुरांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात आला.तेलंगणा राज्यात अडकून पडलेले जवळपास दोन हजार मजूर सिरोंचा, दरूर, कोडसा धाबा, गोंडपिपरी, शिरपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात येत होते. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरच महाराष्ट्र पोलिसांनी अडकवून ठेवले. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी यांना माहित झाली. ते रात्रीच सीमावर्ती भागात पोहोचले. सर्वप्रथम गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याशी संपर्क केला असता, तीन ते चार दिवसात नियोजन करून त्यांना परत आणू, असे सांगितले. त्यानंतर आमदार डॉ.होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला.गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याही सदर बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर मजुरांची आरोग्य तपासणी करून जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले. त्यामुळे मजुरांना स्वगावी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. रविवारी जवळपास तीन हजार मजूर विविध वाहनांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पोहोचले. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातून खासगी वाहनाने पुन्हा त्यांना स्वगावी पाठविण्यात आले. राजुरा व गोंडपिपरीच्या तहसीलदारांशी संपर्क साधून मजुरांच्या जेवनाची व्यवस्था केली. तसेच डॉ. होळी यांनी काही मजुरांसाठी काळी-पिवळी वाहन उपलब्ध करून दिल्याने त्यांचा प्रवास सुखर झाला.पायदळच गाठली सीमाकाही मजुरांना वाहन न मिळाल्याने या मजुरांनी रात्रभर पायदळ प्रवास करून आष्टी गाठले. आष्टी येथील काही नागरिक तसेच पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली. त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना खासगी वाहनाने स्वगावी पाठविण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या