शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अन् तेलंगणात अडकलेल्या मजुरांना मिळाला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

तेलंगणा राज्यात अडकून पडलेले जवळपास दोन हजार मजूर सिरोंचा, दरूर, कोडसा धाबा, गोंडपिपरी, शिरपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात येत होते. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरच महाराष्ट्र पोलिसांनी अडकवून ठेवले. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी यांना माहित झाली. ते रात्रीच सीमावर्ती भागात पोहोचले. सर्वप्रथम गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याशी संपर्क केला असता, तीन ते चार दिवसात नियोजन करून त्यांना परत आणू, असे सांगितले.

ठळक मुद्देपाठपुराव्यानंतर महाराष्ट्रात प्रवेशाची परवानगी : गोंडपिपरी व राजुरा तहसीलदारांनी केली जेवणाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेले मजूर आता परतायला लागले आहेत. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर अडकवून ठेवले होते. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी २ मेच्या रात्री उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सदर मजुरांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात आला.तेलंगणा राज्यात अडकून पडलेले जवळपास दोन हजार मजूर सिरोंचा, दरूर, कोडसा धाबा, गोंडपिपरी, शिरपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात येत होते. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरच महाराष्ट्र पोलिसांनी अडकवून ठेवले. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी यांना माहित झाली. ते रात्रीच सीमावर्ती भागात पोहोचले. सर्वप्रथम गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याशी संपर्क केला असता, तीन ते चार दिवसात नियोजन करून त्यांना परत आणू, असे सांगितले. त्यानंतर आमदार डॉ.होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला.गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याही सदर बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर मजुरांची आरोग्य तपासणी करून जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले. त्यामुळे मजुरांना स्वगावी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. रविवारी जवळपास तीन हजार मजूर विविध वाहनांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पोहोचले. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातून खासगी वाहनाने पुन्हा त्यांना स्वगावी पाठविण्यात आले. राजुरा व गोंडपिपरीच्या तहसीलदारांशी संपर्क साधून मजुरांच्या जेवनाची व्यवस्था केली. तसेच डॉ. होळी यांनी काही मजुरांसाठी काळी-पिवळी वाहन उपलब्ध करून दिल्याने त्यांचा प्रवास सुखर झाला.पायदळच गाठली सीमाकाही मजुरांना वाहन न मिळाल्याने या मजुरांनी रात्रभर पायदळ प्रवास करून आष्टी गाठले. आष्टी येथील काही नागरिक तसेच पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली. त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना खासगी वाहनाने स्वगावी पाठविण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या