शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

चिचडोह प्रकल्पाचे काम सुरू

By admin | Updated: March 22, 2015 00:23 IST

वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळाली. निधी प्राप्त झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम जोमात हाती घेण्यात आले आहे.

गडचिरोली : वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळाली. निधी प्राप्त झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम जोमात हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी ४५० कोटी रूपये लागणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून १ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी २०१४-१५ या वर्षात ५७ कोटी रूपयाची तरतूद करण्यात आली होती. मंजुरी मिळाल्यानंतर चिचडोह सिंचन प्रकल्पाची प्रस्तावित किमत २८२.७३ कोटी होती. मात्र सदर किमत वाढून आता ४५० कोटी झाली आहे. मार्च २०१४ अखेरपर्यंत या प्रकल्पाच्या कामावर १६२.१६ कोटी रूपयाचा निधी खर्च झाला आहे. १ एप्रिल २०१४ अखेरपर्यंत या प्रकल्पाची उर्वरित किमत २८७.४४ कोटी रूपये आहे. चिचडोह सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा ६२.५२ दक्षलक्ष घनमिटर आहे. या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून १०३.४४ दशलक्ष घनमिटर पाण्याचा वापर होणार आहे. या सिंचन प्रकल्पातून ६२० हेक्टर क्षेत्राचा वापर होणार आहे.चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्प शासनाच्या जलसंपदा विभागाच्या अखत्यारित येत असून काम पूर्ण करण्याची जबाबदारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्यावर आहे. विहित कालावधीत चिचडोह सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या हेतुने जलसंपदा विभागाने हालचाली वाढविल्या आहेत. या दृष्टीने संबंधित कंत्राटदारास तसे आदेशही देण्यात आल्याची माहिती आहे. चिचडोह सिंचन प्रकल्पाच्या कामामुळे मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण झाला आहे. सदर प्रकल्पाचे काम जोमात सुरू असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या पल्लवीत झाल्या आहे.असे आहे निधी खर्चाचे नियोजनचामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाची सध्याची किंमत ४५० कोटी रूपये आहे. सन २०१४-१५ या वर्षात या प्रकल्पाच्या कामावर ५७ कोटी रूपये खर्च करावयाचे असून सन २०१५-१६ या वर्षात १०० कोटी रूपये खर्च करायचे आहेत. २०१६-१७ या वर्षात १०० कोटी रूपयांचा खर्च होणार असून २०१७-१८ मध्ये ३०.८४ कोटी रूपये खर्चाचे नियोजन आहे.जून २०१७ पर्यंत काम पूर्ण होणारवैनगंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून सन २०१७ च्या जून अखेरपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यादृष्टीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने आराखडा तयार केला आहे. चिचडोह सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर या सिंचन प्रकल्पाचा शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसाठी मोठा लाभ होणार आहे. परिणामी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दुष्काळातून मुक्तता होणार आहे. त्यामुळे सदर सिंचन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.