शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

चिचडोह प्रकल्पाचे काम सुरू

By admin | Updated: March 22, 2015 00:23 IST

वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळाली. निधी प्राप्त झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम जोमात हाती घेण्यात आले आहे.

गडचिरोली : वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळाली. निधी प्राप्त झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम जोमात हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी ४५० कोटी रूपये लागणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून १ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी २०१४-१५ या वर्षात ५७ कोटी रूपयाची तरतूद करण्यात आली होती. मंजुरी मिळाल्यानंतर चिचडोह सिंचन प्रकल्पाची प्रस्तावित किमत २८२.७३ कोटी होती. मात्र सदर किमत वाढून आता ४५० कोटी झाली आहे. मार्च २०१४ अखेरपर्यंत या प्रकल्पाच्या कामावर १६२.१६ कोटी रूपयाचा निधी खर्च झाला आहे. १ एप्रिल २०१४ अखेरपर्यंत या प्रकल्पाची उर्वरित किमत २८७.४४ कोटी रूपये आहे. चिचडोह सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा ६२.५२ दक्षलक्ष घनमिटर आहे. या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून १०३.४४ दशलक्ष घनमिटर पाण्याचा वापर होणार आहे. या सिंचन प्रकल्पातून ६२० हेक्टर क्षेत्राचा वापर होणार आहे.चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्प शासनाच्या जलसंपदा विभागाच्या अखत्यारित येत असून काम पूर्ण करण्याची जबाबदारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्यावर आहे. विहित कालावधीत चिचडोह सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या हेतुने जलसंपदा विभागाने हालचाली वाढविल्या आहेत. या दृष्टीने संबंधित कंत्राटदारास तसे आदेशही देण्यात आल्याची माहिती आहे. चिचडोह सिंचन प्रकल्पाच्या कामामुळे मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण झाला आहे. सदर प्रकल्पाचे काम जोमात सुरू असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या पल्लवीत झाल्या आहे.असे आहे निधी खर्चाचे नियोजनचामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाची सध्याची किंमत ४५० कोटी रूपये आहे. सन २०१४-१५ या वर्षात या प्रकल्पाच्या कामावर ५७ कोटी रूपये खर्च करावयाचे असून सन २०१५-१६ या वर्षात १०० कोटी रूपये खर्च करायचे आहेत. २०१६-१७ या वर्षात १०० कोटी रूपयांचा खर्च होणार असून २०१७-१८ मध्ये ३०.८४ कोटी रूपये खर्चाचे नियोजन आहे.जून २०१७ पर्यंत काम पूर्ण होणारवैनगंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून सन २०१७ च्या जून अखेरपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यादृष्टीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने आराखडा तयार केला आहे. चिचडोह सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर या सिंचन प्रकल्पाचा शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसाठी मोठा लाभ होणार आहे. परिणामी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दुष्काळातून मुक्तता होणार आहे. त्यामुळे सदर सिंचन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.