शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय इमारतींचे काम निधीअभावी रखडले

By admin | Updated: December 14, 2015 01:42 IST

गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्याचा विकास व्हावा, ...

पाच वर्षांपासून प्रतीक्षा : युती शासनाचेही एटापल्लीकडे दुर्लक्षरवी रामगुंडेवार एटापल्लीगडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्याचा विकास व्हावा, यासाठी १६ कोटी रूपये किमतीच्या १० प्रशासकीय इमारती मंजूर केल्या होत्या. या इमारतींचे अर्धवट बांधकामही झाले आहे. मात्र पुढचे बांधकाम करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने सदर काम ठप्प पडले आहे. युती शासनाचेही या इमारतींकडे दुर्लक्ष झाले आहे. एटापल्ली येथे १७२ लाख रूपयांचे शासकीय मुलींचे वसतिगृह, १९९ लाख रूपये किमतीचे महसूल मंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थानाची इमारत व १६९ लाख रूपये किमतीच्या प्रशासकीय इमारतींना २०११ मध्ये मंजुरी प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर गट्टा, कसनसूर, जारावंडी या तीन ठिकाणीसुद्धा राजस्व महसूल मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने व प्रशासकीय इमारत मंजूर केली आहे. निधीअभावी या इमारतींचे काम अर्ध्यावरच बंद पडले आहे. २९९ लाख रूपये अंदाजीत किंमत असलेल्या आश्रमशाळेची इमारत कसनसूर येथे २०११ मध्ये मंजूर करण्यात आली. या इमारतीचे काम काही प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र या इमारतीलासुद्धा निधीचे ग्रहण लागल्याने बांधकाम ठप्प पडले आहे. एटापल्ली येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे व राजस्व महसूल मंडळाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्णत्वास आले आहे. परंतु किरकोळ काम शिल्लक असल्याने हस्तांतरण थांबविण्यात आले आहे. कसनसूर येथील शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीचे कामसुद्धा जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र किरकोळ कामासाठी हस्तांतरण रखडले आहे. एटापल्ली तालुक्यातील या सर्व १० प्रशासकीय इमारती बांधण्यासाठी १६ कोटी रूपये खर्च येणार आहे. या इमारती पूर्णत्वास आल्या असत्या तर एटापल्ली तालुक्याच्या विकासाचा मार्ग थोडाफार प्रशस्त झाला असता, मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटून आघाडी शासनानेही या इमारतींचे बांधकाम पूर्ण केले नाही व युती शासनही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. केवळ मुंबईमध्ये बसून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या गोष्टी केल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने जनतेमध्ये विद्यमान सरकारविषयीसुद्धा असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. सूरजागड येथील लोहखनिजावर डोळा ठेवून शासन सूरजागड ते आलापल्ली या मार्गाला चारपदरी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठीसुद्धा कोट्यवधी रूपयांचा खर्च येणार आहे. तो खर्च उचलण्यास शासन तयार आहे. मात्र त्यापेक्षा कमी निधीची गरज असलेल्या प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाकडे दुर्लक्ष होत आहे.