शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

प्रशासकीय इमारतींचे काम निधीअभावी रखडले

By admin | Updated: December 14, 2015 01:42 IST

गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्याचा विकास व्हावा, ...

पाच वर्षांपासून प्रतीक्षा : युती शासनाचेही एटापल्लीकडे दुर्लक्षरवी रामगुंडेवार एटापल्लीगडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्याचा विकास व्हावा, यासाठी १६ कोटी रूपये किमतीच्या १० प्रशासकीय इमारती मंजूर केल्या होत्या. या इमारतींचे अर्धवट बांधकामही झाले आहे. मात्र पुढचे बांधकाम करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने सदर काम ठप्प पडले आहे. युती शासनाचेही या इमारतींकडे दुर्लक्ष झाले आहे. एटापल्ली येथे १७२ लाख रूपयांचे शासकीय मुलींचे वसतिगृह, १९९ लाख रूपये किमतीचे महसूल मंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थानाची इमारत व १६९ लाख रूपये किमतीच्या प्रशासकीय इमारतींना २०११ मध्ये मंजुरी प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर गट्टा, कसनसूर, जारावंडी या तीन ठिकाणीसुद्धा राजस्व महसूल मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने व प्रशासकीय इमारत मंजूर केली आहे. निधीअभावी या इमारतींचे काम अर्ध्यावरच बंद पडले आहे. २९९ लाख रूपये अंदाजीत किंमत असलेल्या आश्रमशाळेची इमारत कसनसूर येथे २०११ मध्ये मंजूर करण्यात आली. या इमारतीचे काम काही प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र या इमारतीलासुद्धा निधीचे ग्रहण लागल्याने बांधकाम ठप्प पडले आहे. एटापल्ली येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे व राजस्व महसूल मंडळाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्णत्वास आले आहे. परंतु किरकोळ काम शिल्लक असल्याने हस्तांतरण थांबविण्यात आले आहे. कसनसूर येथील शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीचे कामसुद्धा जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र किरकोळ कामासाठी हस्तांतरण रखडले आहे. एटापल्ली तालुक्यातील या सर्व १० प्रशासकीय इमारती बांधण्यासाठी १६ कोटी रूपये खर्च येणार आहे. या इमारती पूर्णत्वास आल्या असत्या तर एटापल्ली तालुक्याच्या विकासाचा मार्ग थोडाफार प्रशस्त झाला असता, मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटून आघाडी शासनानेही या इमारतींचे बांधकाम पूर्ण केले नाही व युती शासनही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. केवळ मुंबईमध्ये बसून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या गोष्टी केल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने जनतेमध्ये विद्यमान सरकारविषयीसुद्धा असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. सूरजागड येथील लोहखनिजावर डोळा ठेवून शासन सूरजागड ते आलापल्ली या मार्गाला चारपदरी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठीसुद्धा कोट्यवधी रूपयांचा खर्च येणार आहे. तो खर्च उचलण्यास शासन तयार आहे. मात्र त्यापेक्षा कमी निधीची गरज असलेल्या प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाकडे दुर्लक्ष होत आहे.