शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

लोकबिरादरी प्रकल्पाच्या पुढाकाराने २५ तलावांचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST

रमेश मारगोनवार भामरागड : सिंचनाचा सुविधेपासून वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाने तलाव ...

रमेश मारगोनवार

भामरागड : सिंचनाचा सुविधेपासून वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाने तलाव निर्मितीचे काम हाती घेतले. गेल्या तीन वर्षांत २५ तलावांचे काम पूर्णत्वास गेले आहे. या तलावांत साचणाऱ्या पाण्यातून आता तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर विसंबून न राहता रब्बी हंगामातही पीक घेता येणार आहे.

भामरागड तालुका हा अनेक वर्षांपूर्वी राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र, या तालुक्यातील विविध समस्या अजूनही आ वासून उभ्या आहेत. इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा या बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही सिंचनाची सुविधा नाही. वनक्षेत्र आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या नद्या असूनही त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करणे आतापर्यंत जमले नाही. परिणामी आजही तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते.

ही परिस्थिती दूर करण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी शेतकऱ्यांच्या सहभागातून काही गावांमध्ये तलाव निर्माण करण्याचे काम २०१६ पासून हाती घेतले. भामरागड तालुक्यातील जिंजगावातून तलाव निर्मितीचे काम सुरू केले. अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली येथील तलावाचे काम नुकतेच पूर्ण झाले. आतापर्यंत विविध गावांत असे २५ तलाव तयार करण्यात यश आले.

(बॉक्स)

पुढेही शक्य ती मदत करणार

याबाबत बोलताना अनिकेत आमटे यांनी सांगितले, भामरागड तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही सिंचन सुविधेअभावी शेतीचा विकास झाला. ही बाब लक्षात घेऊन तलाव निर्मितीचा संकल्प केला. या तलावांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेणे सोयीचे होईल. कोरड्या दुष्काळापासून शेती वाचविता येईल. तसेच त्या तलावात मासेमारीही करता येईल. एवढेच नाही तर जमिनीतील पाणी पातळी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक गावकऱ्यांनी आमच्या गावात तलाव निर्माण करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुढेही शक्य होईल तेवढी मदत शेतकऱ्यांसाठी करणार, असे अनिकेत यांनी सांगितले.