शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

वैरागडात महिलांची सुरू आहे पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: May 6, 2015 01:38 IST

गेल्या १०-१५ वर्षांपासून उन्हाळ्यात आरमोरी तालुक्यात वैरागड येथे पाणी टंचाईची भीषण समस्या ऐरणीवर येत आहे.

वैरागड : गेल्या १०-१५ वर्षांपासून उन्हाळ्यात आरमोरी तालुक्यात वैरागड येथे पाणी टंचाईची भीषण समस्या ऐरणीवर येत आहे. गावातील २५ वर्षांपूर्वीची जुनी नळ पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली असून गावात पाण्याची असमान वितरण होत आहे. परिणामी गावातील बेघर वस्तीतील महिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील हातपंपावरून पाणी आणत असल्याचे चित्र आहे. वैरागड येथे २५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली जुनी नळ पाणी पुरवठा योजना वाढत्या लोकसंख्यमुळे अपुरी ठरत आहे. त्यामुळे सतत गेल्या १५ वर्षांपासून नागरिक व महिलांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात उन्हाळ्यात भासणारी पाणी टंचाईची भीषण समस्या तत्काळ मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी अनेकदा निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली. मात्र नागरिकांच्या या निवेदनाची ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत भोयर यांच्या घराजवळ दीड लाख हजार लिटर क्षमतेची पाणी पुरवठ्याची नवीन टाकीचे बांधकाम करण्यात आले, मात्र वैरागडातील पाणी समस्या मार्गी लागली नाही. अपुऱ्या नळ पाणी पुरवठ्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना हातपंप, विहिर आदी स्त्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. सदर स्त्रोतांचे अंतर दोन ते तीन किमी अंतरावर असल्याने महिलांची पाण्यासाठी सध्या पंचाईत होत आहे. (वार्ताहर)२६ जानेवारी २०१३ रोजी वैरागड येथे झालेल्या ग्रामसभेत नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या ठरावाच्या प्रती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे २०१४ च्या डिसेंबर महिन्यात पाठविल्या. या ठरावात अनेक त्रुट्या आढळून आल्याने पाणी पुरवठा विभागाने नव्या नळ योजनेचा प्रस्ताव ग्रा.पं. प्रशासनाकडे परत पाठविला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला असून याला तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे माहिती आहे.