शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

क्रांतीकारी गुंडाधूरचे स्वप्न जिल्ह्यात पूर्णत्वास येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:35 IST

छत्तीसगड राज्यातल्या बस्तर जिल्ह्यात आदिवासींचे आदर्श क्रांतीकारी जमीनदार गुंडाधूर यांनी आपल्या समाजबांधवांवर (आदिवासींवर) इंग्रजांकडून होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध १९१० मध्ये बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले होते.

ठळक मुद्दे१०९ वा भूमकाल दिन विशेष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगड राज्यातल्या बस्तर जिल्ह्यात आदिवासींचे आदर्श क्रांतीकारी जमीनदार गुंडाधूर यांनी आपल्या समाजबांधवांवर (आदिवासींवर) इंग्रजांकडून होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध १९१० मध्ये बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले होते. बस्तरमधील तो भूमकाल विद्रोह सतत ७५ दिवस चालू होता. त्या विद्रोहाची सुरूवात १० फेब्रुवारीला झाली होती. आजही आदिवासींवरील अत्याचार सुरूच आहेत. फक्त अत्याचार करणारे बदलले आहेत. रविवारच्या भूमकाल दिनाच्या निमित्ताने आदिवासींवरील अत्याचाराविरूद्ध पुन्हा एकदा आवाज उठविण्यासाठी आणि क्रांतीकारी गुंडाधूरने बघितलेले आदिवासींच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी कोणी पुढाकार घेईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.आजपासून १०९ वर्षांपूर्वी गुंडाधूर यांनी आपल्या आदिवासी बांधवांवर होणाºया अत्याचाराविरूद्ध १० फेब्रुवारी १९१० रोजी पहिला आवाज उठविला होता. त्यांनी आदिवासींना सोबत घेऊन इंग्रजांच्या अत्याचाराला विरोध केला. त्यावेळी कोणताही विद्रोह शांत करण्यास इंग्रजांना फारसा वेळ लागत नव्हता. परंतू बस्तरमधील भूमकाल विद्रोह हा सतत ७५ दिवस चालू होता. इंग्रजांनी ५०० बंदूकधारी पाठवूनसुद्धा विद्रोह शांत होत नव्हता. १६ फेब्रुवारी ते ३ मे १९१० पर्यंत विद्रोह शांत करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर इंग्रजांनी निर्दोष आदिवासींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू केले. नेतानार जवळील अलनारच्या जंगलात २१ आदिवासींना पकडून त्यांची निर्घृणपणे हत्या केली. यामुळे आदिवासी व गुंडाधूर यांनी चिडून जाऊन इंग्रजांवर हल्ला केला. यात अनेक इंग्रज आणि आदिवासीही मारले गेले. पण गुंडाधूर हा इंग्रजांच्या हाती लागला नाही किंवा गुंडाधूर हा कोण हे इंग्रजांना समजले नाही.आदिवासींना सुखी, समाधानी जीवन जगायला मिळावे म्हणून ते स्वप्न क्रांतीकारी गुंडाधूरने पाहिले होते ते स्वप्न आजही अधुरेच आहे. इंग्रजांची जागी आज नक्षलवाद्यांनी घेतली आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाची प्रगती खुंटली आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणाला विरोध, नोकरी, रोजगाराला विरोध, गावात होणाºया रस्ते बांधकाम, शासकीय कार्यालयांना विरोध, शासनस्तरावरून आदिवासींना मिळणाºया सोयीसुविधांना विरोध, आणि महत्वाचे म्हणजे समाजाच्या विकासासाठी धडपड करणाºया आदिवासींना खबरी ठरवून त्यांच्या हत्या करणे अशा हिंसक घटना घडवून नक्षलवादी आदिवासींच्या प्रगतीमधील मोठा अडथळा ठरत आहेत.आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी २० दिवसांत ८ आदिवासी नागरिकांनी हत्या केली. कसनासूरच्या नागरिकांना त्यांच्याच गावातून बेघर करण्यात आले. शेवटी त्यांना ताडगाव पोलीस मदत केंद्रात आश्रयाला यावे लागले. जिल्ह्यातील आदिवासी समाजावरील या अत्याचाराविरूद्ध बंड पुकारण्यासाठी भूमकाल दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाने एकजूटता दाखवून गुंडाधूरचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.