शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीकारी गुंडाधूरचे स्वप्न जिल्ह्यात पूर्णत्वास येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:35 IST

छत्तीसगड राज्यातल्या बस्तर जिल्ह्यात आदिवासींचे आदर्श क्रांतीकारी जमीनदार गुंडाधूर यांनी आपल्या समाजबांधवांवर (आदिवासींवर) इंग्रजांकडून होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध १९१० मध्ये बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले होते.

ठळक मुद्दे१०९ वा भूमकाल दिन विशेष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगड राज्यातल्या बस्तर जिल्ह्यात आदिवासींचे आदर्श क्रांतीकारी जमीनदार गुंडाधूर यांनी आपल्या समाजबांधवांवर (आदिवासींवर) इंग्रजांकडून होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध १९१० मध्ये बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले होते. बस्तरमधील तो भूमकाल विद्रोह सतत ७५ दिवस चालू होता. त्या विद्रोहाची सुरूवात १० फेब्रुवारीला झाली होती. आजही आदिवासींवरील अत्याचार सुरूच आहेत. फक्त अत्याचार करणारे बदलले आहेत. रविवारच्या भूमकाल दिनाच्या निमित्ताने आदिवासींवरील अत्याचाराविरूद्ध पुन्हा एकदा आवाज उठविण्यासाठी आणि क्रांतीकारी गुंडाधूरने बघितलेले आदिवासींच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी कोणी पुढाकार घेईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.आजपासून १०९ वर्षांपूर्वी गुंडाधूर यांनी आपल्या आदिवासी बांधवांवर होणाºया अत्याचाराविरूद्ध १० फेब्रुवारी १९१० रोजी पहिला आवाज उठविला होता. त्यांनी आदिवासींना सोबत घेऊन इंग्रजांच्या अत्याचाराला विरोध केला. त्यावेळी कोणताही विद्रोह शांत करण्यास इंग्रजांना फारसा वेळ लागत नव्हता. परंतू बस्तरमधील भूमकाल विद्रोह हा सतत ७५ दिवस चालू होता. इंग्रजांनी ५०० बंदूकधारी पाठवूनसुद्धा विद्रोह शांत होत नव्हता. १६ फेब्रुवारी ते ३ मे १९१० पर्यंत विद्रोह शांत करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर इंग्रजांनी निर्दोष आदिवासींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू केले. नेतानार जवळील अलनारच्या जंगलात २१ आदिवासींना पकडून त्यांची निर्घृणपणे हत्या केली. यामुळे आदिवासी व गुंडाधूर यांनी चिडून जाऊन इंग्रजांवर हल्ला केला. यात अनेक इंग्रज आणि आदिवासीही मारले गेले. पण गुंडाधूर हा इंग्रजांच्या हाती लागला नाही किंवा गुंडाधूर हा कोण हे इंग्रजांना समजले नाही.आदिवासींना सुखी, समाधानी जीवन जगायला मिळावे म्हणून ते स्वप्न क्रांतीकारी गुंडाधूरने पाहिले होते ते स्वप्न आजही अधुरेच आहे. इंग्रजांची जागी आज नक्षलवाद्यांनी घेतली आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाची प्रगती खुंटली आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणाला विरोध, नोकरी, रोजगाराला विरोध, गावात होणाºया रस्ते बांधकाम, शासकीय कार्यालयांना विरोध, शासनस्तरावरून आदिवासींना मिळणाºया सोयीसुविधांना विरोध, आणि महत्वाचे म्हणजे समाजाच्या विकासासाठी धडपड करणाºया आदिवासींना खबरी ठरवून त्यांच्या हत्या करणे अशा हिंसक घटना घडवून नक्षलवादी आदिवासींच्या प्रगतीमधील मोठा अडथळा ठरत आहेत.आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी २० दिवसांत ८ आदिवासी नागरिकांनी हत्या केली. कसनासूरच्या नागरिकांना त्यांच्याच गावातून बेघर करण्यात आले. शेवटी त्यांना ताडगाव पोलीस मदत केंद्रात आश्रयाला यावे लागले. जिल्ह्यातील आदिवासी समाजावरील या अत्याचाराविरूद्ध बंड पुकारण्यासाठी भूमकाल दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाने एकजूटता दाखवून गुंडाधूरचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.