शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

उपसा सिंचन योजना मार्गी लागणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST

तेलंगणा सरकारने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केलेल्या गोदावरी नदीवरील कालेश्वरम प्रकल्पानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आणि विशेषत: सिरोंचा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कालेश्वरम प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झाला असताना या प्रकल्पाच्या वरील बाजुने (बॅक वॉटरवर) असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या चार योजनांची कामे रखडलेली आहेत.

ठळक मुद्देदक्षिण भागातील सिंचनाचा प्रश्न : चार योजनांसह तुमडीहेटी प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मोठ्या नद्यांची नैसर्गिक देण असतानाही सिंचन प्रकल्प नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहावे लागते. जिल्ह्याच्या दक्षिण भागात काही उपसा सिंचन प्रकल्प मंजूर आहेत, पण त्या प्रकल्पांच्या कामाने अद्यापही गती घेतलेली नाही. आता लोकप्रतिनिधीची खांदेपालट झाल्यामुळे नवीन आमदार यात लक्ष घालून दक्षिण गडचिरोलीतील सिंचनाचा प्रश्न मिटवण्यासाठी पुढाकार घेणार का? असा प्रश्न तमाम शेतकऱ्यांच्या मनात घोंघावत आहे.तेलंगणा सरकारने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केलेल्या गोदावरी नदीवरील कालेश्वरम प्रकल्पानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आणि विशेषत: सिरोंचा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कालेश्वरम प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झाला असताना या प्रकल्पाच्या वरील बाजुने (बॅक वॉटरवर) असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या चार योजनांची कामे रखडलेली आहेत.टेकडा, पेंटीपाका आणि रंगयापल्ली अशा तीन उपसा सिंचन योजनांमधून सिरोंचा तालुक्यातील ५०६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. याशिवाय रेगुंठा उपसा सिंचन योजनेतून या तालुक्यातील २०५२ हेक्टर शेतजमिनीला तर तुमडीहेटी प्रकल्पातून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या २५ हजार हेक्टरला पाणी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतू प्रत्यक्षात या योजनांची सद्यस्थिती पाहता गेल्या ३-४ वर्षातही या योजनांच्या कामांना गती आली नसल्याचे दिसून येते.तीन प्रमुख योजनांची प्राथमिक मंजुरी झाली आहे. पुढील प्रक्रिया मात्र संथगतीने सुरू आहे. छोट्या योजना असतानाही या कामांना गती मिळत नसल्यामुळे पाठपुरावा करण्यात लोकप्रतिनिधी कमी पडल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहेत. कालेश्वरम प्रकल्पासारखे सदर योजनांचे काम झाले असते तर आतापर्यंत या योजनांचे पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत पोहोचणे शक्य झाले असते. मात्र त्यासाठी प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधीस्तरावर पाठपुरावा कमी पडला.‘पेंटीपाका’अभावी २२१८ हेक्टर सिंचनापासून वंचितसिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवरील मेडिगड्डा बॅरेजच्या पाणी पसाºयातून नदीच्या डाव्या तिरावर पेंटीपाका उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. ही योजना गोदावरी या मुख्य खोºयाच्या उर्वरित गोदावरी (जी-१०) या उपखोºयाअंतर्गत येते. गोदावरी पाणी तंटा लवादानुसार जी-१० या उपखोºयात महाराष्ट्र राज्याला २८.३२ दलघमी पाणी वापराचे हक्क आहे.पेंटीपाका योजनेची किंमत ४४.७५ कोटी असून सिंचन क्षमता २२१८ हेक्टर आहे. त्यासाठी ६.५४ किमी लांबीच्या डाव्या कालव्याद्वारे १५०१ हेक्टर सिंचन तर ७१७ हेक्टर सिंचनासाठी २१० मीटर लांबीच्या उजव्या फिडर कॅनलद्वारे पेंटीपाका लघु पाटबंधारे तलावात पाणी सोडण्यात येणार आहे.या योजनेतून आयपेठा, तुमनूरमाल, तुमनूरचेक, पेंटीपाकाचेक, मुगापूर, पेंटीपाका वेस्टलँड, मृदुक्रिष्णापूर, राजनपल्ली, आरडा, मदीकुंठा, जामनपल्ली वेस्टलँड व रामानुजापूर या १२ गावातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा होणार आहे. या योजनेला २६ मे २०१० रोजी मंजुरी मिळाली आहे. मात्र योजनेच्या कामाला अद्यापही गती आलेली नाही.१४ वर्षांपासून टेकडा सिंचन योजना थंडबस्त्यातसिरोंचा तालुक्यात टेकडा फाट्यापासून ८ किमी अंतरावर प्राणहिता नदीवर प्रस्तावित असलेल्या टेकडा उपसा सिंचन योजनेची मागणी अनेक वर्षांपूर्वीची आहे. ३७ कोटी ३५ लाख रुपये किमतीच्या या योजनेतून २००० हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. त्यासाठी ४.२३ किमी लांबीचा टेकडा मुख्य कालवा आणि ३.९० किमी लांबीच्या नेमडा मुख्य कालव्याद्वारे सिरोंचा तालुक्यातील १४ गावांना सिंचनाची सोय होणार आहे. या योजनेसाठी ६७.०१५ हेक्टर खासगी तर ६ हेक्टर वनक्षेत्राची आवश्यकता आहे. या योजनेला १९ मे २००५ रोजी तत्कालीन काँग्रेस-राष्टÑवादी सरकारने मंजुरी दिली आहे. पण गेल्या १४ वर्षात या योजनेचा अंतिम सर्वसाधारण आराखडा तयार झालेला नाही. अडचणींवर मार्ग काढून तातडीने कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प