शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

जान देंगे, लेकीन जमीन नही देंगे...; 'तोडगट्टा'वरुन नक्षल्यांचा इशारा, ३० नोव्हेंबरला जिल्हा बंदची हाक

By संजय तिपाले | Updated: November 22, 2023 20:42 IST

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्याच्या मागणीसाठी ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा बंदची हाकही दिली आहे.

गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम तोडगट्टा येथे प्रस्तावित सहा लोह खाणींविरोधात सुरु असलेले  आंदोलन पोलिसांसोबत झालेल्या वादानंतर उधळण्यात आले आहे. यावरुन आता नक्षली आक्रमक झाले आहेत. जान देंगे, लेकीन जमीन नही देंगे.. अशा शब्दांत माओवादी संघटनेचा पश्चिम सब जोनल प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रक जारी करुन पोलिसांना इशारा दिला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्याच्या मागणीसाठी ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा बंदची हाकही दिली आहे.

स्थानिकांच्या विरोधानंतर दोन वर्षांपूर्वी सुरजागड येथे लोह खाण उत्खनन सुरु झाले. आता एटापल्ली तालुक्यात आणखी सहा लोह खाणी प्रस्तावित आहेत. यास विरोध करत मागील अडीचशे दिवसांपासून दमकोंडवाही खाण विरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली परिसरातील नागरिकांचे तोडगट्टा येथे आंदोलन सुरु होते. २० नोव्हेंबरला आंदोलनस्थळापासून जवळच वांगेतुरी येथे पोलिस मदत केंद्र सुरु करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शंभर पोलिसांचे पथक परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना आंदोलक व पोलिसांमध्ये वाद झाला. आंदोलकांनी धक्काबुक्की करत वांगेतुरीला जाण्यापासून रोखल्यानंतर पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत काही आंदोलकनेत्यांना ताब्यात घेतले. यानंतर आंदोलक पांगले तेथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. दरम्यान, तोडगट्टा येथील आंदोलनकर्त्यांच्या अटकेवरुन माओवादी संघटनेचा प्रवक्ता श्रीनिवास याने २३ नोव्हेंबरला दोन पानी पत्रक जारी केले आहे.  विकसित भारत यात्रेचा उद्देश मूळनिवासींचे अस्तित्व संपविणे व कॉर्पोरेट घराण्यांचा विकास करणे हा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. झारखंडमध्ये कोळसा खाणींविरोधात आदिवासी लढत आहेत. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्थानिकांनी विरोध केला, तेव्हा पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावी केली, असा आरोप या पत्रकात केला आहे. वांगेतुरी येथील पोलिस मदत केंद्र हटवा, आंदोलकांची सुटका करा या मागणीसाठी ३० नोव्हेंबरला जिल्हा बंदची हाक दिली  असून ग्रामसभांनाही गावागावात आंदोलन सुरु करण्याचे आवाहन केले आहे.मंत्री धर्मरावबाबांसह लोकप्रतिनिधींकडेही मागणीदरम्यन, प्रवक्ता श्रीनिवास याने या पत्रकात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनाही आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या खाणींवरुनच मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना गेल्या काही महिन्यांत दोनवेळा नक्षल्यांनी धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

तोडगट्टा येथे पोलिसांनी बळाचा वापर केला असता तर कोणी तरी जखमी झाले असते, पण एकाही आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला नाही. या आंदोलनाच्या मागण्या सरकारविरोधी व नक्षल्यांचे समर्थन करणाऱ्या आहेत. नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठीच तेथे पोलिस मदत केंद्र उभारलेले आहे. - नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस