शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बसस्थानकाचे बांधकाम के व्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:27 IST

सिरोंचा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरील धर्मपुरी येथे प्राणहिता नदीवर पूल झाल्याने आदिलाबाद जिल्ह्यासह निकटवर्तीय जिल्ह्यातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मंचेरियाल, चन्नूर, कोल्लूर, रामपूर व देवलाडा मार्गे रात्रंदिवस रहदारी सुरू आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा शहरात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मात्र येथे सुसज्ज व प्रशस्त बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देप्राणहिता व गोदावरी नदीवरील पूल : तीन राज्यीय रहदारी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरील धर्मपुरी येथे प्राणहिता नदीवर पूल झाल्याने आदिलाबाद जिल्ह्यासह निकटवर्तीय जिल्ह्यातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मंचेरियाल, चन्नूर, कोल्लूर, रामपूर व देवलाडा मार्गे रात्रंदिवस रहदारी सुरू आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा शहरात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मात्र येथे सुसज्ज व प्रशस्त बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.तालुका मुख्यालयी सर्व सोयीसुविधायुक्त बसस्थानकाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी जनतेकडून जोर धरत आहे. मंचरियाल, चन्नूर, कोल्लूर, रामपूर व देवलाडा येथील नागरिकांनी सध्या तेलंगणा राज्यातील मध्यम व मोठ्या शहराचे अंतर लांब पडत आहे. त्यामुळे लहान-सहान किरकोळ साहित्य खरेदीसाठी सिरोंचा शहर सोयीस्कर आहे. गोदावरी नदीवरील पूल तीन वर्षांपूर्वी झाला. तेव्हापासून कालेश्वर, महादेवपूर, गारेपल्ली व भूपालपल्ली मार्गे तेलंगण आंध्रवासियांची वर्दळ वाढली आहे. सुरूवातीच्या काही महिन्यात या दोन्ही राज्यातील बससेवेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला. शिवाय त्यांच्या महसुलातही भर पडली. मात्र सिरोंचा येथे प्रशस्त बसस्थानक नसल्याने चालक, वाहकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशस्त बसस्थानक निर्मितीबाबत येथील विभागीय नियंत्रक इच्छूक नाहीत. बसफेऱ्यांची संख्या रोडावत असल्याने निकटवर्तीय आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या तिन्ही राज्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.रहदारीला अडथळा, रस्ता रुंदीकरणाची गरजस्थानिक व बाहेरगावच्या लोकांची येथे सदैव वर्दळ असते. मात्र रस्त्याची रूंदी भूमी अभिलेख विभागाच्या नगर भूमापन नकाशाप्रमाणे नसल्याने वाहनांच्या रहदारीला कमालीचा त्रास होत आहे. २०० मीटर परिसरात नो-पार्र्किंग झोनचा नियम असूनही या नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. भूमापन नकाशात आलापल्ली मार्गाची रूंदी २१.५ मीटर तर असरअल्ली मार्गाची रूंदी २० मीटर आहे. येथे रुंद रस्त्याचे बांधकाम करून दुभाजक उभारण्यात यावे, सर्व सोयीसुविधायुक्त बसस्थानक निर्माण करावे, अशी मागणी होत आहे.