शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

वन्यजीवांचे संरक्षण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

वडसा वन विभागाच्या सभागृहात वडसा वन विभाग वडसा, वन परिक्षेत्र कार्यालय वडसाच्या वतीने लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती रेवता अणोले यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देउपवनसंरक्षकांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे लोकसंवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : जंगलाच्या अवैैध तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडू लागला आहे. अन्नसाखळी टिकवून ठेवण्यात वन्यजीव मौलिक भूमिका बजावतात. यामुळे जंगलाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वडसा वन विभागाचे उप वनसंरक्षक एन. ए. विवरेकर यांनी केले.वडसा वन विभागाच्या सभागृहात वडसा वन विभाग वडसा, वन परिक्षेत्र कार्यालय वडसाच्या वतीने लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती रेवता अणोले यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक उप वनसंरक्षक जी. एम. धोंगडे, सहाय्यक उप वनसंरक्षक व्ही. बी. कांबळे, एस. व्ही. सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी काशिनाथ गेडाम, वन परिक्षेत्राधिकारी आर. एम. शिंदे, एस. एम. डोंगरवार, एम. पी. चांगले उपस्थित होते.भविष्याच्या दृष्टिकोनातून निसर्गाचा समतोल राखण्यात वन्य जीवांची मौलिक भूमिका आहे. जंगलांची व्याप्ती वाढविण्यात सहाय्यक ठरणारी आहे. जल, जंगल जमिनीचे संरक्षण करण्यात आल्यास अनेक अडचणींवर मात करता येत असल्याने आपले नैतिक कर्तव्य समजून प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही विवरेकर म्हणाले.कार्यक्रमाला स्थानिक वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक उप वनसंरक्षक व्ही. बी. कांबळे यांनी केले.योजनांबाबत जागृतीजनसंवादात नागरिकांना वन विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सामाजिक वनीकरण, प्रादेशिक आणि वन्यजीव, पीक नुकसान, मनुष्य हानी, मागेल त्याला रोपे, खाजगी वृक्षतोड यासह अन्य योजनांचा समावेश होता. दरम्यान अनेक नागरिकांनी अधिकाऱ्यांना आपल्या मनातील शंका व समस्यांबाबत विचारणा केली असता, अधिकाºयांनी त्यांच्या शंकांचे योग्य समाधान केले.

टॅग्स :Socialसामाजिक