शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रानटी हत्तींचा पिकांमध्ये धुडगूस; शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत पाणी, पीक हाती येण्याच्या कालावधीतच नासधूस

By गेापाल लाजुरकर | Updated: November 10, 2023 19:53 IST

हत्तींच्या कळपाकडून पिकांची नासधूस केली जात आहे. 

गडचिराेली : जिल्ह्यात गेल्या दाेन वर्षांपासून रानटी हत्तींच्या कळपाकडून खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामांतील पिकांची नासधूस केली जात आहे. यावर्षी उन्हाळ्यात छत्तीसगडमध्ये परत गेलेल्या हत्तींनी तीन महिन्यांपूर्वी पुन्हा गडचिराेली जिल्ह्यात प्रवेश केला. तेव्हापासून हत्तींच्या कळपाकडून पिकांची नासधूस केली जात आहे. 

आतातर हाती येणाऱ्या धान पिकाची नासधूस रानटी हत्ती करीत असल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. हात पीक येण्याऐवजी डाेळ्यांत पाणी आहे. गडचिराेली जिल्ह्यातील वडसा वनविभागात २३च्या संख्येने असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने सर्वाधिक नासधूस केली. शेतीपीक, मनुष्यहानी, साहित्य व घरांचीही पाडापाडी करून लाेकांचे नुकसान केले. 

एकट्या वडसा वनविभागांतर्गत एकूण ४५४ प्रकरणात १ काेटी ११लाख १५ हजार ९७२ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. गडचिराेली वनविभागातील नुकसानभरपाईसुद्धा ३० लाखांच्या आसपास आहे.

पीक नुकसानाची ५६ लाखांवर भरपाई -रानटी हत्तींनी वडसा वनविभागात यावर्षी ४३७ शेतकऱ्यांच्या १२०.२७ हेक्टर क्षेत्रावरील धान व अन्य पिकांचे नुकसान केले. या नुकसानीपाेटी शेतकऱ्यांना ५३ लाख ९८, ९७२ रुपयांची नुकसानभरपाई वितरित करण्यात आली. गेल्या आठ दिवसांत आणखी ५० ते ६० शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस हत्तींनी केली. गडचिराेली वन विभागातही हत्तींनी ८० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. एकूण ५६ लाखांवर भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली.

दाेघांचा घेतला बळी -रानटी हत्तींनी यावर्षी दाेन लाेकांचा बळी घेतला. यामध्ये आरमाेरी वनपरिक्षेत्रातील पळसगाव क्षेत्रात वनाधिकाऱ्यांचे वाहनचालक, तर पाेर्ला वनपरिक्षेत्रातील दिभना येथील एका शेतकऱ्याचा समावेश आहे. यापूर्वी हत्तींनी काेरची तालुक्यातील एक महिला व एक पुरुष, तर धानाेरा तालुक्यातील एका पुरुषाचा बळी घेतला हाेता. आतापर्यंत पाच लाेकांचा बळी हत्तींनी घेतला. 

टॅग्स :FarmerशेतकरीGadchiroliगडचिरोलीCropपीक