शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींनी स्वप्न हिरावले; भरपाईसाठी अटी, शर्थींची 'मेख'

By संजय तिपाले | Updated: November 18, 2023 17:56 IST

४८ तासांत ऑनलाइन तक्रार बंधनकारक: काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध

गडचिराेली : तालुक्यातील माैशीखांब परिसरात ठाण मांडून बसलेल्या रानटी हत्तींनी धान पीक तुडवून शेतकऱ्यांचे स्वप्न हिरावले. आता मदतीसाठी शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. ४८ तासांत ऑनलाइन तक्रार नोंदविणे बंधनकारक केल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जाचक अटी, शर्थी शिथिल करून शेतकऱ्यांना थेट मदत करावी, अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यात रानटी हत्तींनी गेल्या काही दिवसांत धुडगूस घातला आहे. आरमोरी, गडचिरोली, धानोरा तालुक्यातील पिकांचे नुकसान केले आहे. दरम्यान, आता हत्तींनी आपला मोर्चा गडचिरोली जवळील माैशीखांब, बेलगावकडे वळविला आहे.रानटी हत्तींच्या कळपात २३ सदस्य आहेत. परंतु, आता एका हत्तिणीने पिलाला जन्म दिल्याने हत्तींची संख्या २४ झाली आहे. कळपावर पश्चिम बंगालची हुल्ला टीम लक्ष ठेवून आहे. तसेच हत्तींचा वावर असलेल्या भागात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मज्जाव आहे, पण रात्री-अपरात्री हत्ती धानपिकांचे नुकसान करतात.  

मौशीखांबला शेतकरी चिंतामण कुरूडकार, नीलकंठ कुरूडकार, धुमदास आडबैले, तुकाराम कुकुडकर, अनिल राऊत यांच्या धानपिकांचे १५ नोव्हेंबर रोजी हत्तींनी मोठे नुकसान केले. तथापि, ४८ तास उलटूनही ऑनलाइन तक्रार न केल्याने शेतकरी मदतीविना राहण्याची शक्यता आहे. यावर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे यांनी आक्षेप घेतला असून अटी- शर्थी रद्द करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट बँक खत्यात आर्थिक भरपाईपोटी रक्कम जमा करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या गावात पूर्णवेळ तलाठी नाही, अनेक ठिकाणी नेटवर्कच्या अडचणी आहेत, शेतकरी अशिक्षित आहेत, दुर्गम भागात या समस्या अधिक तीव्र आहेत, अशा परिस्थितीत या अटी, शर्थी शेतकऱ्यांच्या माथी का मारल्या जात आहेत, असा सवाल विश्वजित कोवासे यांनी केला आहे.

पदाधिकारी पोहोचले बांधावर

दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे व इतरांनी मौशीखांब येथे नुकसान झालेल्या शेतात जाऊन पाहणी केली. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची कोणीही हमी घेत नाही. काँग्रेस मात्र  वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज असल्याचा इशारा विश्वजित कोवासे यांनी दिला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीGadchiroliगडचिरोली