शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

हत्तींनी स्वप्न हिरावले; भरपाईसाठी अटी, शर्थींची 'मेख'

By संजय तिपाले | Updated: November 18, 2023 17:56 IST

४८ तासांत ऑनलाइन तक्रार बंधनकारक: काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध

गडचिराेली : तालुक्यातील माैशीखांब परिसरात ठाण मांडून बसलेल्या रानटी हत्तींनी धान पीक तुडवून शेतकऱ्यांचे स्वप्न हिरावले. आता मदतीसाठी शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. ४८ तासांत ऑनलाइन तक्रार नोंदविणे बंधनकारक केल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जाचक अटी, शर्थी शिथिल करून शेतकऱ्यांना थेट मदत करावी, अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यात रानटी हत्तींनी गेल्या काही दिवसांत धुडगूस घातला आहे. आरमोरी, गडचिरोली, धानोरा तालुक्यातील पिकांचे नुकसान केले आहे. दरम्यान, आता हत्तींनी आपला मोर्चा गडचिरोली जवळील माैशीखांब, बेलगावकडे वळविला आहे.रानटी हत्तींच्या कळपात २३ सदस्य आहेत. परंतु, आता एका हत्तिणीने पिलाला जन्म दिल्याने हत्तींची संख्या २४ झाली आहे. कळपावर पश्चिम बंगालची हुल्ला टीम लक्ष ठेवून आहे. तसेच हत्तींचा वावर असलेल्या भागात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मज्जाव आहे, पण रात्री-अपरात्री हत्ती धानपिकांचे नुकसान करतात.  

मौशीखांबला शेतकरी चिंतामण कुरूडकार, नीलकंठ कुरूडकार, धुमदास आडबैले, तुकाराम कुकुडकर, अनिल राऊत यांच्या धानपिकांचे १५ नोव्हेंबर रोजी हत्तींनी मोठे नुकसान केले. तथापि, ४८ तास उलटूनही ऑनलाइन तक्रार न केल्याने शेतकरी मदतीविना राहण्याची शक्यता आहे. यावर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे यांनी आक्षेप घेतला असून अटी- शर्थी रद्द करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट बँक खत्यात आर्थिक भरपाईपोटी रक्कम जमा करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या गावात पूर्णवेळ तलाठी नाही, अनेक ठिकाणी नेटवर्कच्या अडचणी आहेत, शेतकरी अशिक्षित आहेत, दुर्गम भागात या समस्या अधिक तीव्र आहेत, अशा परिस्थितीत या अटी, शर्थी शेतकऱ्यांच्या माथी का मारल्या जात आहेत, असा सवाल विश्वजित कोवासे यांनी केला आहे.

पदाधिकारी पोहोचले बांधावर

दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे व इतरांनी मौशीखांब येथे नुकसान झालेल्या शेतात जाऊन पाहणी केली. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची कोणीही हमी घेत नाही. काँग्रेस मात्र  वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज असल्याचा इशारा विश्वजित कोवासे यांनी दिला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीGadchiroliगडचिरोली