शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोरची तालुक्यात हत्तींचा पुन्हा उच्छाद; धावत्या दुचाकीस्वारांना खाली पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2022 15:44 IST

दुचाकीस्वारांना हत्तींनी पाडण्याच्या घटनेसोबत जंगली हत्ती गावापासून जास्त लांब नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे.

कोरची (गडचिरोली) : जंगली हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ आता देसाईगंज, कुरखेडानंतर पुन्हा कोरची तालुक्यात सुरू झाला आहे. अशातच दुचाकीवरून जात असलेल्या तिघांपैकी एकाला जंगली हत्तींच्या कळपातील एका हत्तीने सोंडेने ढकलले. त्यामुळे तिघेही जण दुचाकीवरून खाली पडले. प्रसंगावधान राखत त्यांनी जंगलात पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना रात्रीच्या अंधारात बराच वेळपर्यंत जंगलात भटकावे लागले. 

माहितीनुसार, येथील एका व्यापाऱ्याची प्रकृती बरी नसल्याने ते चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन आपल्या मुलासोबत दुचाकीने कोरचीला येत होते. दरम्यान, संध्याकाळी साडे सहा दरम्यान बेडगाव घाट ओलांडून झाल्यानंतर झंकारगोंदी गावाजवळील रस्त्यावर एकाएकी १५ ते २० जंगली हत्ती समोर आले.

अन् अंधारात जंगलात भटकत राहिले

  • जखमी अवस्थेत तिघेही जण पडल्यानंतर हत्तींपासून जीव वाचवण्यासाठी ते जंगलात इकडे-तिकडे पळत सुटले. पण या गडबडीत ते जंगलात भटकले, अंधार पडल्याने त्यांना मार्ग काढणे कठीण झाले होते. पाऊण तासानंतर जंगलातून मुख्य रस्त्यावरील प्रवासी वाहनांच्या लाईटचा प्रकाश त्यांना दिसला. त्यावरून अंदाज काढत त्यांना मुख्य रस्ता सापडला.
  • मुख्य रस्त्यावर आल्यानंतर त्यांनी कुरखेडावरून कोरचीला जाणाऱ्या अनेक वाहनांना हात दाखविला. हात जोडून विनवणी केल्यानंतरही कोणीही थांबायला तयार होत नव्हते. कारण या मार्गावर काही दिवसांपूर्वी लूटमारीच्या घडना घडल्या आहेत. त्यामुळे जोखीम पत्करायला कोणीही तयार नव्हते. एवढ्यात कुरखेडाकडे निघालेल्या कोरचीमधील एका ओळखीच्या व्यापाऱ्याने त्यांची मदत केली.

हत्तींच्या अस्तित्वामुळे वनविभाग सतर्क

कोरची तालुक्यात दुचाकीस्वारांना हत्तींनी पाडण्याच्या घटनेसोबत जंगली हत्ती गावापासून जास्त लांब नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे. यासोबत वनविभागही सतर्क झाला आहे. तीन दिवसांपूर्वी कोरची तालुक्यातील लेकुरबोडी गावात रात्री जंगली हत्तीच्या कळपाने दोन घरांचे नुकसान करून उभ्या पिकांचीही हानी केली होती. तसेच एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर येथील नागरिकांनी हत्तीच्या दहशतीमुळे सलग तीन दिवस गावासभोवताल पहारा दिला. मसेली व लेकुरबोडी जंगल परिसरात बेडगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांनी आपल्या चमूला तैनात ठेवले, परंतु या सर्व घटनांमुळे कोरची तालुक्यातील नागरिकांना आणि दुचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Accidentअपघातenvironmentपर्यावरणGadchiroliगडचिरोली