भामरागड : अतिदुर्गम भागात असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी गावात सौर दिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे सौरदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
सुरक्षाकवचाविना डीपी धोकादायक
काेरची : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिभना मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : वन नाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. परंतु मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे.
शहरातील अनेक वॉर्डात जुगार जोमात
कुरखेडा : शहरात जुगार जोमात सुरू आहे. अनेक युवक जुगाराच्या नादात लागले आहेत. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. त्यामुळे जुगार खेळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक विद्यार्थी व युवक या व्यवसायात गुंतले असल्याचे दिसून येत आहे. अनेक नागरिक ऑनलाईन सट्टा लावत असल्याचे दिसून येते.
शहरात डुकरांचा हैदोस वाढला
आरमाेरी: शहरात डुकरांचा हैदोस प्रचंड प्रमाणात वाढला आहे. नगर परिषदेचे परिसरातील डुकरांकडे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर राहत असल्याने सभोवतालचे नागरिक त्रस्त झाले आहेत. डुकरे पकडण्याची मोहीम सुरू करून शहरातील डुकरांना हाकलून लावावे, अशी मागणी होत आहे.
टिपागडला अभयारण्याचा दर्जा देण्याची मागणी
गडचिरोली : टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे़ या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे़ शिवाय येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले
गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाºयामुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी आरोग्य धोक्यात आले आहे.
गंजलेल्या विद्युत खांबांमुळे अपघाताचा धोका
आलापल्ली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत.
रामगड परिसरात फवारणी करा
कुरखेडा : रामगड- पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले.
अनेक गावांसाठी लाईनमनच नाही
रांगी : परिसरातील अनेक गावांत सुरळीत विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे लाईनमन द्यावे.
सार्वजनिक नळांना तोट्या लावा
अहेरी: पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येक नळाला ताेटी लावणे आवश्यक आहे. मात्र ताेटी लावल्याणे पाण्याची धार कमी येते असा समज नागरिकांचा असल्याने नागरिक नळांना ताेट्या लावत नाही. परिणामी पाण्याचा अपव्यय हाेण्याचे प्रमाण वाढले आहे.