शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

घातक नकलीपेक्षा असलीच का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

जिल्ह्यात नकली दारूचा पुरवठा होत असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त करून या वृत्ताला दुजोरा दिला. नकली दारूच्या आहारी गेलेल्या काही तरुणांचे आरोग्य बिघडून त्यांना कसे प्राण गमवावे लागले याचेही काही उदाहरण यानिमित्ताने समोर आले. यावरून दारूबंदीने केवळ अवैध विक्रेते आणि नकली दारू बनविणाऱ्यांचेच भले झाले आहे, सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसानच होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील दारूबंदीचा गैरफायदा घेत घातक अशी नकली दारू जिल्हावासीयांच्या गळी उतरविण्याची संधी कोणाला कशाला देता? त्यापेक्षा विष्फळ ठरलेली दारूबंदी दूर करून अधिकृतपणे दारूपुरवठा करा. त्यामुळे दारूचे आकर्षण कमी होण्यासोबत आरोग्यास अपायकारक नकली दारूही लोकांना प्यावी लागणार नाही, असे स्पष्ट मत विविध क्षेत्रांतील नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. जिल्ह्यात नकली दारूचा पुरवठा होत असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त करून या वृत्ताला दुजोरा दिला. नकली दारूच्या आहारी गेलेल्या काही तरुणांचे आरोग्य बिघडून त्यांना कसे प्राण गमवावे लागले याचेही काही उदाहरण यानिमित्ताने समोर आले. यावरून दारूबंदीने केवळ अवैध विक्रेते आणि नकली दारू बनविणाऱ्यांचेच भले झाले आहे, सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसानच होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. वर्षभरात जिल्ह्यात काेट्यवधी रुपयांची दारू पाेलिसांकडून जप्त केली जाते. तरीही तस्करांकडून दारू आयातीचे प्रमाण कमी हाेताना दिसत नाही. पाेलीस २४ तास पाहारा देऊ शकत नसल्याचा गैरफायदा घेतला जात आहे.

बंदीऐवजी जनजागृतीवर भर हवा

मुळात दारू ही वाईट आहे तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात आणि देशभरात ती विक्री करण्यावर, पिण्यावर मनाई का केली जात नाही? केवळ एका जिल्ह्यावर अशी बंदी घालणे हे अन्यायकारक आहे. दारू प्रमाणापेक्षा जास्त घेणे, त्याची सवय जडणे किंवा दारू नकली असणे यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. प्रमाणात घेतलेली दारू ही वाईट नाही.- ॲड. मृणाल मेश्राम

गेल्या ३० वर्षांपासून या जिल्ह्यात सुरू असलेली फसवी दारूबंदी अजून किती दिवस सामान्य नागरिकांना फसवत राहणार आहे? केवळ काही लोकांच्या फायद्यासाठी दारूबंदी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणे योग्य नाही. जिल्ह्यातील दारूबंदी केवळ कागदोपत्री आहे हे कोणालाही कळते, मग अशी निरर्थक दारूबंदी उठवत का नाही?- दिलीप मोटवानी

कोणत्याही गोष्टीला विरोध केला की त्याचे आकर्षण वाढते. गडचिरोलीत नेमके हेच होत आहे. मी दारूबंदी ठेवा किंवा उठवा यापेक्षा दारूबंदीचा एवढा बाऊ कशासाठी हे कळत नाही. दारू विक्री सुरू केली तर लोक कदाचित कमी प्रमाणात पितील. कारण त्याचे आकर्षण कमी होईल. शिवाय नकली दारूलाही आळा बसेल. वास्तविक निव्वळ बंदी लादल्याने लोक दारू पिणार नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे. त्यापेक्षा लोकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.            - मनोज देवकुले

 

टॅग्स :liquor banदारूबंदी