शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

घातक नकलीपेक्षा असलीच का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

जिल्ह्यात नकली दारूचा पुरवठा होत असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त करून या वृत्ताला दुजोरा दिला. नकली दारूच्या आहारी गेलेल्या काही तरुणांचे आरोग्य बिघडून त्यांना कसे प्राण गमवावे लागले याचेही काही उदाहरण यानिमित्ताने समोर आले. यावरून दारूबंदीने केवळ अवैध विक्रेते आणि नकली दारू बनविणाऱ्यांचेच भले झाले आहे, सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसानच होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील दारूबंदीचा गैरफायदा घेत घातक अशी नकली दारू जिल्हावासीयांच्या गळी उतरविण्याची संधी कोणाला कशाला देता? त्यापेक्षा विष्फळ ठरलेली दारूबंदी दूर करून अधिकृतपणे दारूपुरवठा करा. त्यामुळे दारूचे आकर्षण कमी होण्यासोबत आरोग्यास अपायकारक नकली दारूही लोकांना प्यावी लागणार नाही, असे स्पष्ट मत विविध क्षेत्रांतील नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. जिल्ह्यात नकली दारूचा पुरवठा होत असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त करून या वृत्ताला दुजोरा दिला. नकली दारूच्या आहारी गेलेल्या काही तरुणांचे आरोग्य बिघडून त्यांना कसे प्राण गमवावे लागले याचेही काही उदाहरण यानिमित्ताने समोर आले. यावरून दारूबंदीने केवळ अवैध विक्रेते आणि नकली दारू बनविणाऱ्यांचेच भले झाले आहे, सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसानच होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. वर्षभरात जिल्ह्यात काेट्यवधी रुपयांची दारू पाेलिसांकडून जप्त केली जाते. तरीही तस्करांकडून दारू आयातीचे प्रमाण कमी हाेताना दिसत नाही. पाेलीस २४ तास पाहारा देऊ शकत नसल्याचा गैरफायदा घेतला जात आहे.

बंदीऐवजी जनजागृतीवर भर हवा

मुळात दारू ही वाईट आहे तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात आणि देशभरात ती विक्री करण्यावर, पिण्यावर मनाई का केली जात नाही? केवळ एका जिल्ह्यावर अशी बंदी घालणे हे अन्यायकारक आहे. दारू प्रमाणापेक्षा जास्त घेणे, त्याची सवय जडणे किंवा दारू नकली असणे यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. प्रमाणात घेतलेली दारू ही वाईट नाही.- ॲड. मृणाल मेश्राम

गेल्या ३० वर्षांपासून या जिल्ह्यात सुरू असलेली फसवी दारूबंदी अजून किती दिवस सामान्य नागरिकांना फसवत राहणार आहे? केवळ काही लोकांच्या फायद्यासाठी दारूबंदी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणे योग्य नाही. जिल्ह्यातील दारूबंदी केवळ कागदोपत्री आहे हे कोणालाही कळते, मग अशी निरर्थक दारूबंदी उठवत का नाही?- दिलीप मोटवानी

कोणत्याही गोष्टीला विरोध केला की त्याचे आकर्षण वाढते. गडचिरोलीत नेमके हेच होत आहे. मी दारूबंदी ठेवा किंवा उठवा यापेक्षा दारूबंदीचा एवढा बाऊ कशासाठी हे कळत नाही. दारू विक्री सुरू केली तर लोक कदाचित कमी प्रमाणात पितील. कारण त्याचे आकर्षण कमी होईल. शिवाय नकली दारूलाही आळा बसेल. वास्तविक निव्वळ बंदी लादल्याने लोक दारू पिणार नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे. त्यापेक्षा लोकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.            - मनोज देवकुले

 

टॅग्स :liquor banदारूबंदी