शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

घातक नकलीपेक्षा असलीच का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

जिल्ह्यात नकली दारूचा पुरवठा होत असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त करून या वृत्ताला दुजोरा दिला. नकली दारूच्या आहारी गेलेल्या काही तरुणांचे आरोग्य बिघडून त्यांना कसे प्राण गमवावे लागले याचेही काही उदाहरण यानिमित्ताने समोर आले. यावरून दारूबंदीने केवळ अवैध विक्रेते आणि नकली दारू बनविणाऱ्यांचेच भले झाले आहे, सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसानच होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील दारूबंदीचा गैरफायदा घेत घातक अशी नकली दारू जिल्हावासीयांच्या गळी उतरविण्याची संधी कोणाला कशाला देता? त्यापेक्षा विष्फळ ठरलेली दारूबंदी दूर करून अधिकृतपणे दारूपुरवठा करा. त्यामुळे दारूचे आकर्षण कमी होण्यासोबत आरोग्यास अपायकारक नकली दारूही लोकांना प्यावी लागणार नाही, असे स्पष्ट मत विविध क्षेत्रांतील नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. जिल्ह्यात नकली दारूचा पुरवठा होत असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त करून या वृत्ताला दुजोरा दिला. नकली दारूच्या आहारी गेलेल्या काही तरुणांचे आरोग्य बिघडून त्यांना कसे प्राण गमवावे लागले याचेही काही उदाहरण यानिमित्ताने समोर आले. यावरून दारूबंदीने केवळ अवैध विक्रेते आणि नकली दारू बनविणाऱ्यांचेच भले झाले आहे, सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसानच होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. वर्षभरात जिल्ह्यात काेट्यवधी रुपयांची दारू पाेलिसांकडून जप्त केली जाते. तरीही तस्करांकडून दारू आयातीचे प्रमाण कमी हाेताना दिसत नाही. पाेलीस २४ तास पाहारा देऊ शकत नसल्याचा गैरफायदा घेतला जात आहे.

बंदीऐवजी जनजागृतीवर भर हवा

मुळात दारू ही वाईट आहे तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात आणि देशभरात ती विक्री करण्यावर, पिण्यावर मनाई का केली जात नाही? केवळ एका जिल्ह्यावर अशी बंदी घालणे हे अन्यायकारक आहे. दारू प्रमाणापेक्षा जास्त घेणे, त्याची सवय जडणे किंवा दारू नकली असणे यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. प्रमाणात घेतलेली दारू ही वाईट नाही.- ॲड. मृणाल मेश्राम

गेल्या ३० वर्षांपासून या जिल्ह्यात सुरू असलेली फसवी दारूबंदी अजून किती दिवस सामान्य नागरिकांना फसवत राहणार आहे? केवळ काही लोकांच्या फायद्यासाठी दारूबंदी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणे योग्य नाही. जिल्ह्यातील दारूबंदी केवळ कागदोपत्री आहे हे कोणालाही कळते, मग अशी निरर्थक दारूबंदी उठवत का नाही?- दिलीप मोटवानी

कोणत्याही गोष्टीला विरोध केला की त्याचे आकर्षण वाढते. गडचिरोलीत नेमके हेच होत आहे. मी दारूबंदी ठेवा किंवा उठवा यापेक्षा दारूबंदीचा एवढा बाऊ कशासाठी हे कळत नाही. दारू विक्री सुरू केली तर लोक कदाचित कमी प्रमाणात पितील. कारण त्याचे आकर्षण कमी होईल. शिवाय नकली दारूलाही आळा बसेल. वास्तविक निव्वळ बंदी लादल्याने लोक दारू पिणार नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे. त्यापेक्षा लोकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.            - मनोज देवकुले

 

टॅग्स :liquor banदारूबंदी