शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवसेंदिवस घटस्फोटांचे प्रमाण का वाढतेय? खरंच कुटुंब व्यवस्था धोक्यात आली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:36 IST

Gadchiroli : वाढला संशयकल्लोळ ! सात जन्माचे नाते एका अर्जाने तुटले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या काही दिवसांत सोशल मीडियाचे अनेक वाईट परिणाम बघायला मिळत आहेत. याच सोशल मीडियाचा आणखी एक विपरित परिणाम समोर येतोय, तो म्हणजे सोशल मीडियामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढत चालले आहे. हे प्रमाण असेच कायम राहिल्यास कुटुंब व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील अत्यंत व्यस्त आणि वेगवान जीवनशैलीमुळे अनेकांच्या आयुष्यात विविध स्तरावर सातत्याने तणाव वाढत चालला आहे. त्यात सोशल मीडियामुळे नात्यांवरही विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. याच सोशल मीडियामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहेत. सोशल मीडियाचे काही फायदे जरूर आहेत. मात्र, त्याचा अतिरेकी वापर त्रासदायक होत चालला आहे. 

सोशल मीडियातील अनावश्यक वृत्तांमुळे मानसिक तणाव वाढत चालले आहेत. दोन समाजात विरोध निर्माण करण्याचे सर्वात मोठे व्यासपीठ सोशल मीडिया बनत आहे. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हा भविष्यासाठी अतिशय धोक्याचा आहे. काही नागरिकांना तर सोशल मीडियावर नेहमी सतर्क राहण्याचे व्यसन जडले आहे.

स्वतंत्र जगायचे आहे ?कुटुंबात राहताना काही मर्यादा पाळाव्या लागतात. मात्र, या मर्यादांना काही जण बंधने समजतात. आपणाला स्वतंत्र जगायचे आहे, असे सांगून पतीपासून फारकत घेतात.

वर्षभरात किती घटस्फोट ?जिल्ह्यात वर्षभराच्या कालावधीत जवळपास २०० घटस्फोट होतात. ही आकडेवारी कुटुंब व्यवस्था धोक्यात आणणारीच आहे. पुढे हे प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे. ही धोक्याची घंटा आहे.

समेट किती प्रकरणांत ?न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात न्यायालय दोघांत समेट घडवण्याचा प्रयत्न करते. दोघांचीही समजूत घातली जाते. मात्र, काही प्रकरणांत महिलेला घटस्फोट आवश्यक असतो. त्यावेळी मात्र न्यायालयाचा नाईलाज होते. अशा प्रकरणात न्यायालय घटस्फोट मंजूर करते.

काय आहेत घटस्फोटाची नेमकी कारणे ?

  • सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवणे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वैवाहिक संबंध संशयाच्या भोवऱ्यात येतात. सोशल मीडियामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालवल्याने संवाद कमी होतो.
  • सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नात्यांमधील कमी होत चाललेला संवाद हा या घटस्फोटांचे महत्त्वाचे कारण आहे. आधीच नोकरीतील तणाव, आर्थिक जुळवाजुळव करताना पती-पत्नीच्या नात्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. त्यात आता सोशल मीडियाचाही नात्यांवर परिणाम होऊ लागला आहे.
  • सोशल मीडियाचा वापर करताना रात्री उशिरापर्यंत अनेकजण जागे राहतात. याचा थेट परिणाम सकाळी उठण्यावर होतो. कामाची वेळ १० वाजताची असेल तर ८ वाजेपर्यंत झोपून राहत असल्यामुळे उठल्याबरोबर कार्यालयात जाण्याची तयारी करावी लागते. परिणामी कुटुंबासोबत संवाद साधता येत नाही. याचा थेट परिणाम कुटुंबातील संबंधांवर दिसून येते. त्यामुळे सोशल मीडियाचा जपूनच वापर करणे आवश्यक आहे.
टॅग्स :Divorceघटस्फोटGadchiroliगडचिरोली