शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

ग्रामसभांची आर्थिक कोंडी कोण फोडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:47 IST

राज्यात सर्वाधिक आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १६८८ महसुली गावांपैकी जवळपास १४०० गावांमध्ये पेसा कायदा लागू आहे. या कायद्यामुळे वनोपजांवर ग्रामसभांना मालकी हक्क मिळाला आहे.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात सर्वाधिक आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १६८८ महसुली गावांपैकी जवळपास १४०० गावांमध्ये पेसा कायदा लागू आहे. या कायद्यामुळे वनोपजांवर ग्रामसभांना मालकी हक्क मिळाला आहे. त्यातून गावालगतच्या वनांचे व्यवस्थापन व त्यावरील वनोपजांची विक्री करण्याचा अधिकार त्यांना मिळाला. त्यामुळे अलिकडे पेसाअंतर्गत गावांना बऱ्यापैकी पैसा मिळत असताना यावर्षी मात्र या गावांची आर्थिक घडीच विस्कटण्याच्या मार्गावर आहे. सर्वाधिक पैसा मिळवून देणाऱ्या तेंदू पानांच्या खरेदीसाठी यावर्षी कंत्राटदारच मिळेनासे झाले. जे आले त्यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत २५ टक्केही भाव देण्याची तयारी दर्शविली नाही. विडी उद्योगाला आलेली मंदी हे त्यामागील एक कारण असले तरी त्यामागे मोठे अर्थकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदार, वनविभागाचे अधिकारी, विडी कंपन्या अशी साखळी करून ग्रामसभांना कोंडीत पकडण्याचा डाव असेल तर हे अत्यंत दुर्दैवी चित्र म्हणावे लागेल. अशावेळी सरकारने हात वर न करता यात लक्ष घालणे गरजेचे आहे.एकूण क्षेत्रफळापैकी ७६ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वनसंपदाही विपूल प्रमाणात आहे. गावालगतच्या विशिष्ट परिसरातील तेंदूपत्ता, बांबू, मोहफूल विक्री करण्याचा अधिकार पेसा कायद्याने ग्रामसभांना दिला आहे. पूर्वी या सर्व वनसंपदेवर केवळ वनविभागाचा हक्क होता. त्यातून वनविभागाचे अनेक अधिकारी मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट देऊन स्वत:ही गब्बर झाले. पण पेसा कायद्याने ग्रामसभांना तो हक्क मिळाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ग्रामसभा स्वत: लिलाव प्रक्रिया राबवत आहे. वनौपजांपैकी सर्वाधिक प्रमाणात महसूल देणाºया तेंदूपत्त्याने गेल्यावर्षी अनेक ग्रामसभांना अपेक्षेपेक्षा जास्त महसूल दिला. त्यामुळे यावर्षी मोठी आस लावून बसलेल्या ग्रामसभांचा कंत्राटदारांनी मात्र अपेक्षाभंग केला. एकदा, दोनदा लिलाव जाहीर करूनही कंत्राटदारांनी लिलावाकडे पाठ फिरविली. यावर्षी १ हजार १७१ ग्रामसभांनी तेंदूपत्ता संकलन स्वत: करण्याचे ठरविले होते, पण वारंवार लिलाव प्रक्रिया केल्यानंतर अवघ्या ४३५ ग्रामसभांमधील तेंदूपत्त्यांचा लिलाव होऊ शकला. त्यातही मिळालेला दर अगदीच कमी. गेल्यावर्षी ज्या तेंदूपत्त्याचा दर २४ हजार रूपये प्रती स्टँडर्ड बॅग (एक हजार पुडे) पर्यंत पोहोचला होता त्याला यावर्षी मात्र अवघ्या ४ हजार रुपये प्रति स्टँडर्ड बॅग एवढ्या दरावर समाधान मानावे लागत आहे. नाईलाज म्हणून ग्रामसभा आता फूल नाही तर फुलाची पाकळी मिळेल म्हणून कंत्राटदारांच्या या व्यवहारापुढे हतबल होऊन नांगी टाकत आहेत. खरे तर यात ग्रामसभांचेच नाही तर तेंदूपत्ता हंगामावर विसंबून राहणाºया मजुरांचेही आर्थिक नुकसान होत आहे.गेल्या चार दशकांपासून नक्षल्यांच्या दहशतीत वावरताना विकास कामांपासून कोसो दूर असलेल्या गडचिरोलीतील आदिवासीबहुल ग्रामसभांना पेसा कायद्यामुळे मिळालेला हक्क त्यांच्या आर्थिक विकासातील महत्वाचा टप्पा आहे. त्यातून अनेक ग्रामसभांनी गावात विविध सोयीसुविधाही निर्माण करणे सुरू केले आहे. मात्र यावर्षी तेंदूपत्ता लिलावात ज्या पद्धतीने या ग्रामसभांची आर्थिक कोंडी करण्यात आली त्यावरून यात मोठे अर्थकारण शिजत असल्याचा वास येत आहे.ज्या गावांना राज्य शासन अनेक वर्षात सुविधा पुरवू शकले नाही ती गावं स्वयंपूर्ण होऊन स्वत:च आपला विकास घडवून आणत असेल तर हे चांगलेच आहे. मात्र त्या ग्रामसभांच्या आर्थिक कोंडीतून कोणी त्यांच्या विकासात अडसर निर्माण करीत असेल तर सरकारने त्यांना वाºयावर सोडून न देता योग्य ती दखल देणे गरजेचे आहे. वेळप्रसंगी सरकारने किमान हमीभाव देऊन तेंदूपानांची खरेदी केल्यास ग्रामसभांना मोठा दिलासा मिळाल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत