शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

उमेदवारांच्या जय-पराजयाचे श्रेय आणि जबाबदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

अहेरीतून पुन्हा अम्ब्रिशराव यांना उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये धुसफूस होती. त्यातूनच संघाच्या गोटातून दुसरेचे नाव चालविण्यात आले. पण वरिष्ठांनी अम्ब्रिशराव यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपने सर्व फळी त्यांच्या बाजुने उभी केली. असे असली तरी अम्ब्रिशराव यांची राजगादीच त्यांच्या प्रतिमेत अडसर ठरली. त्यांनी ‘महाराज’ म्हणून नाही तर ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून आमच्याशी वागावे ही अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही. त्याचा फटका त्यांना मतांच्या रूपात बसला.

ठळक मुद्देसंडे अँकर । उमेदवारांच्या प्रतिमेसह नेत्यांच्या मेहनतीने यश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१४ च्या निवडणुकीत गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी या तीनही मतदार संघात भाजपने नव्या दमाच्या उमेदवारांना रिंगणात उतरविले होते. भाजपच्या लाटेत त्यावेळी प्रथमच तीनही मतदार संघात या उमेदवारांनी बाजी मारली. पण यावेळी त्या उमेदवारांचा कस लागणे स्वाभाविक होते. उमेदवारांची वैयक्तिक कामगिरी आणि मतदारांमध्ये असलेली प्रतिमा, भाजपच्या कार्यकर्त्यांचे बुथस्तरापर्यंतचे नेटवर्क, विविध उपक्रमातून केलेली पक्ष बांधणी आणि सत्ताधारी असल्यामुळे सरकारची प्रतिमा, अशा सर्वच बाजुने भक्कम असणे जिंकण्यासाठी आवश्यक होते. मात्र अहेरीत काही कमकुवत बाजूंमुळे निवडणूक जिंकण्याचे गणित बिघडले.अहेरीतून पुन्हा अम्ब्रिशराव यांना उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये धुसफूस होती. त्यातूनच संघाच्या गोटातून दुसरेचे नाव चालविण्यात आले. पण वरिष्ठांनी अम्ब्रिशराव यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपने सर्व फळी त्यांच्या बाजुने उभी केली. असे असली तरी अम्ब्रिशराव यांची राजगादीच त्यांच्या प्रतिमेत अडसर ठरली. त्यांनी ‘महाराज’ म्हणून नाही तर ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून आमच्याशी वागावे ही अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही. त्याचा फटका त्यांना मतांच्या रूपात बसला.गडचिरोली आणि अहेरीत भाजपच्या विजयात प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवारांचा कमकुवतपणाही काही अंशी कामी आला. गडचिरोलीत भाजपच्या शिस्तबद्ध यंत्रणेपुढे काँग्रेसच्या नवख्या उमेदवार टिकाव धरू शकल्या नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून किशन नागदेवे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर तीनही उमेदवारांसाठी त्यांनी भाजपची फळी कामी लावली. अहेरीत बाजू कमकुवत असल्याचे लक्षात आल्यानंतर कमीत कमी वेळेत अमित शहांच्या सभेचे नियोजन केले. त्याचा फायदाही झाला, पण तो विजयात रुपांतरित होऊ शकला नाही.आरमोरीत वरकरणी निवडणूक सोपी वाटत असली तरी पुन्हा कौल मिळणे एवढे सोपे नव्हते. या मतदार संघाच्या सभोवती असलेल्या आमगाव, अर्जुनी मोरगाव, साकोली आणि ब्रह्मपुरी या चारही मतदार संघात भाजपला यश मिळाले नाही. अशा वातावरणात आरमोरीची जागा टिकवणे कठीण होते. मात्र भाजपच्या फळीसह सहकार नेते अरविंद सा.पोरेड्डीवार यांचे मार्गदर्शन, प्रकाश पोरेड्डीवार यांनी किंगमेकरच्या भूमिकेत ठेवलेली पकड या जमेच्या बाजू ठरल्या. त्यामुळे गजबे यांचे मताधिक्य गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ९ हजारांनी वाढले.पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात भाजपला अनपेक्षित फटका बसला. शेवटच्या टोकावरचा गडचिरोली जिल्हाही त्यासाठी अपवाद नाही. मात्र लगतच्या भागात भाजपने जागा गमावल्या असताना गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघाने पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवारांना कौल दिला. त्या उमेदवारांच्या विजयाचे श्रेय कुणाचे आणि अहेरी मतदार संघातील पराजयाची जबाबदारी कुणाची, यावर आता काथ्याकूट सुरू आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली