शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जेवण तर चांगले देताच स्वच्छताही बाळगा ; कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:13 IST

Gadchiroli : अन्न प्रशासन करते कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरात खवय्यांची कमी नाही. हॉटेल व ढाब्यावरील जेवण करण्याची अनेकांना आवड आहे. हॉटेल व ढाब्यावरील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक कुटुंबं आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा तरी जातात; परंतु, येथे स्वच्छता पाळली जाते काय, हा प्रश्न आहे. केवळ हॉटेल चकचकीत ठेवून चालत नाही तर स्वयंपाकगृहात स्वच्छता नसेल तर परवाना निलंबित तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते.

हॉटेल, ढाबे तसेच खाद्यपदार्थाची विक्री होणाऱ्या प्रत्येक प्रतिष्ठानची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित केली जाते. हे काम सातत्याने सुरू असले तरी काही हॉटेलचालक नियमांचे पालन करीत नाही. यामुळेच हॉटेल्स चकाचक दिसत असले तरी त्यांचे किचन मात्र गलिच्छ असते, अस्वच्छता आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. गडचिरोली शहरात २० च्यावर लहान-मोठे हॉटेल आहेत. यापैकी जवळपास १० हॉटेल मोठे असून, दिसायला चकचकित आहेत. तेथे खानपानविषयक सर्वच सुविधा उपलब्ध आहेत; परंतु, अनेकदा येथेही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. प्रसंगी परवाना निलंबनासह फौजदारी कारवाईसुद्धा केली जाते. किचनमध्ये स्वच्छता नसल्यास किवा खाद्यपदार्थांच्या नमुन्यात त्रुटी आढळून आल्यास कारवाईपूर्वी हॉटेलचालकांना सुधारणा करण्याची संधी पत्राद्वारे दिली जाते. सुधारणा न झाल्यास कारवाई केली जाते. किचनमध्ये स्वच्छता नसल्यास किवा खाद्यपदार्थांच्या नमुन्यात त्रुटी आढळून आल्यास कारवाईपूर्वी हॉटेलचालकांना सुधारणा करण्याची संधी पत्राद्वारे दिली जाते. सुधारणा न झाल्यास कारवाई केली जाते. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली