शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शासन कुठे झोपलंय? खतांच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 18:32 IST

सहा हजार टन खत आवश्यक : निंदनानंतर मागणी वाढणार, काळाबाजार होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धान रोवणीच्या कालावधीत संयुक्त खताचा तुटवडा होता. आता संयुक्त खत पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे; मात्र युरियाचा तुटवडा निर्माण होणार आहे. कृषी विभागाने खताची मागणी केली आहे. खत वेळेवर उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांची मोठी पंचाईत होऊ शकते.

धान रोवणीच्या कालावधीत प्रामुख्याने संयुक्त खताचा वापर धान पिकासाठी केला जातो. धान पिकाच्या रोवणीनंतर जवळपास एक महिन्याच्या अंतराने रासायनिक खताचा दुसरा डोस देतात. यात काही शेतकरी संयुक्त खत तर काही शेतकरी सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया या दोन खताचे मिश्रण वापरतात. ही दोन्ही खते अतिशय स्वस्त आहेत; मात्र ही खते उपलब्ध न झाल्यास शेवटी संयुक्त खताचा वापर केला जातो. अशावेळी संयुक्त खतांची मागणी वाढून त्यांचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढील १५ दिवसांमध्ये युरिया खत उपलब्ध होणे आवश्यक आहे.

कृषी विभागाचे प्रयत्न सुरू

  • चार दिवसांच्या कालावधीत एक हजार क्विंटल संयुक्त खत उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत १,२०० मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होईल.
  • युरिया खताची सध्या जिल्ह्यात आवश्यकता आहे. सप्टेंबर महिन्यात युरिया खताची मागणी वाढणार आहे. त्यामुळे सदर खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाचे कृषी संचालक पुणे यांच्याकडे केली आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सातत्याने पाठपुरावा करीत आहे.

खताचा साठा कितीखत           साठा (टन)युरिया          १,३२५डीएपी           ३३३एमओपी        ६१३एसएसपी      २,१४०एनपीके        २,१०८एकूण           ६,५१९

निकृष्ट दर्जाच्या खताचा पुरवठायावर्षी हंगामाच्या अगदी सुरुवातीपासून रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला होता. आजपर्यंत नाव न ऐकलेल्या कंपन्यांचे खत जिल्ह्यात विक्रीसाठी आले होते. अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव सदर खत खरेदी केले मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. कमी दर्जाचे खत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. खताचा अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने दुबार खत द्यावे लागले.

जिल्ह्यात सहा हजार टन युरिया आवश्यकपोळ्याच्या नंतर निंदनाच्या कामाला वेग येणार आहे. निंदनाचे काम संपताच शेतकरी धान पिकाला युरिया देतात. हा दरवर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. जिल्ह्यात सध्या १,३२५ मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्याला पुन्हा सहा हजार मेट्रिक टन खताची गरज भासणार आहे.

शेतकऱ्यांची लूटयुरियाची शासकीय किंमत २६६.५० रुपये प्रतिबॅग एवढी आहे. या खतावर सरकारकडून मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जाते. त्यामुळे हे खत स्वस्त आहे तसेच गरीब शेतकरी या खताचा वापर करतात. तसेच नियमानुसार सरकारने ठरवून दिलेल्या किमतीच्या एकही रुपया अधिकचा घेता येत नाही; मात्र खत विक्रेते या खताची टंचाई लक्षात घेऊन ३५० ते ४०० रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करतात.

टॅग्स :FertilizerखतेFarmerशेतकरीfarmingशेतीGadchiroliगडचिरोली