शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

पॅसेंजर रेल्वे अनलॉक कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:00 IST

शासनाने लोकडाऊनच्या काळात पॅसेंजर रेल्वे सुरू केली नसली तरी मालवाहू गाड्या सुरू ठेवल्या आहेत. त्यांचे प्रमाण काहीसे वाढले आहे. वडसावरून सध्याच्या परिस्थितीत  दररोज  ३० मालवाहू गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला त्याचा मोबदला मिळत आहे. तरी पॅसेंजर रेल्वे सुरू केली तर सामान्य जनतेसाठी मोठी गैरसोय दूर होणार आहे. 

दयाराम फटिंगलाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कोरोनाचा संसर्ग सामान्य जनतेला होऊ नये यासाठी शासनाने दीड वर्षापूर्वी ‘लॉकडाऊन’ची घोषणा करून सर्व पॅसेंजर रेल्वे बंद केल्या. आजघडीला कोरोना बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे. त्यामुळे सर्व व्यवहार हळूहळू ‘अनलॉक’ होत आहेत. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाच्या असणाऱ्या पॅसेंजर रेल्वेच अजूनही लॉक का? असा प्रश्न तमाम रेल्वे प्रवाशांच्या मनात उठत आहे.कोविड-१९ या   संसर्गजन्य विषाणूचा  जनतेच्या  आरोग्यावर परिणाम होऊ नये तसेच त्यांचा बळी जाऊ नये म्हणून केंद्र शासनाने मार्च २०२० ला लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यामुळे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. यात कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन अनेकांचा बळीही गेला. मात्र आता दुसरी लाट जवळजवळ संपण्याच्या स्थितीत असल्यानेच इतर व्यवहारांमध्ये शासनाने सूट दिली आहे. एसटी बसेसचा प्रवास तर खूप आधीपासून सुरू आहे. एवढेच नाही तर अनेक एक्स्प्रेस गाड्याही सुरू झाल्या. मग सामान्य जनतेच्या पॅसेंजर रेल्वे प्रवासासाठीच आडकाठी का, असा प्रश्न केला जात आहे. शासकीय नियमांच्या अधीन राहून पॅसेंजर रेल्वे  सुरू कराव्यात अशी प्रवाशांची भावना आहे. 

मालवाहू वाहनातून वाढली कमाई

शासनाने लोकडाऊनच्या काळात पॅसेंजर रेल्वे सुरू केली नसली तरी मालवाहू गाड्या सुरू ठेवल्या आहेत. त्यांचे प्रमाण काहीसे वाढले आहे. वडसावरून सध्याच्या परिस्थितीत  दररोज  ३० मालवाहू गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला त्याचा मोबदला मिळत आहे. तरी पॅसेंजर रेल्वे सुरू केली तर सामान्य जनतेसाठी मोठी गैरसोय दूर होणार आहे. 

कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाल्यामुळे इतर बाबीप्रमाणे शासकीय नियमांच्या अधीन राहून ज्या प्रवाशांनी  कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतले असतील, त्यांना तसे प्रमाणपत्र दाखवून किंवा तसे नसेल तर आरटीपीसीआर  चाचणीचा अहवाल दाखवून  प्रवासाची संधी दिली जाऊ शकते. यात दररोज किमान एक पॅसेंजर रेल्वे सोडली तरी प्रवाशांची बरीच सोय होईल.  - रितेश कुमार, स्टेशन मास्टर, वडसा

दररोज चालायच्या ८ पॅसेंजर, १५०० पर्यंत प्रवासीकोविड-१९ या महामारीपूर्वी वडसा रेल्वे स्टेशनवरून दररोज ८ पॅसेंजर गाड्या आणि आठवड्याला ६ अतिजलद  सुपरफास्ट गाड्या धावत होत्या.   ुपॅसेंजर गाड्यांमध्ये चांदाफोर्ट ते गोंदिया या प्रमुख गाडीचा समावेश होता. जलद गाड्यांमध्ये बिलासपूर-चेन्नई, यशवन्तपूर-कोरबा, दरभंगा-सिकंदराबाद या लांब पल्ल्याच्या व अतिजलद गाड्यांचा समावेश होता. वडसा रेल्वे स्टेशनवरून बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांची संख्या दररोज १२०० ते  १५०० एवढी राहात होती. त्यातून दररोज अंदाजे  एक ते दिड लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळत होते. सध्या त्या उत्पन्नापासून रेल्वेला वंचित राहावे लागत आहे. 

गजबजून राहणारे रेल्वे स्टेशन भकासनेहमी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यत गजबजून राहणारे वडसा हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक आज मात्र भकास वाटत आहे. हे स्टेशन मूक व शून्य नजरेने प्रवाशांची वाट पाहात आहे. सध्या या स्टेशनवर फक्त रेल्वे कर्मचारी आपली दैनंदिन कामे करीत असतात. अधूनमधून येणाऱ्या जाणाऱ्या मालगाडीचा हॉर्न तेवढा ऐकायला मिळतो. बाकी वेळ उदासीनता दिसत आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे