शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर रेल्वे अनलॉक कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:00 IST

शासनाने लोकडाऊनच्या काळात पॅसेंजर रेल्वे सुरू केली नसली तरी मालवाहू गाड्या सुरू ठेवल्या आहेत. त्यांचे प्रमाण काहीसे वाढले आहे. वडसावरून सध्याच्या परिस्थितीत  दररोज  ३० मालवाहू गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला त्याचा मोबदला मिळत आहे. तरी पॅसेंजर रेल्वे सुरू केली तर सामान्य जनतेसाठी मोठी गैरसोय दूर होणार आहे. 

दयाराम फटिंगलाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कोरोनाचा संसर्ग सामान्य जनतेला होऊ नये यासाठी शासनाने दीड वर्षापूर्वी ‘लॉकडाऊन’ची घोषणा करून सर्व पॅसेंजर रेल्वे बंद केल्या. आजघडीला कोरोना बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे. त्यामुळे सर्व व्यवहार हळूहळू ‘अनलॉक’ होत आहेत. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाच्या असणाऱ्या पॅसेंजर रेल्वेच अजूनही लॉक का? असा प्रश्न तमाम रेल्वे प्रवाशांच्या मनात उठत आहे.कोविड-१९ या   संसर्गजन्य विषाणूचा  जनतेच्या  आरोग्यावर परिणाम होऊ नये तसेच त्यांचा बळी जाऊ नये म्हणून केंद्र शासनाने मार्च २०२० ला लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यामुळे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. यात कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन अनेकांचा बळीही गेला. मात्र आता दुसरी लाट जवळजवळ संपण्याच्या स्थितीत असल्यानेच इतर व्यवहारांमध्ये शासनाने सूट दिली आहे. एसटी बसेसचा प्रवास तर खूप आधीपासून सुरू आहे. एवढेच नाही तर अनेक एक्स्प्रेस गाड्याही सुरू झाल्या. मग सामान्य जनतेच्या पॅसेंजर रेल्वे प्रवासासाठीच आडकाठी का, असा प्रश्न केला जात आहे. शासकीय नियमांच्या अधीन राहून पॅसेंजर रेल्वे  सुरू कराव्यात अशी प्रवाशांची भावना आहे. 

मालवाहू वाहनातून वाढली कमाई

शासनाने लोकडाऊनच्या काळात पॅसेंजर रेल्वे सुरू केली नसली तरी मालवाहू गाड्या सुरू ठेवल्या आहेत. त्यांचे प्रमाण काहीसे वाढले आहे. वडसावरून सध्याच्या परिस्थितीत  दररोज  ३० मालवाहू गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला त्याचा मोबदला मिळत आहे. तरी पॅसेंजर रेल्वे सुरू केली तर सामान्य जनतेसाठी मोठी गैरसोय दूर होणार आहे. 

कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाल्यामुळे इतर बाबीप्रमाणे शासकीय नियमांच्या अधीन राहून ज्या प्रवाशांनी  कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतले असतील, त्यांना तसे प्रमाणपत्र दाखवून किंवा तसे नसेल तर आरटीपीसीआर  चाचणीचा अहवाल दाखवून  प्रवासाची संधी दिली जाऊ शकते. यात दररोज किमान एक पॅसेंजर रेल्वे सोडली तरी प्रवाशांची बरीच सोय होईल.  - रितेश कुमार, स्टेशन मास्टर, वडसा

दररोज चालायच्या ८ पॅसेंजर, १५०० पर्यंत प्रवासीकोविड-१९ या महामारीपूर्वी वडसा रेल्वे स्टेशनवरून दररोज ८ पॅसेंजर गाड्या आणि आठवड्याला ६ अतिजलद  सुपरफास्ट गाड्या धावत होत्या.   ुपॅसेंजर गाड्यांमध्ये चांदाफोर्ट ते गोंदिया या प्रमुख गाडीचा समावेश होता. जलद गाड्यांमध्ये बिलासपूर-चेन्नई, यशवन्तपूर-कोरबा, दरभंगा-सिकंदराबाद या लांब पल्ल्याच्या व अतिजलद गाड्यांचा समावेश होता. वडसा रेल्वे स्टेशनवरून बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांची संख्या दररोज १२०० ते  १५०० एवढी राहात होती. त्यातून दररोज अंदाजे  एक ते दिड लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळत होते. सध्या त्या उत्पन्नापासून रेल्वेला वंचित राहावे लागत आहे. 

गजबजून राहणारे रेल्वे स्टेशन भकासनेहमी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यत गजबजून राहणारे वडसा हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक आज मात्र भकास वाटत आहे. हे स्टेशन मूक व शून्य नजरेने प्रवाशांची वाट पाहात आहे. सध्या या स्टेशनवर फक्त रेल्वे कर्मचारी आपली दैनंदिन कामे करीत असतात. अधूनमधून येणाऱ्या जाणाऱ्या मालगाडीचा हॉर्न तेवढा ऐकायला मिळतो. बाकी वेळ उदासीनता दिसत आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे