शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

तोडसा, पेठा, गर्दैवाड्यात लालपरी पोहोचणार तरी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 17:39 IST

Gadchiroli : पाच ते दहा किलोमीटर पायदळ वाट तुडवत नागरिकांना जावे लागते तालुका मुख्यालयी

लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी: नक्षल प्रभावित व दुर्गम तालुका म्हणून अहेरीची ओळख आहे. या तालुक्यात अद्यापही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट झालेली नाही. काही गावांमध्ये अद्यापही लालपरी पोहोचलेलीच नाही. पाच ते दहा किलोमीटर पायदळ वाट तुडवत नागरिकांना तालुका मुख्यालयी यावे लागते, असे चित्र आहे.

आकांक्षित जिल्हा म्हणून अहेरीत विकासकामे प्राधान्याने सुरु आहेत. मात्र, रस्ते, पुलाचा प्रश्न काही दुर्गम, अतिदुर्गम गावांमध्ये कायम आहे. परिणामी तेथे अद्यापही राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरु केलेली नाही. अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील मांड्रा, कासमपल्ली, एटापल्ली तालुक्यातील तोडसापेठा, गर्दैवाडा, बांडे, कोंदावाही, वेडमपल्ली, भामरागड तालुक्यातील विसामुंडी, लष्कर अशा अनेक गावांत आजही एसटी बस पोहोचली नाही. तालुका मुख्यालयी जाण्यासाठी येथील नागरिकांना खासगी वाहने किंवा पायदल जावे लागते

अहेरी आगारातून सुटणाऱ्या बसेस आजही अनेक दुर्गम, अतिदुर्गम भागात पोहोचत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी खराब रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे तेथे बसेस जाऊ शकत नाहीत, अशी भौगोलिक स्थिती आहे. रस्ते झाल्याशिवाय एसटी पोहोचणार नाही. त्यासाठी सरकारने धोरण बदलणे गरजेचे आहे.- सुचित कोडेलवार, प्रवासी, अहेरी

हेरी उपविभागात अनेक गावांत आज रस्ते झाले आहेत. मात्र, अद्याप बससेवा सुरु करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो आणि अहेरी गाठायला उशीर होतो. खासगी वाहनचालकांकडून आर्थिक लूटही होते. पावसाळ्याच्या दिवसांत रुग्ण, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात. ही दैना लवकर संपवावी, अशी अपेक्षा आहे.- बालाजी गावडे, प्रवासी

ज्या गावकऱ्यांना आपल्या गावात बसफेरी सुरु करायची असेल तिथे ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन मागणी करायला हवी. त्यानंतर सव्र्व्हे करून सुरक्षितता बघून बसफेरी सुरु केली जाते. नागरिकांनी मागणी केल्यास योग्य दखल घेतली जाईल.- जितेंद्र राजवैद्य, वाहतूक निरीक्षक अहेरी आगार 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली