शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तोडसा, पेठा, गर्दैवाड्यात लालपरी पोहोचणार तरी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 17:39 IST

Gadchiroli : पाच ते दहा किलोमीटर पायदळ वाट तुडवत नागरिकांना जावे लागते तालुका मुख्यालयी

लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी: नक्षल प्रभावित व दुर्गम तालुका म्हणून अहेरीची ओळख आहे. या तालुक्यात अद्यापही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट झालेली नाही. काही गावांमध्ये अद्यापही लालपरी पोहोचलेलीच नाही. पाच ते दहा किलोमीटर पायदळ वाट तुडवत नागरिकांना तालुका मुख्यालयी यावे लागते, असे चित्र आहे.

आकांक्षित जिल्हा म्हणून अहेरीत विकासकामे प्राधान्याने सुरु आहेत. मात्र, रस्ते, पुलाचा प्रश्न काही दुर्गम, अतिदुर्गम गावांमध्ये कायम आहे. परिणामी तेथे अद्यापही राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरु केलेली नाही. अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील मांड्रा, कासमपल्ली, एटापल्ली तालुक्यातील तोडसापेठा, गर्दैवाडा, बांडे, कोंदावाही, वेडमपल्ली, भामरागड तालुक्यातील विसामुंडी, लष्कर अशा अनेक गावांत आजही एसटी बस पोहोचली नाही. तालुका मुख्यालयी जाण्यासाठी येथील नागरिकांना खासगी वाहने किंवा पायदल जावे लागते

अहेरी आगारातून सुटणाऱ्या बसेस आजही अनेक दुर्गम, अतिदुर्गम भागात पोहोचत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी खराब रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे तेथे बसेस जाऊ शकत नाहीत, अशी भौगोलिक स्थिती आहे. रस्ते झाल्याशिवाय एसटी पोहोचणार नाही. त्यासाठी सरकारने धोरण बदलणे गरजेचे आहे.- सुचित कोडेलवार, प्रवासी, अहेरी

हेरी उपविभागात अनेक गावांत आज रस्ते झाले आहेत. मात्र, अद्याप बससेवा सुरु करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो आणि अहेरी गाठायला उशीर होतो. खासगी वाहनचालकांकडून आर्थिक लूटही होते. पावसाळ्याच्या दिवसांत रुग्ण, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात. ही दैना लवकर संपवावी, अशी अपेक्षा आहे.- बालाजी गावडे, प्रवासी

ज्या गावकऱ्यांना आपल्या गावात बसफेरी सुरु करायची असेल तिथे ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन मागणी करायला हवी. त्यानंतर सव्र्व्हे करून सुरक्षितता बघून बसफेरी सुरु केली जाते. नागरिकांनी मागणी केल्यास योग्य दखल घेतली जाईल.- जितेंद्र राजवैद्य, वाहतूक निरीक्षक अहेरी आगार 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली