शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काेट्यवधी रुपयांच्या या बेवारस वाहनांचे कारायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

ज्या वाहनामुळे अपघात हाेऊन एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असल्यास सदर वाहन अपशकून मानल्या जाते. त्या वाहनामुळे अपघाताची आठवण हाेत असल्याने नागरिक सदर वाहन घरी घेऊन जाण्यास तयार हाेत नाही. तसेच कधी कधी वाहन माेठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने ते दुरुस्त करण्यास माेठा खर्च येत असल्याने वाहन परत नेले जात नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : वाहनाने एखादा अपघात किंवा गुन्हा घडल्यानंतर पाेलीस सदर वाहन जप्त करतात. वाहनाची कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित मालकाला वाहन घरी परत नेता येते. मात्र बहुतांश वाहनमालक अपघात झालेले वाहन घरी परत नेत नाही. परिणामी पाेलीस स्टेशनच्या आवारांमध्ये काेट्यवधी रुपयांची शेकडाे वाहने पडून आहेत. या वाहनांमुळे पाेलीस स्टेशनला जागा अपुरी पडत असल्याने या वाहनांचे करायचे काय, असा प्रश्न पाेलिसांसमाेर निर्माण हाेत आहे. गुन्हा घडल्यानंतर संबंधित वाहन नेमके कुणाच्या मालकीचे आहे, त्या वाहनाचा विमा काढला आहे काय, पीयूसी आहे काय, या सर्व बाबी आरटीओ कार्यालयामार्फत तपासल्या जातात. या सर्व बाबी तपासल्यानंतर वाहन संबंधित मालक परत नेऊ  शकते. 

 बहुतांश वाहने झाली भंगार गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये मागील आठ वर्षांपासूनची वाहने पडून आहेत. आठ वर्षे ऊन व पावसामुळे ही वाहने भंगार झाली आहेत. मशीन गंजल्या आहेत. गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये जवळपास २०० वाहने आहेत. ही वाहने आता भंगारात विकल्याशिवाय पर्याय नाही. 

या वाहनांनी व्यापली पाेलीस स्टेशनची जागाक्षतिग्रस्त वाहने पाेलीस स्टेशनमध्ये पडून आहेत. या वाहनांनी जागा व्यापली असल्याने पाेलीस स्टेशनला जागा कमी पडत आहे. त्यामुळे या वाहनांचे काय करावे, असा माेठा प्रश्न पाेलिसांसमाेर पडला आहे. 

वाहनाबद्दल चुकीची समजूतज्या वाहनामुळे अपघात हाेऊन एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असल्यास सदर वाहन अपशकून मानल्या जाते. त्या वाहनामुळे अपघाताची आठवण हाेत असल्याने नागरिक सदर वाहन घरी घेऊन जाण्यास तयार हाेत नाही. तसेच कधी कधी वाहन माेठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने ते दुरुस्त करण्यास माेठा खर्च येत असल्याने वाहन परत नेले जात नाही.

अपघातांचे प्रमाण वाढले-   वाहनांची संख्या वाढण्याबराेबरच अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विमा काढणे आवश्यक आहे. किमान थर्डपार्टी विमा तरी काढावा.

 

टॅग्स :Policeपोलिस