शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

मतांमध्ये फेरफार करणारे काय न्याय देतील? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:04 IST

Gadchiroli : गडचिरोलीतून सत्ताधाऱ्यांवर निशाणा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत मतदारसंख्येत मोठी वाढ झाली आहे. हे नेमके कसे शक्य आहे? मतदार यादीत फेरफार करून महायुती सत्तेत आली आहे. मतांमध्येच फेरफार करणारे सरकार शेतकऱ्यांना काय न्याय देणार? असा सवाल असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १२ जून रोजी येथे शेतकरी न्याय यात्रा काढण्यात आली. मोर्चा निघण्यापूर्वी जाहीर सभा झाली. यावेळी सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, प्रतिभा धानोरकर, आमदार रामदास मसराम, अभिजित वंजारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस सचिव कुणाल चौधरी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. विश्वजित कोवासे, महिला जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर आदी उपस्थित होते. सभेनंतर चंद्रपूर रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

लोह आंदोलन उभे करणार

  • यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मुख्यमंत्री गडचिरोलीचा दौरा व मुक्काम कशासाठी करतात माहीत आहे.
  • इथल्या जमिनी उद्योजकांच्या घशात घालून जंगल उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला जात आहे.
  • सुपीक जमिनी उद्योग, विमानतळासाठी घेतल्या हिसकावून घेतल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. मात्र, याविरुद्ध लोह आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळGadchiroliगडचिरोलीcongressकाँग्रेस