शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

कोरोनासोबत जगणे शिकलो, आता वाघासोबतही जगूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:40 IST

संपूर्ण गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त असल्यामुळे समस्त नागरिकांनी वाघापासून बचावाचा कानमंत्र लक्षात ठेवल्यास हल्ला आणि त्यात बळी जाण्याच्या घटना टाळता ...

संपूर्ण गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त असल्यामुळे समस्त नागरिकांनी वाघापासून बचावाचा कानमंत्र लक्षात ठेवल्यास हल्ला आणि त्यात बळी जाण्याच्या घटना टाळता येणार आहेत. कोणत्या सूचनांचे पालन करावे याची माहिती देणारे जनजागृतीपर पोस्टर वन विभागाने गावागावात लावले आहेत.

जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत १५ पेक्षा जास्त नागरिकांचा वाघांच्या हल्ल्यात बळी जाण्याच्या घटनेने नागरिक धास्तावले आहेत. या हल्ल्यांच्या घटनांवर नजर टाकल्यास बहुतांश हल्ले हे परवानगीशिवाय प्रवेश न करता येणाऱ्या राखीव जंगलात झाल्याचे दिसून येते. कोणत्याही वाघाने गावात किंवा गावाशेजारी येऊन हल्ला केलेला नाही. त्यामुळे या घटनांसाठी काही प्रमाणात मानवीय चुका जबाबदार ठरत आहेत. जंगलात जाणे ही जिल्ह्यातील नागरिकांची अपरिहार्यता असली तरी जंगलात वावरताना काही नियम पाळल्यास वाघांचे हल्ले टाळणे शक्य होणार आहे.

(बॉक्स)

एका वाघाला पकडल्यास दुसरा तयार होईल

मोठे वनक्षेत्र असूनही गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षे वाघांचे अस्तित्व नव्हते. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्यामुळे दोन वर्षांपासून ब्रह्मपुरी भागाकडून काही वाघ गडचिरोली जिल्ह्याकडे वळले आहेत. अनेक वर्षे हिंस्र पशू नसल्यामुळे या जिल्ह्यातील लोक बिनधास्तपणे जंगलात वावरत होते. त्यामुळे वाघांच्या सवयी, स्वभाव याची कल्पना नसल्यामुळे त्याच्या हल्ल्यापासून बचाव कसा करायचा, याची माहिती नागरिकांना नाही; परंतु आता ही माहिती जाणून घेणे गरजेचे झाले आहे. वन विभागाकडून हल्लेखोर वाघाला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न सुरू असले तरी हा कायमस्वरूपी उपाय नाही. दोन वर्षांत वाघांची संख्या वाढल्यामुळे कोणाकोणाला पकडणार? असा प्रश्न वन विभागासमोर निर्माण झाला आहे.

(बॉक्स)

वाघाच्या हल्ल्यांसाठी जबाबदार कोण?

- अनेक नागरिकांनी शेतीचे क्षेत्र वाढवत वनजमिनीवर अतिक्रमण केले आहे. शेतात जाण्यासाठी पूर्वीचा पांदण रस्ताही ठेवला नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना जंगलाच्या वाटेने शेतात जावे लागले. गुरांची चराईसुद्धा जंगलात केली जाते. त्यामुळे वाघांचे हल्ले होत आहेत.

- विशेष म्हणजे वाघाला माणसाच्या रक्ताची चटक लागली, तो माणसांच्या नरडीचा घोट घेतो असे म्हटले जाते ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांनी सांगितले. वाघ केवळ श्वास रोखून मारण्यासाठी मानेला जबड्यात पकडतो. माणसाचे मांस त्याला आवडत नाही. तसे असते तर वाघांनी गावांमध्ये येऊन माणसांवर हल्ले केले असते, असे वन विभागाने स्पष्ट केले.

वाघापासून वाचण्यासाठी अशी घ्या खबरदारी

१) नागरिकांनी उघड्यावर शौचास जाऊ नये.

२) पहाटे व सायंकाळी अंधार पडल्यावर गावाबाहेर, शेतात जाण्याचे टाळावे.

३) जंगलाजवळच्या शेतात एकट्याने काम करू नये.

४) शेतात वाकून किंवा बसून कामे करताना जास्त खबरदारी घ्यावी. उभ्या माणसावर वाघ हल्ला करत नाही.

५) शेतात जाताना हातात काठी, कुऱ्हाड असावी. कामे करताना मोबाइलवरील गाणी किंवा इतर कशाचा आवाज करत राहावा.

६) शेताला काटेरी, साडीचे कुंपन घालावे. बांधावर काटेरी वनस्पतीची लागवड करावी.

कोट

- गडचिरोलीच्या जंगलात आता पूर्वीसारखी बिनधास्तपणे वावरण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. त्यामुळे इतक्या वर्षात आम्हाला काही झाले नाही, आता काय होणार? अशा गैरसमजात कोणीही राहू नये. असे असले तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास हल्ल्यापासून बचाव होऊ शकतो. सर्वांनी हा मुद्दा समजून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.

- डॉ. किशोर मानकर,

वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त