शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी ४० टक्के वसूल

By admin | Updated: January 24, 2015 00:53 IST

एकूण पाणीपट्टीच्या मागणीपैकी २२ जानेवारीपर्यंत ३९ लाख ३८ हजार रूपये पाणीपट्टी वसूल करण्यात आली असून एकूण पाणीपट्टीची मागणी एक कोटी रूपये एवढी आहे.

गडचिरोली : एकूण पाणीपट्टीच्या मागणीपैकी २२ जानेवारीपर्यंत ३९ लाख ३८ हजार रूपये पाणीपट्टी वसूल करण्यात आली असून एकूण पाणीपट्टीची मागणी एक कोटी रूपये एवढी आहे. गडचिरोली शहराला जवळच्या वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पाणी शुद्ध करण्यासाठी शहरानजीक स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध झालेले पाणी नागरिकांना पुरविले जाते. गडचिरोली शहराला नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात एकूण सात पाण्याच्या टाक्या असून ५ हजार ८९२ नळधारक आहेत. अर्धा इंच नळावर नगर परिषद प्रशासन प्रतिवर्ष १ हजार २०० रूपये, पाऊन इंच नळावर २ हजार ३३३ रूपये पाणी कर आकारते. शहरातील एकूण नळधारकांकडून एका वर्षात एक कोटी रूपयांचा पाणी कर गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३९ लाख ३८ हजार रूपये एवढा पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे. नदीतून पाण्याचा उपसा करून सदर पाणी जलशुद्धीकरण केंद्रात टाकले जाते. जलशुद्धीकरण करण्यासाठी आलम, ब्लिचिंग पावडर वापरावे लागते. यासाठी दर दिवशी हजारो रूपये खर्च होतात. त्याचबरोबर हे काम करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात पाच ते सहा कर्मचारी आहेत. यांचे वेतनही द्यावे लागते. शहरात पाणीपुरवठा पाईप फुटल्यास तो दुरूस्त करण्याचा खर्चही नगर परिषदेलाच उचलावा लागतो. यासाठी महिन्याकाठी लाखों रूपये खर्च येतो. हा सर्व खर्च कराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशातून केला जातो. पाणीपट्टी वार्षिक स्वरूपात आकारली जात असल्याने बहुतांश नागरिक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातच सर्वाधिक बिलाचा भरणा करतात. आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत १०० टक्के कर वसूल व्हावा, यासाठी नगर परिषद प्रशासनाचा कर विभाग कामाला लागला आहे. यासाठी स्वतंत्र तीन पथक नेमले असून या पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन कराची वसुली करीत आहेत. त्याचबरोबर नागरिकांना कर भरण्याचे आवाहनदेखील करीत आहेत. मागील वर्षीही नगर परिषदेने १०० टक्के कराची वसुली केली होती. यावर्षी सुद्धा पूर्ण कर वसूल व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. (नगर प्रतिनिधी)