शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

पाणीपट्टी ४० टक्के वसूल

By admin | Updated: January 24, 2015 00:53 IST

एकूण पाणीपट्टीच्या मागणीपैकी २२ जानेवारीपर्यंत ३९ लाख ३८ हजार रूपये पाणीपट्टी वसूल करण्यात आली असून एकूण पाणीपट्टीची मागणी एक कोटी रूपये एवढी आहे.

गडचिरोली : एकूण पाणीपट्टीच्या मागणीपैकी २२ जानेवारीपर्यंत ३९ लाख ३८ हजार रूपये पाणीपट्टी वसूल करण्यात आली असून एकूण पाणीपट्टीची मागणी एक कोटी रूपये एवढी आहे. गडचिरोली शहराला जवळच्या वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पाणी शुद्ध करण्यासाठी शहरानजीक स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध झालेले पाणी नागरिकांना पुरविले जाते. गडचिरोली शहराला नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात एकूण सात पाण्याच्या टाक्या असून ५ हजार ८९२ नळधारक आहेत. अर्धा इंच नळावर नगर परिषद प्रशासन प्रतिवर्ष १ हजार २०० रूपये, पाऊन इंच नळावर २ हजार ३३३ रूपये पाणी कर आकारते. शहरातील एकूण नळधारकांकडून एका वर्षात एक कोटी रूपयांचा पाणी कर गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३९ लाख ३८ हजार रूपये एवढा पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे. नदीतून पाण्याचा उपसा करून सदर पाणी जलशुद्धीकरण केंद्रात टाकले जाते. जलशुद्धीकरण करण्यासाठी आलम, ब्लिचिंग पावडर वापरावे लागते. यासाठी दर दिवशी हजारो रूपये खर्च होतात. त्याचबरोबर हे काम करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात पाच ते सहा कर्मचारी आहेत. यांचे वेतनही द्यावे लागते. शहरात पाणीपुरवठा पाईप फुटल्यास तो दुरूस्त करण्याचा खर्चही नगर परिषदेलाच उचलावा लागतो. यासाठी महिन्याकाठी लाखों रूपये खर्च येतो. हा सर्व खर्च कराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशातून केला जातो. पाणीपट्टी वार्षिक स्वरूपात आकारली जात असल्याने बहुतांश नागरिक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातच सर्वाधिक बिलाचा भरणा करतात. आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत १०० टक्के कर वसूल व्हावा, यासाठी नगर परिषद प्रशासनाचा कर विभाग कामाला लागला आहे. यासाठी स्वतंत्र तीन पथक नेमले असून या पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन कराची वसुली करीत आहेत. त्याचबरोबर नागरिकांना कर भरण्याचे आवाहनदेखील करीत आहेत. मागील वर्षीही नगर परिषदेने १०० टक्के कराची वसुली केली होती. यावर्षी सुद्धा पूर्ण कर वसूल व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. (नगर प्रतिनिधी)