शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

बाटल्यांच्या माध्यमातून रोपांना पाणी

By admin | Updated: January 8, 2016 02:10 IST

पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व घनकचऱ्यामुळे प्रदूषणात वाढत होत आहे. याचे मानवाला मोठे परिणाम भोगावे लागत आहे.

वडसा वन विभागाचा उपक्रम : टाकाऊच्या सदुपयोगातून रोपवनाला नवसंजीवनीदेसाईगंज : पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व घनकचऱ्यामुळे प्रदूषणात वाढत होत आहे. याचे मानवाला मोठे परिणाम भोगावे लागत आहे. या प्रदूषणावर मात करीत पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर रोपवनातील रोपांना पाणी पोहोचविण्यासाठी करून वडसा वन विभागाने रोपवनातील रोपांना नवसंजीवनी दिली आहे. वडसा वन विभागाच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.लग्नकार्य, शासकीय, खासगी कार्यशाळा व इतर समारंभात बिस्लरीतील पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. दिवसेंदिवस बिस्लरीच्या पाण्याचा वापर वाढत चालला आहे. मात्र तहाण भागल्यानंतर रिकाम्या झालेल्या या बॉटल्स इतरत्र कुठेही अस्ताव्यस्त फेकून दिल्या जातात. यामुळे बाटल्यांचा ढीग निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात मृदाप्रदूषण वाढते. अशाप्रकारचे मृदाप्रदूषण होऊ नये, यासाठी वडसा विभागाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. वडसा वन विभागामार्फत कक्ष क्र. ८७० मध्ये एकूण ५० हेक्टर क्षेत्रावर रोपवन तयार करण्यात आले आहे. या रोपवनात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जमिनीची भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे रोपांनाही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वडसा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या या रोपवनात रोपांना पाणी देण्यासाठी पाच हजार रिकाम्या बॉटल्सचा वापर केला आहे. रिकाम्या बॉटलला झाकण असलेल्या बाजुने सुईने छिद्र पाडून सदर बॉटल झाडाच्या तळाशी १० ते १५ सेमी खोल अर्धवट पुरून ठेवण्यात आली आहे. यामुळे बाटल्यांमधील पाणी मुळांना मिळत आहे. झाकण नसलेल्या बॉटलला वरच्या बाजुने कापून खालच्या भागास सुईने दोन बारीक छिद्र करून सदर बॉटल झाडाच्या बुडाशी अर्धवट पुरून टाकण्यात आली आहे. यामुळे पाणीपुरवठ्याची सोय झाली आहे. झाडांची वाढही जोमाने होत आहे. उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमासाठी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी चांदेवार, माडावार, मडावी व वनमजुरांचे सहकार्य लाभत आहे. (वार्ताहर)