शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

बाटल्यांच्या माध्यमातून रोपांना पाणी

By admin | Updated: January 8, 2016 02:10 IST

पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व घनकचऱ्यामुळे प्रदूषणात वाढत होत आहे. याचे मानवाला मोठे परिणाम भोगावे लागत आहे.

वडसा वन विभागाचा उपक्रम : टाकाऊच्या सदुपयोगातून रोपवनाला नवसंजीवनीदेसाईगंज : पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व घनकचऱ्यामुळे प्रदूषणात वाढत होत आहे. याचे मानवाला मोठे परिणाम भोगावे लागत आहे. या प्रदूषणावर मात करीत पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर रोपवनातील रोपांना पाणी पोहोचविण्यासाठी करून वडसा वन विभागाने रोपवनातील रोपांना नवसंजीवनी दिली आहे. वडसा वन विभागाच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.लग्नकार्य, शासकीय, खासगी कार्यशाळा व इतर समारंभात बिस्लरीतील पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. दिवसेंदिवस बिस्लरीच्या पाण्याचा वापर वाढत चालला आहे. मात्र तहाण भागल्यानंतर रिकाम्या झालेल्या या बॉटल्स इतरत्र कुठेही अस्ताव्यस्त फेकून दिल्या जातात. यामुळे बाटल्यांचा ढीग निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात मृदाप्रदूषण वाढते. अशाप्रकारचे मृदाप्रदूषण होऊ नये, यासाठी वडसा विभागाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. वडसा वन विभागामार्फत कक्ष क्र. ८७० मध्ये एकूण ५० हेक्टर क्षेत्रावर रोपवन तयार करण्यात आले आहे. या रोपवनात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जमिनीची भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे रोपांनाही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वडसा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या या रोपवनात रोपांना पाणी देण्यासाठी पाच हजार रिकाम्या बॉटल्सचा वापर केला आहे. रिकाम्या बॉटलला झाकण असलेल्या बाजुने सुईने छिद्र पाडून सदर बॉटल झाडाच्या तळाशी १० ते १५ सेमी खोल अर्धवट पुरून ठेवण्यात आली आहे. यामुळे बाटल्यांमधील पाणी मुळांना मिळत आहे. झाकण नसलेल्या बॉटलला वरच्या बाजुने कापून खालच्या भागास सुईने दोन बारीक छिद्र करून सदर बॉटल झाडाच्या बुडाशी अर्धवट पुरून टाकण्यात आली आहे. यामुळे पाणीपुरवठ्याची सोय झाली आहे. झाडांची वाढही जोमाने होत आहे. उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमासाठी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी चांदेवार, माडावार, मडावी व वनमजुरांचे सहकार्य लाभत आहे. (वार्ताहर)