शहरं
Join us  
Trending Stories
1
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
2
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
3
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
4
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
5
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
6
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
7
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
8
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
9
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
10
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
11
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
12
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
13
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
14
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
15
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
17
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
18
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
19
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
20
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३४५ गावात जलयुक्त शिवार

By admin | Updated: January 20, 2015 00:04 IST

राज्य शासनाने टंचाईग्रस्त व टंचाईसदृश गावांसाठी जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना कार्यान्वित केली आहे. जिल्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा तयार

गडचिरोली : राज्य शासनाने टंचाईग्रस्त व टंचाईसदृश गावांसाठी जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना कार्यान्वित केली आहे. जिल्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा तयार केला असून जिल्ह्यातील ३४५ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सात विभागांद्वारे जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या आराखड्यानुसार अस्तित्वात व मंजूर असलेल्या योजनेंतर्गत बाराही तालुक्यात ३४५ गावांमध्ये एकूण दोन हजार ५१९ जलसाठे निर्मितीचे काम होणार आहे. यामध्ये कृषी विभागाच्या वतीने एक हजार ४५४, वन विभागातर्फे ३५०, पंचायत समितीतर्फे ५९६, जि.प.च्या लघु सिंचन विभागाद्वारे १००, जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत दोन आणि लघु सिंचन विभागातर्फे १५ कामे केली जातील. जलयुक्त शिवार अभियानांतर्गंत ३४५ गावांमध्ये नव्याने तीन हजार १५१ जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये कृषी विभागातर्फे एक हजार ३७४, वन विभागातर्फे एक हजार १२, पंचायत समितीतर्फे ६६०, जि.प. लघु सिंचन विभागातर्फे ७०, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे चार, लघु सिंचन विभागातर्फे २५, लघु पाटबंधारे विभागातर्फे सहा कामे घेण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३४५ गावांत अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांची दुरूस्ती व बळकटीकरण करण्यात येणार आहे. दुरूस्ती व बळकटीकरणाची १७१ कामे घेण्यात येणार आहेत. तिन्ही प्रकारचे मिळून एकूण पाच हजार ८४१ जलसंधारणाची कामे करण्यात येतील. या कामांसाठी सातही विभागांकडे सद्य:स्थितीत १६ हजार ४८.९१ लाखांचा निधी उपलब्ध असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. राज्यात सतत उद्भवणारी पाणी टंचाई विचारात घेऊन ‘सर्वांसाठी पाणी’ टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राज्य शासनाने हाती घेतले आहे. २०१४-१५ मध्ये भूजल पातळीत जास्त घट झालेल्या राज्यातील १८८ तालुक्यातील २ हजार २३४ गावे तसेच शासनाने टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या २२ जिल्ह्यातील १९ हजार ५९ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. भविष्यात राज्याच्या उर्वरित भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यावरही भर दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)