शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

चव्हेला धरणाच्या निर्मितीमुळे वैनगंगेवर पाणी संकट

By admin | Updated: March 29, 2015 01:25 IST

जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील २३ गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत.

गडचिरोली : जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील २३ गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. पाणी पुरवठा योजनेकरिता दररोज ४२ लाख लिटर पाण्याची उचल नदीतूनच होते. याच नदीवर महाराष्ट्र-तेलंगणा सीमेजवळ चव्हेला धरणाचे काम वेगाने सुरू आहे. हे धरण पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्ह्यावर नवे पाणी संकट कोसळण्याची शक्यता आहे. चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्याच्या सिमेवरून वाहणारी वैनगंगा नदी गडचिरोली जिल्ह्यातील २३ गावांसाठी जीवनदायणी ठरली आहे. दररोज या गावातील लाखो नागरिकांना पाणी पाजण्याचे काम वैनगंगा नदीवर अवलंबून असणाऱ्या गावांच्या पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायत व नगर पालिकांमार्फत करीत आहे. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदी देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी या तालुक्यातून जाते. देसाईगंज तालुक्यात आमगाव येथील पाणी पुरवठा योजना ४० हजार लिटर, कुरूड येथे ७५ हजार लिटर, सावंगी येथे ५० हजार लिटर, कोंढाळा येथे ७५ हजार, आरमोरी येथील पाणी पुरवठा योजना १ लाख ४० हजार लिटरची आहे.गडचिरोली तालुक्यातील नगरी पाणी पुरवठा योजना ५० हजार लिटर, पोर्ला पाणी पुरवठा योजना १ लाख ५० हजार लिटर, पुलखल पाणी पुरवठा योजना ५० हजार लिटर, साखरा पाणी पुरवठा योजना ६५ हजार लिटर, पारडीकुपी पाणी पुरवठा योजना ७० हजार लिटर, कोटगल पाणी पुरवठा योजना दीड लाख लिटर, वसा पाणी पुरवठा योजना ७५ हजार लिटर, मुडझा पाणी पुरवठा योजना ७५ हजार लिटर, काटली पाणी पुरवठा योजना ५० हजार लिटरची आहे.हे सर्व पाणी वैनगंगा नदीतूनच घेतले जाते. चामोर्शी तालुक्यातही चामोर्शीची पाणी पुरवठा योजना ६ लाख लिटर, मार्र्कंडा २ लाख लिटर, कुनघाडा ५ लाख ५० हजार लिटर, हळदी माल २० हजार लिटर, आष्टी २ लाख ५० हजार लिटर, गणपूर रै. ७५ हजार लिटर, ठाकरी पाणी पुरवठा योजना ७० हजार लिटर, वाघोली पाणी पुरवठा योजना ६० हजार लिटर, तुकूम पाणी पुरवठा योजना ४० हजार लिटर, लखमापूर बोरी योजना १ लाख लिटरची आहे. या सर्व गावांना मुबलक पाणी पुरवठा करून वैनगंगा नदीवर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या उपसा सिंचन योजना सुध्दा सुरू आहे.चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील ७० ते ८० गावांतील शेतकऱ्यांना या योजनेचा पाणी शेती सिंचनासाठी मिळणार आहे. मात्र तेलंगणा राज्यात चव्हेला धरण झाल्यास वैनगंगा नदीचे पूर्ण पाणी पळविले जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात नदी कोरडी होण्याचे संकट कोसळून पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहे. तेलंगणा सरकार सध्या या धरणासाठी महाराष्ट्राचा सकारात्मक प्रतिसाद मिळावा म्हणून युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकण्याचा काम सुरू आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकार मात्र या धरणाच्या कामाबाबत कुठेही गंभीर असल्याचे चित्र दिसून येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये धरणाविषयी भीतीचे वातावरण आहे.(जिल्हा प्रतिनिधी)वैनगंगा असे देते नळ योजनेला पाणीगडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिकांमध्ये ५० हजार व ३५ हजार लोकसंख्येला पाणी पाजण्याचे काम वैनगंगा नदीवरील पाणी पुरवठा योजना करते. गडचिरोली तालुक्यातील ९ गावाच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना ७ लाख ३५ हजार लिटर पाणी नदीवरूनच दररोज उपलब्ध होत आहे. चामोर्शी तालुक्यातील १० पाणी पुरवठा योजनांंना १९ लाख १२ लिटर पाणी देते.देसाईगंज तालुक्यात ४ गावांना २ लाख ४० हजार लिटर व आरमोरी तालुक्यात १४ लाख लिटर पाणी वैनगंगा दररोज देत आहे.चव्हेला धरणाचे काम प्राणहिता नदी सीमेवरील चपराळा भागात सुरू असल्याने चामोर्शी, अहेरी, सिरोंचा या तीन तालुक्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या भागातील शेतीचे पाणी पळविले जाणार असून पावसाळ्यातही पुराची परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यासाठी बिकट होईल.- रघुनाथ तलांडे, अध्यक्ष, अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती