शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांचे दर कमी होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

हिवाळ्याच्या सुरूवातीला जिल्ह्याच्या विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी दिवाळीपूर्वी व नंतर झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा माल अत्यल्प येऊ लागला आहे.

ठळक मुद्देहिवाळा लागला तरी फरक नाही : सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हिवाळ्याला सुरूवात झाली तरी भाजीपाल्याचे दर फारसे कमी झालेले नाही. येथील आठवडी बाजारात तसेच दैनंदिन गुजरी बाजारात मेथी, वांगी, टमाटे, कोबी आदीसह सर्वच भाज्यांचे दर अजूनही अवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे नियोजन बिघडले आहे.हिवाळ्याच्या सुरूवातीला जिल्ह्याच्या विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी दिवाळीपूर्वी व नंतर झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा माल अत्यल्प येऊ लागला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचा गावठी माल डिसेंबर महिन्यापासून बाजारात येण्यास चांगली सुरूवात होणार आहे. तोपर्यंत ग्राहकांना महागडा भाजीपाला खरेदी करावा लागणार आहे. मेथीची भाजी ६० ते ८० रुपये किलो, टमाटर ३० ते ३५ रुपये किलो, वांगी ३० ते ४० रुपये किलो, फुलकोबी ६० ते ८० रुपये किलो, हिरवी मिरची ४० रुपये किलो, आलू ३० रुपये किलो दराने विकले जात आहेत.आठवडी बाजारापेक्षा गडचिरोलीच्या दैनिक गुजरी बाजारात भाजीपाला व पालेभाज्यांचे दर वाढल्याचे सोमवारी दिसून आले.यावर्षी जून, जुलै महिना वगळता सप्टेंबर ते ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाने सातत्य कायम राखले होते. पावसामुळे भाजीपाला पिकांवर परिणाम झाला. अति पावसामुळे काही ठिकाणचे पीक उद्ध्वस्त झाले. याचा खरीप हंगामाला फटका बसला. अति पावसाचा भाजीपाला पिकाचेही मोठे नुकसान झाले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांचे पिकांचे नियोजन बिघडले आहे. परिणामी आता गडचिरोली शहरात नागपूर व इतर मोठ्या शहरातून भाजीपाल्याची आवक होत आहे. दिवाळीनंतर जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी आपल्या शेतजमिनीतील भाजीपाला गडचिरोली येथील आठवडी बाजार व दैनिक गुजरी बाजारात विक्रीसाठी आणतात असतात. मात्र परतीच्या पावसामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या गावठी भाजीपाल्याची आवक लांबणीवर पडली आहे. परिणामी गडचिरोली शहर व परिसरातील नागरिकांना मोठ्या शहरातून येणाऱ्या भाजीपाल्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.वटाण्याच्या शेंगा महागगतवर्षी दिवाळीनंतर वटाण्याच्या शेंगा ३० ते ४० रुपये किलो दराने विकल्या जात होत्या. मात्र यंदा मोठ्या शहरातून या शेंगांची आवक होत असल्याने भाव वाढतीवर आहे. सद्य:स्थितीत वटाण्याच्या शेंगा ५० ते ६० रुपये किलो दराने विकत आहेत.कांद्याचे भाव चढतीवरचदिवाळीपासून कांद्याचे भाव वाढले असून हे भाव स्थिर आहेत. सद्य:स्थितीत २४ नोव्हेंबर रोजी रविवारी गडचिरोली येथे भरलेल्या आठवडी बाजारात पांढऱ्या रंगाच्या कांद्याचे भाव ८० ते १०० रुपये होते तर गुलाबी कांद्याचे भाव ६० ते ८० रुपये होते. दुपारी उशिरापर्यंत कांद्याचे भाव अनुक्रमे १०० व ८० रुपये होते. सायंकाळी मात्र पांढरे कांदे ८० रुपये किलो तर लाल कांदे ६० रुपये किलो दराने विकले जात होते. कांद्याच्या चढ्या भावाने गृहिणींच्या डोळ्यात गेल्या दीड महिन्यांपासून पाणी येत आहे. आवक वाढल्यानंतरच कांद्याचे भाव घसरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Marketबाजार