शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीत दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:33 IST

धानाचे पऱ्हे रोवणीसाठी तयार झाले आहेत. रोवणीसाठी आता शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. चामोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची लागवड केली जाते.

ठळक मुद्देधान पऱ्हे रोवण्याजोगे झाले : तलाव, बोड्या अजूनही कोरड्याठाक

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : धानाचे पऱ्हे रोवणीसाठी तयार झाले आहेत. रोवणीसाठी आता शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे.चामोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची लागवड केली जाते. त्यातही धान हे मुख्य पीक आहे. काही शेतकरी आवत्या पद्धतीने धानाची लागवड करीत असले तरी सर्वाधिक शेतकरी धानपिकाची रोवणीच करतात. यावर्षी मृगनक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे धानाचे पऱ्हे अगदी वेळेवर टाकण्यात आले. धानाचे पऱ्हे टाकल्याला आता २० दिवसांचा कालावधी उलटत चालला आहे. सदर पऱ्हे आता रोवणीयोग्य झाले आहेत. आद्रा नक्षत्रात अधूनमधून पाऊस येत होता. त्यामुळे पीक हिरवेगार आहे. मात्र धानाची रोवणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असल्याने मोठा पाऊस येणे आवश्यक आहे. ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे. याच नक्षत्रात दरवर्षी रोवणीला सुरुवात होते. त्यामुळे याहीवर्षी या नक्षत्रात पाऊस पडेल, अशी आशा शेतकरीवर्ग करीत आहे. काही धानाच्या पऱ्ह्यांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकरी धानाच्या पऱ्ह्यांवर कीटकनाशकांची फवारणी करीत आहे.धानपिकाला पाणी देण्यासाठी तालुक्यात नदी, तलाव व बोड्या आहेत. मात्र चामोर्शी तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने अजूनही तलाव, बोड्या कोरड्याच पडल्या असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पावसाने पुरेशी सवड दिल्याने आवत्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस