शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

एक हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:31 IST

कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकºयाला ३१ मार्च २०१८ पर्यंत उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही सुरू झाली आहे. १ हजार १८४ शेतकºयांची वीज जोडणीसाठी मागणी आहे.

ठळक मुद्देकेवळ १७१ शेतकऱ्यांना लाभ : डेडलाईन संपूनही उच्च दाबाचा पुरवठा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकºयाला ३१ मार्च २०१८ पर्यंत उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही सुरू झाली आहे. १ हजार १८४ शेतकऱ्यांची वीज जोडणीसाठी मागणी आहे. परंतू वर्षभरात केवळ १७१ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे.आजपर्यंत कृषीपंपांना लघुदाब वाहिनीवरून वीज पुरवठा केला जात होता. मात्र या लाईनवरून वीज पुरवठा गेल्याने व्होल्टेजची गंभीर समस्या निर्माण होत होती. कमी व्होल्टेजमुळे कृषीपंप काम करीत नाही. याबाबत शेतकºयांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे शासनाने मागील वर्षी कृषीपंपांना उच्चदाब वाहिणीद्वारेच वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज वीज जोडणीसाठी प्रलंबित होते. अशा शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वाहिणीद्वारेच पुरवठा केला जाणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या शेतापर्यंत उच्चदाब वाहिणी नेऊन त्याच्या शेतात ट्रान्सफार्मर बसविला जाणार आहे. १०० फुटाच्या आत अंतरावर असलेल्या दुसºया शेतकऱ्याने मागणी केल्यास त्याला संबंधित डीपीवरून वीज पुरवठा दिला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत एका ट्रान्सफार्मरवरून दोन पेक्षा अधिक पंपांना वीज पुरवठा केला जाणार नाही. त्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविले जाणार आहे.राज्य शासनाने घोषणा केल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ३५५ कृषीपंप वीज जोडणीची मागणी आहे. त्यापैकी १७१ कृषीपंप लावण्यात आले आहेत. त्यातील २१ कृषीपंप सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५० ट्रान्सफार्मर लावून १५१ वीज जोडण्या सुरू झाल्या आहेत.एका वीज जोडणीसाठी लाखोंचा खर्चउच्चदाब वाहिनीने कृषीपंपाला वीज पुरवठा करताना शासनाला लाखो रुपयांचा खर्च येतो. ट्रान्सफार्मरची किंमत दोन ते अडीच लाख रुपये एवढी आहे. सोबतच उच्चदाब वाहिनीसुध्दा आणावी लागते. एकंदरीतच एका जोडणीचा खर्च तीन ते चार लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. शेतकऱ्यांसाठी शासन एवढा खर्च करीत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यातून उत्पादन घ्यावे, अशी अपेक्षा आहे. मात्र काही शेतकरी केवळ वीज जोडणीचा लाभ घेईपर्यंत वीज जोडणीसाठी घाई करतात. त्यानंतर मात्र त्यामध्ये कोणतेच उत्पादन काढत नाही, परिणामी शासनाचा लाखोंचा खर्च पाण्यात जातो असे महावितरणचे अधिकारी सांगतात.उच्चदाब वीज जोडणीमुळे कृषीपंपांची व्होल्टेजची समस्या कायमची संपणार आहे. शासनाने निर्णय घेतल्यापासून जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. येत्या सहा महिन्यात उर्वरित सर्व शेतकºयांना उच्चदाब वीज जोडणीचा लाभ देण्यासाठी महावितरण प्रयत्नरत आहे.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण गडचिरोली

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी