शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

एक हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:31 IST

कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकºयाला ३१ मार्च २०१८ पर्यंत उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही सुरू झाली आहे. १ हजार १८४ शेतकºयांची वीज जोडणीसाठी मागणी आहे.

ठळक मुद्देकेवळ १७१ शेतकऱ्यांना लाभ : डेडलाईन संपूनही उच्च दाबाचा पुरवठा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकºयाला ३१ मार्च २०१८ पर्यंत उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही सुरू झाली आहे. १ हजार १८४ शेतकऱ्यांची वीज जोडणीसाठी मागणी आहे. परंतू वर्षभरात केवळ १७१ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे.आजपर्यंत कृषीपंपांना लघुदाब वाहिनीवरून वीज पुरवठा केला जात होता. मात्र या लाईनवरून वीज पुरवठा गेल्याने व्होल्टेजची गंभीर समस्या निर्माण होत होती. कमी व्होल्टेजमुळे कृषीपंप काम करीत नाही. याबाबत शेतकºयांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे शासनाने मागील वर्षी कृषीपंपांना उच्चदाब वाहिणीद्वारेच वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज वीज जोडणीसाठी प्रलंबित होते. अशा शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वाहिणीद्वारेच पुरवठा केला जाणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या शेतापर्यंत उच्चदाब वाहिणी नेऊन त्याच्या शेतात ट्रान्सफार्मर बसविला जाणार आहे. १०० फुटाच्या आत अंतरावर असलेल्या दुसºया शेतकऱ्याने मागणी केल्यास त्याला संबंधित डीपीवरून वीज पुरवठा दिला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत एका ट्रान्सफार्मरवरून दोन पेक्षा अधिक पंपांना वीज पुरवठा केला जाणार नाही. त्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविले जाणार आहे.राज्य शासनाने घोषणा केल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ३५५ कृषीपंप वीज जोडणीची मागणी आहे. त्यापैकी १७१ कृषीपंप लावण्यात आले आहेत. त्यातील २१ कृषीपंप सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५० ट्रान्सफार्मर लावून १५१ वीज जोडण्या सुरू झाल्या आहेत.एका वीज जोडणीसाठी लाखोंचा खर्चउच्चदाब वाहिनीने कृषीपंपाला वीज पुरवठा करताना शासनाला लाखो रुपयांचा खर्च येतो. ट्रान्सफार्मरची किंमत दोन ते अडीच लाख रुपये एवढी आहे. सोबतच उच्चदाब वाहिनीसुध्दा आणावी लागते. एकंदरीतच एका जोडणीचा खर्च तीन ते चार लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. शेतकऱ्यांसाठी शासन एवढा खर्च करीत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यातून उत्पादन घ्यावे, अशी अपेक्षा आहे. मात्र काही शेतकरी केवळ वीज जोडणीचा लाभ घेईपर्यंत वीज जोडणीसाठी घाई करतात. त्यानंतर मात्र त्यामध्ये कोणतेच उत्पादन काढत नाही, परिणामी शासनाचा लाखोंचा खर्च पाण्यात जातो असे महावितरणचे अधिकारी सांगतात.उच्चदाब वीज जोडणीमुळे कृषीपंपांची व्होल्टेजची समस्या कायमची संपणार आहे. शासनाने निर्णय घेतल्यापासून जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. येत्या सहा महिन्यात उर्वरित सर्व शेतकºयांना उच्चदाब वीज जोडणीचा लाभ देण्यासाठी महावितरण प्रयत्नरत आहे.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण गडचिरोली

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी