शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांना ‘पॉस’ मशीनची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 01:20 IST

खतविक्रीतील काळा बाजार रोखण्यासोबतच खत खरेदी व्यवहारात शेतकऱ्यांची लूट होऊ नये,

वेळेवर गोंधळ उडण्याची शक्यता : मशीनच्या माध्यमातून मिळणार खते, बी-बियाणे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : खतविक्रीतील काळा बाजार रोखण्यासोबतच खत खरेदी व्यवहारात शेतकऱ्यांची लूट होऊ नये, या उद्देशाने केंद्र शासनाने नवी योजना देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये १ जून पासून लागू केली आहे. या योजनेनुसार जिल्ह्यातील ५०० कृषी केंद्रांवर पीओएस (पॉस) मशीन उपलब्ध करून दिले जाणार होते. मात्र खरीप हंगामासाठी खते, बि-बियाणे खरेदी करण्याची लगबग सुरू झाली असली तरी अजूनपर्यंत कृषी केंद्रांना पॉस मशीन उपलब्ध झाल्या नाहीत. अधिकाधिक नफा कमविण्याच्या उद्देशाने जिल्ह्याच्या काही भागातील परवानाधारक कृषी केंद्र संचालक गरजेच्या वेळी खताचा साठा करून ठेवतात. त्यानंतर बेभाव खताची विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करतात. गडचिरोली जिल्ह्यात काही वर्षापूर्वी खताच्या काळाबाजाराचे प्रमाण वाढले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात कृषी विभागाच्या धाडसत्रामुळे खताच्या काळाबाजाराला काही प्रमाणात रोख लागला. वेळेवर खत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाला प्राप्त होत होत्या. खताच्या काळा बाजाराला रोख लावण्यासाठी केंद्र शासनाने पीओएस मशीनद्वारे खतविक्री योजना कार्यान्वित केली आहे. शेतकऱ्यांना आधारकार्डावर आता खताची विक्री होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ५०० कृषी सेवा केंद्रावर पीओएस (पार्इंट आॅफ सेल) मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मशीनमधील नोंदीनुसारच खत उत्पादकांना सबसिडी मिळणार आहे. शेतकऱ्यांकडील आधारकार्डच्या आधारावर खत खरेदी करताना नोंद केली जाणार आहे. जेवढ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत परवानाधारक विक्री केंद्रावरून खताची खरेदी केली, तेवढ्याच शेतकऱ्यानुसार खत उत्पादकांना सबसिडी दिली जाणार आहे. आगामी खरीप हंगामासाठी सरकारने ही योजना कार्यान्वित केली आहे. सरकारकडून खत उत्पादकांना सबसिडी दिली जाते. त्याकरिता यावर्षीच्या अर्थसंकल्पात ७० हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत जेवढी खत निर्मिती केली, त्यानुसार सबसिडी दिली जात होती. मात्र याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नव्हता. उत्पादकांकडून विक्री केंद्रांना जेवढे खत वितरित करण्यात आले, त्यानुसार सबसिडी दिली जात होती. मात्र आता जेवढ्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष खताची खरेदी केली आहे, त्यानुसारच खत उत्पादक कंपन्यांना सबसिडी सरकारकडून देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पॉस मशीन अत्यंत आवश्यक आहे. सर्व प्रक्रिया पॉस मशीनच्या माध्यमातूनच पार पाडली जाणार आहे. सदर प्रक्रिया १ जून पासून लागू होणार आहे. तत्पूर्वीच पॉस मशीन उपलब्ध होणे आवश्यक होते. खरीपाच्या हंगामासाठी लागणारे खत खरेदी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. आठ दिवसात खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत पॉस मशीन खत विक्रेत्यांना उपलब्ध होणे आवश्यक होते. मात्र अजूनपर्यंत मशीन उपलब्ध झाली नाही. ऐन वेळेवर सदर मशीन उपलब्ध झाल्यास व त्यामध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास खत विक्रीला विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणीच्या हंगामातच शेतकऱ्यांना खत आवश्यक आहे. मात्र वेळेवर खत मिळाले नाही तर शेतकऱ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. वेळेवर खत मिळाले नाही तर उत्पादनातही कमालीची घट येऊ शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती वेळेपूर्वीच पॉस मशीन उपलब्ध करून देऊन त्या कार्यान्वित करण्याची मागणी जिल्हाभरातील शेतकरी व कृषी केंद्र चालकांकडून होत आहे. कृषी विभागातर्फे पाठपुरावा सुरू वेळेपूर्वी मशीन उपलब्ध होऊन त्या कार्यान्वित होण्यासाठी पॉस मशीन २० मे च्या पूर्वी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर मशीन तत्काळ वितरित करण्यात याव्या यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या मार्फतीने पाठपुरावा केला जात आहे. सदर योजना केंद्र शासनाची आहे. त्यामुळे या संदर्भात केंद्र शासनाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. पॉस मशीन उपलब्ध झाल्यास आजपर्यंत खताच्या विक्रीत होणारा काळाबाजार थांबण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना वाजवी किंमतीत खत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.