शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दामरंचा मार्गावरील तलाव खोलीकरणाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 25, 2016 01:04 IST

गडचिरोली जिल्ह्यातील तलावाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसऱ्या क्रमांकाचा नवीन तलाव दामरंचा मार्गावर आहे.

कालवा लिकेज : २५ हेक्टर क्षेत्र असलेला तिसऱ्या क्रमांकाचा तलावश्रीधर दुग्गीरालापाठी कमलापूरगडचिरोली जिल्ह्यातील तलावाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसऱ्या क्रमांकाचा नवीन तलाव दामरंचा मार्गावर आहे. सदर तलाव २५ हेक्टर क्षेत्रामध्ये व्यापलेला आहे. मात्र गेल्या २७ वर्षांपासून एकदाही या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. तसेच या तलावाचा कालवा अनेक ठिकाणी लिकेज असल्याने येथील पाणी व्यर्थ जात आहे. परिणामी कमलापूर, चिंतलगुडम, कोळसेलगुडम, थिमारगुडम या क्षेत्रातील शेकडो शेतकरी पुरेशा सिंचन सुविधेपासून वंचित आहेत.दामरंचा मार्गावरील या तलावात ३०० ते ४०० हेक्टर शेतीला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा या तलावात आहे. मात्र या तलावाचा कालवा अनेक ठिकाणी लिकेज असल्याने पाणी व्यर्थ जात आहे. या तलावाचे खोलीकरण करणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांना निवेदन करून त्यांच्याकडे वारंवार पाटपुरावा करण्यात आला. मात्र सदर तलावाच्या खोलीकरण व नव्या कालव्याच्या निर्मितीकडे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. कमलापूरवरून ४ किमी अंतरावर असलेले सदर नवीन तलाव हे पर्यटनस्थळसुद्धा बनलेले आहे. येथे वन विभागाचे हत्ती कॅम्प आहे. तसेच सभोवताल पहाडी व निसर्गरम्य वातावरण तसेच नागमाता मंदिरही आहे. त्यामुळे शासनाने सदर स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळेल. उपसा सिंचन योजनेतून दामरंचा नजीकच्या नदीतील पाणी या तलावात सोडण्यात यावे, यातून मोठी शेती सिंचन सुविधा निर्माण होऊ शकते. सदर तलावाच्या खोलीकरणासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींचा कानाडोळानिवडणुकीच्या वेळी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेते दामरंचा गावात येऊन नागरिकांना सदर तलावाचे खोलीकरण करण्यात येईल, तसेच नवीन कालवा तयार करण्यात येईल, असे आश्वासन देतात. मात्र निवडून आलेल्या एकाही लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत या तलावाच्या दुरूस्तीच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रचंड नाराज आहेत.