शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मदतीची प्रतीक्षाच

By admin | Updated: January 3, 2017 00:49 IST

सन २०१६ च्या पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली.

निधीचा अभाव : आपातग्रस्तांना ४४ लाखांची मदत बाकी गडचिरोली : सन २०१६ च्या पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली. जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली तसेच काही व्यक्ती जखमीही झाले. अशा आपद्ग्रस्त नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत १ कोटी १२ लाख ६५ हजार ९९० रूपयांची मदत आपद्ग्रस्तांना दिली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील अनेक आपातग्रस्तांना ४४ लाख ९४ हजार ४९५ रूपयांची मदत देणे बाकी आहे. राज्य शासनाकडून मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात न आल्याने अनेक आपद्ग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात तीन ते चारदा अतिवृष्टी झाली. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नद्या, नाल्यांना पूर आला. तलावही तुडूंब भरल्याने नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण १६ व्यक्तींचा मृत्यू झाला. तर १७ इसम जखमी झाले. १६ मृतकांच्या कुटुंबीयांना ६४ लाख व १७ जखमींना ९८ हजार ३०० रूपयांची मदत देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्हाभरात एकूण ७८, मोठी जनावरे दगावली. संबंधित जनावर मालकांना नुकसानीच्या आकडेवारीनुसार १७ लाख ७२ हजार रूपयांची मदत जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे २ हजार ७९८ घरांची अंशत: तर आठ घरांची पूर्णत: पडझड झाली. अंशत: पडझड झालेल्या सर्व घर मालकांचे ६९ लाख ७८ हजार ५३५ रूपयांचे नुकसान झाले. तर घराची पूर्णत: पडझड झालेल्या आठ कुटुंबधारकांचे ५८ हजार ९०० रूपयांचे नुकसान झाले. यापैकी प्रशासनाने आतापर्यंत घरांची अंशत: पडझड झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना २६ लाख ४४ हजार १४० रूपयांची मदत दिली. तसेच घराची पूर्णत: पडझड झालेल्या चार आपद्ग्रस्तांना २० हजार ८०० रूपयांची मदत दिली. नैसर्गिक आपत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जनावरांच्या १३५ गोठ्यांची पडझड झाली. यामुळे २ लाख २२ हजार ७५० रूपयांचे नुकसान संबंधित जनावर मालकांचे झाले. यापैकी ५० गोठ्यांच्या नुकसानीबाबत संबंधित आपद्ग्रस्तांना १ लाख ७५० रूपयांची मदत देण्यात आली. मात्र अद्यापही अनेक पशुपालक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी) दीड हजारावर आपातग्रस्त अडचणीत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची अशंत: पडझड झाली तर काही घरांची पूर्णत: पडझड झाली. जनावरांच्या गोठ्यांचीही पडझड झाली. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र अद्यापही घरांची अंशत: पडझड झालेल्या १ हजार ५१४, पूर्णत: पडझड झालेल्या ४ व गोठ्यांची पडझड झालेल्या ८५ अशा एकूण दीड हजारावर आपातग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही. हे सर्व जण तहसील कार्यालयात जाऊन मदतीच्या रकमेबाबत विचारणा करीत आहेत. अडीच महिने उलटले नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या आपातग्रस्तांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त झाला होता. मात्र सदर निधी सप्टेंबरअखेर संपला. त्यानंतर राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला निधी मिळाला नाही. अडीच महिन्यांपासून मदतीच्या निधीचा अभाव आहे.