शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

येडसिलीला विकासाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

हे गाव विकासापासून वंचित आहे. वीज, पक्के रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून वंचित आहे. झिंगानूर परिसरात असलेले येडसिली गाव घनदाट जंगलात आहे. या गावाच्या बाजूंनी डोंगर आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २०० च्या आसपास गावातील लोकसंख्या आहे. शेती व्यवसाय केवळ पावसाळ्यात केला जातो. त्यानंतर वर्षभर नागरिक रोजगाराच्या शोधात तेलंगणा राज्यात जातात.

ठळक मुद्देपक्क्या रस्त्यांची गरज : आरोग्य, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा अभाव

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या येडसिली गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही. हे गाव विकासापासून वंचित आहे. वीज, पक्के रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून वंचित आहे.झिंगानूर परिसरात असलेले येडसिली गाव घनदाट जंगलात आहे. या गावाच्या बाजूंनी डोंगर आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २०० च्या आसपास गावातील लोकसंख्या आहे. शेती व्यवसाय केवळ पावसाळ्यात केला जातो. त्यानंतर वर्षभर नागरिक रोजगाराच्या शोधात तेलंगणा राज्यात जातात. गावात नागरिकांसाठी तीन बोअरवेल आहेत. मोजक्याच घरांमध्ये विहिरी आहेत. येथे वीज पुरवठा करण्यात आला आहे. परंतु वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गावातील नागरिकांना आरोग्यविषयक उपचार करण्याकरिता झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. पावसाळ्यात आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण होते. या काळात तब्बेत बिघडल्यानंतर नागरिकांना बैलबंडीवर अथवा कावड करून आरोग्य केंद्रात न्यावे लागते. दळणवळणांच्या साधनांचा अभाव असल्याने नागरिकांना नेहमीच पायपीट करावी लागते.मोजक्याच लोकांकडे दुचाकी वाहने आहेत. त्यामुळे नागरिकांना आवागमन करण्यासाठी दुसºयावरच अवलंबून राहावे लागते. या गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असतानाही सिंचनाच्या सोयीअभावी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. विशेष म्हणजे सिंचनाच्या सोयीसाठी गावात एक तलाव खोदण्यात आला होता. परंतु येथील पाणी साठवणूक क्षमता अत्यंत कमी असल्याने तलाव कुचकामी ठरत आहे. येथील नागरिकांना गरजा पूर्ण करण्याकरिता झिंगानूर गावावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु झिंगानूर ते येडसिलीपर्यंतचे अंतर ८ किमी असल्याने व सदर मार्ग अत्यंत दूरवस्थेत असल्याने नागरिकांना येथून आवागमन करताना कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे ३० ते ४० वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या रस्त्याचे पक्के बांधकाम अद्यापही झाले नाही. कच्च्या रस्त्यानेच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे.बसफेरी सुरू करायेडसिली भागात ३० ते ३५ वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाची बससेवा होती. परंतु या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाल्याने बसफेरी बंद करण्यात आली. तेव्हापासून या मार्गावरील बसफेरी बंदच आहे. नागरिकांना झिंगानूर तसेच जिमलगट्टा येथे विविध कामानिमित्त सायकल तसेच बैलगाडीने ये-जा करावी लागते. पावसाळ्यात या मार्गाने वाहने जाऊ शकत नाही.