शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

येडसिलीला विकासाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

हे गाव विकासापासून वंचित आहे. वीज, पक्के रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून वंचित आहे. झिंगानूर परिसरात असलेले येडसिली गाव घनदाट जंगलात आहे. या गावाच्या बाजूंनी डोंगर आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २०० च्या आसपास गावातील लोकसंख्या आहे. शेती व्यवसाय केवळ पावसाळ्यात केला जातो. त्यानंतर वर्षभर नागरिक रोजगाराच्या शोधात तेलंगणा राज्यात जातात.

ठळक मुद्देपक्क्या रस्त्यांची गरज : आरोग्य, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा अभाव

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या येडसिली गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही. हे गाव विकासापासून वंचित आहे. वीज, पक्के रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून वंचित आहे.झिंगानूर परिसरात असलेले येडसिली गाव घनदाट जंगलात आहे. या गावाच्या बाजूंनी डोंगर आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २०० च्या आसपास गावातील लोकसंख्या आहे. शेती व्यवसाय केवळ पावसाळ्यात केला जातो. त्यानंतर वर्षभर नागरिक रोजगाराच्या शोधात तेलंगणा राज्यात जातात. गावात नागरिकांसाठी तीन बोअरवेल आहेत. मोजक्याच घरांमध्ये विहिरी आहेत. येथे वीज पुरवठा करण्यात आला आहे. परंतु वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गावातील नागरिकांना आरोग्यविषयक उपचार करण्याकरिता झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. पावसाळ्यात आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण होते. या काळात तब्बेत बिघडल्यानंतर नागरिकांना बैलबंडीवर अथवा कावड करून आरोग्य केंद्रात न्यावे लागते. दळणवळणांच्या साधनांचा अभाव असल्याने नागरिकांना नेहमीच पायपीट करावी लागते.मोजक्याच लोकांकडे दुचाकी वाहने आहेत. त्यामुळे नागरिकांना आवागमन करण्यासाठी दुसºयावरच अवलंबून राहावे लागते. या गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असतानाही सिंचनाच्या सोयीअभावी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. विशेष म्हणजे सिंचनाच्या सोयीसाठी गावात एक तलाव खोदण्यात आला होता. परंतु येथील पाणी साठवणूक क्षमता अत्यंत कमी असल्याने तलाव कुचकामी ठरत आहे. येथील नागरिकांना गरजा पूर्ण करण्याकरिता झिंगानूर गावावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु झिंगानूर ते येडसिलीपर्यंतचे अंतर ८ किमी असल्याने व सदर मार्ग अत्यंत दूरवस्थेत असल्याने नागरिकांना येथून आवागमन करताना कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे ३० ते ४० वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या रस्त्याचे पक्के बांधकाम अद्यापही झाले नाही. कच्च्या रस्त्यानेच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे.बसफेरी सुरू करायेडसिली भागात ३० ते ३५ वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाची बससेवा होती. परंतु या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाल्याने बसफेरी बंद करण्यात आली. तेव्हापासून या मार्गावरील बसफेरी बंदच आहे. नागरिकांना झिंगानूर तसेच जिमलगट्टा येथे विविध कामानिमित्त सायकल तसेच बैलगाडीने ये-जा करावी लागते. पावसाळ्यात या मार्गाने वाहने जाऊ शकत नाही.