शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
3
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
4
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
5
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
6
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
7
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
8
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
9
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
10
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
11
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
12
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
13
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
14
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
15
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
16
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
17
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
18
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
20
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता संकलनाच्या प्रतिक्षेत

By admin | Updated: May 11, 2014 23:38 IST

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील नागरिकांना वर्षभराची आर्थिक मिळकत मिळवून देणारा तेंदूपत्ता हंगाम कधी सुरू होतो

मानापूर-देलनवाडी/अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील नागरिकांना वर्षभराची आर्थिक मिळकत मिळवून देणारा तेंदूपत्ता हंगाम कधी सुरू होतो याची प्रतीक्षा जिल्ह्यातील वडसा व अहेरी वनविभागातील गावामधील नागरिकांना लागली आहे. आरमोरी तालुक्यातील नागरवाही, देलनवाडी परिसरातील मजूर अजुनही तेंदूपत्ता हंगामाच्या प्रतीक्षेत आहेत. या परिसरात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाची सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. अतिशय कमी शेतकर्‍यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड शेतात केली. परंतु २ मे च्या मध्यरात्री आलेल्या वादळी पावसामुळे उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी तेंदू हंगामाची वाट पाहत आहे. तेंदू हंगामातून शेतकरी खरीप पिकाचे आर्थिक बजेट मांडत असतो. तेंदूपत्त्याच्या मिळकतीतूनच शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खत व अन्य साहित्ये खरेदी करीत असतो. मानापूरलगत असलेल्या पिसेवडधा येथे तेंदूपत्ता संकलनाला सुरूवात झाली आहे. परंतु नदी पलीकडे असलेल्या मानापूर येथे तेंदूपत्ता हंगामाला अजुनपर्यंत सुरूवात झाली नाही. मे महिन्यातील अर्धा कालावधी लोटला असतांनाही दरवर्षी होणारे रोजगार हमीचे कामे यंदा सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील मजुरांच्या हाताला काम न मिळाल्याने मजूर प्रशासनाप्रती उदासीन आहेत. अनेक शेतकरी मजुरीच्या प्रतीक्षेत असतांनाच बोदभरतीसाठी बाहेरील जिल्ह्यात जात आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शेती हंगामाला अधिक जोर येत असल्याने सध्या बेरोजगार असलेल्या शेतकर्‍यांना तेंदूपत्ता हंगामाचे वेध लागले आहे. त्यामुळे मानापूर, देलनवाडी परिसरातील गावामध्ये तेंदूपत्ता हंगामाला त्वरित सुरूवात करावी, अशी मागणी मजुरांकडून होत आहे. तेंदू युनिट सुरू करण्याची युवक काँग्रेसची मागणी आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या तिनही वनविभागातील तेंदूपत्ता युनिटची अजुनपर्यंत विक्री न झाल्याने तेंदूपत्ता हंगाम सुरू करण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे तिनही वनविभागात असलेल्या तेंदूपत्ता मजूर तेंदूपत्ता हंगामाच्या प्रतीक्षेत आहेत. अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आदिवासी नागरिकांना तेंदूपत्ता हंगामामुळे रोजगार मिळत असतो. दुर्गम भागात तेंदूपत्ता हंगाम पैसे मिळवून देणारा एकमेव हंगाम म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या वनविभागात त्वरित युनिटची विक्री करून तेंदूपत्ता हंगामाला सुरूवात करावी, अशी मागणी अहेरी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बालाजी गावडे यांनी केली आहे. तेंदूपत्ता युनिटची विक्री न झाल्याने तेंदूपत्ता कटाईला सुरूवात अजुनही करण्यात आली नाही. त्यामुळे तेंदू हंगामाला अधिक विलंब होत आहे. जिल्ह्याच्या नागरिकांचे अर्थकारण तेंदूहंगामावरच अवलंबून आहे. तेंदू हंगाम उशिरा सुरू झाल्यास शेतीचे कामे व तेंदूपत्ता संकलन एकत्रितच येते. त्यामुळे मजुरांना अडचण होते. त्यामुळे हंगाम सुरू होणे गरजेचे आहे. (लोकमत वृत्त सेवा)