शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

चिखलातून काढावी लागते वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:39 IST

गावात ग्रामपंचायत प्रशासन असतानाही येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे पक्का रस्ता निर्माण करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देतिमरमवासीयांना त्रास : मागील चार वर्षांपासून पावसाळ्यात आवागमनास अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या तिमरम येथे मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना एकफुट चिखलातूनच वाट काढावी लागते. त्यामुळे या त्रासापासून नागरिकांची मुक्तता केव्हा होणार असा सवाल नागरिक करीत आहेत.अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील गाव म्हणून तिमरमची ओळख आहे. गावात ग्रामपंचायत प्रशासन असतानाही येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे पक्का रस्ता निर्माण करण्याची गरज आहे. नागरिकांनी यासाठी वारंवार स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींना साकडे घातले. परंतु काहीच उपयोग झाला नाही. ही समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप तिमरमवासीयांनी केला आहे. सध्या गावातील नागरिकांना आवागमन करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. एक ते दीडफुट चिखल रस्त्यावर निर्माण झाला आहे. येथूनच नागरिक शेताकडे जात असतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून येथील रस्त्यावर खडीकरण करावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.सरपंच म्हणतात, रोहयोतून होणार कामतिमरम येथील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. याच मार्गावर लोकवस्तीही आहे. शिवाय नागरिक येथूनच शेताकडे आवागमन करतात. या रस्त्याचे खडीकरण तसेच मजबुतीकरणाबाबत सरपंच महेश मडावी यांना विचारणा केली असता, सदर रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून केले जाणार आहे, असे सांगितले. परंतु मागील चार ते पाच वर्षांपासून या मार्गावर चिखल निर्माण होत असल्याने नागरिकांना ही समस्या असय्य झाली आहे. त्यामुळे नागरिकही त्रासले आहेत. त्यांना पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक