शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेचा जलस्तर आणखी तीन फुटाने घटला

By admin | Updated: March 27, 2016 01:14 IST

अत्यल्प प्रमाणात झालेला पाऊस, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात अडविण्यात येणारे पाणी व वाढलेल्या पाणी पुरवठा योजना यामुळे .....

जलसंकट तीव्र होणार : अनेक नळ योजना प्रभावित होण्याच्या मार्गावर गडचिरोली : अत्यल्प प्रमाणात झालेला पाऊस, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात अडविण्यात येणारे पाणी व वाढलेल्या पाणी पुरवठा योजना यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर जानेवारी महिन्यात तब्बल दोन फुटाने घटला होता. आता होळीनंतर मार्च महिन्यात वैनगंगा नदीचा जलस्तर तीन फुटाने घटला आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत असल्याने या नदीवर अवलंबून असलेल्या अनेक पाणी योजना उन्हाळ्यात प्रभावित होणार आहेत. स्थानिक नगर पालिका प्रशासनाने वैनगंगा नदीवर नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. या नळ योजनेतील इन्टेकव्हेल व जॅकेवेलमध्ये गाळ साचल्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. याशिवाय वैनगंगा नदीचा जलस्तर घटल्यामुळे गडचिरोली शहरवासीयांना १०० टक्के पाणी पुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून होताना दिसून येत नाही. या पाणी समस्येवर उपाययोजना म्हणून पालिकेच्या वतीने नळ योजनेच्या इन्टेकवेल व जॅकवेलमधील गाळ स्वच्छ करून पोकलँड मशीनने नदीपात्र खोल करणे तसेच या विहिरीजवळ रिकाम्या सिमेंट पिशव्यांमध्ये रेती भरून बंधारा बांधणे या कामासाठीची लिलाव प्रक्रिया राबवून सदर काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर काम अद्यापही अपूर्ण आहे. गडचिरोली शहरातील पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी १५ मार्च रोजी वैनगंगा नदीवर स्थित विहीर स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बंधारा बांधण्याचे निर्देश पालिकेच्या अभियंत्यांना व कर्मचाऱ्यांना दिले. आठ दिवसांत गडचिरोली शहरातील पाणी समस्या मार्गी लागणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र १० दिवसानंतरही या वैनगंगा नदी पात्रात विहिरीलगत बंधारा बांधण्यात आला नाही. त्यामुळे गडचिरोली शहरात पुन्हा जलसंकट तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)चढ भागातील नळधारक कुटुंबीयांची पंचाईतवैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे तसेच पाणी योजनेच्या जॅकवेल व इन्टेकवेलमध्ये गाळ साचल्यामुळे पालिकेच्या वतीने जानेवारी महिन्यापासून शहरात दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. सखल भागातील नळधारकांना पुरेसे पाणी मिळत आहे. मात्र चढ भागातील नळाला मुळीच पाणी येत नसल्याने अनेक कुटुंबियांची पाण्यासाठी पंचाईत होत आहे. शेजारील विहीर व हातपंपाचे पाणी आणावे लागत आहे.