शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वैनगंगेचा जलस्तर आणखी तीन फुटाने घटला

By admin | Updated: March 27, 2016 01:14 IST

अत्यल्प प्रमाणात झालेला पाऊस, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात अडविण्यात येणारे पाणी व वाढलेल्या पाणी पुरवठा योजना यामुळे .....

जलसंकट तीव्र होणार : अनेक नळ योजना प्रभावित होण्याच्या मार्गावर गडचिरोली : अत्यल्प प्रमाणात झालेला पाऊस, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात अडविण्यात येणारे पाणी व वाढलेल्या पाणी पुरवठा योजना यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर जानेवारी महिन्यात तब्बल दोन फुटाने घटला होता. आता होळीनंतर मार्च महिन्यात वैनगंगा नदीचा जलस्तर तीन फुटाने घटला आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत असल्याने या नदीवर अवलंबून असलेल्या अनेक पाणी योजना उन्हाळ्यात प्रभावित होणार आहेत. स्थानिक नगर पालिका प्रशासनाने वैनगंगा नदीवर नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. या नळ योजनेतील इन्टेकव्हेल व जॅकेवेलमध्ये गाळ साचल्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. याशिवाय वैनगंगा नदीचा जलस्तर घटल्यामुळे गडचिरोली शहरवासीयांना १०० टक्के पाणी पुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून होताना दिसून येत नाही. या पाणी समस्येवर उपाययोजना म्हणून पालिकेच्या वतीने नळ योजनेच्या इन्टेकवेल व जॅकवेलमधील गाळ स्वच्छ करून पोकलँड मशीनने नदीपात्र खोल करणे तसेच या विहिरीजवळ रिकाम्या सिमेंट पिशव्यांमध्ये रेती भरून बंधारा बांधणे या कामासाठीची लिलाव प्रक्रिया राबवून सदर काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर काम अद्यापही अपूर्ण आहे. गडचिरोली शहरातील पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी १५ मार्च रोजी वैनगंगा नदीवर स्थित विहीर स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बंधारा बांधण्याचे निर्देश पालिकेच्या अभियंत्यांना व कर्मचाऱ्यांना दिले. आठ दिवसांत गडचिरोली शहरातील पाणी समस्या मार्गी लागणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र १० दिवसानंतरही या वैनगंगा नदी पात्रात विहिरीलगत बंधारा बांधण्यात आला नाही. त्यामुळे गडचिरोली शहरात पुन्हा जलसंकट तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)चढ भागातील नळधारक कुटुंबीयांची पंचाईतवैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे तसेच पाणी योजनेच्या जॅकवेल व इन्टेकवेलमध्ये गाळ साचल्यामुळे पालिकेच्या वतीने जानेवारी महिन्यापासून शहरात दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. सखल भागातील नळधारकांना पुरेसे पाणी मिळत आहे. मात्र चढ भागातील नळाला मुळीच पाणी येत नसल्याने अनेक कुटुंबियांची पाण्यासाठी पंचाईत होत आहे. शेजारील विहीर व हातपंपाचे पाणी आणावे लागत आहे.