शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वैनगंगा आटली, जलसंकट होणार तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:32 IST

गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी अतिशय घटली आहे. मार्च महिन्यातच वैनगंगा नदी कोरडी पडल्यालगतचे चित्र निर्माण झाले आहे. कडक उन्हाळ्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देकाटकसरीने पाणी वापरा : नदीतील विहिरीचा एक व्हॉल्व पडला उघडा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी अतिशय घटली आहे. मार्च महिन्यातच वैनगंगा नदी कोरडी पडल्यालगतचे चित्र निर्माण झाले आहे. कडक उन्हाळ्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नदी पात्रात असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला दोन वॉल्व देण्यात आले आहेत. त्यापैकी एक वॉल्व पूर्णपणे पाण्याच्या बाहेर आला आहे. तर केवळ एक वॉल्व पाण्यामध्ये आहे. एक महिन्यापूर्वीच पाणी पातळी कमी झाली होती. नगर परिषदेने जेसीबीच्या सहाय्याने पार बांधून विहिरीच्या बाजुने धार वळविली होती. विहिरीजवळ सुध्दा एक पार बांधून पाणी अडवून ठेवले. मात्र पाणी पातळी कमी झाल्याने केवळ एकाच वॉल्व मधून पाणी पुरवठा होत आहे. पंपाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या भरणे अशक्य झाले आहे.मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यात पाणी संकट तीव्र होणार आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात पाणी पुरत नसल्याने काही दिवस कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जात होता. तीच स्थिती यावर्षीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. उन्हाळ्यात पुन्हा पाणी पातळी घटणार आहे. त्यामुळे शहराला पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.- मुक्तेश्वर काटवे,पाणी पुरवठा सभापती,नगर परिषद गडचिरोली

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीटंचाई