शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वैनगंगा आटली, जलसंकट होणार तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:32 IST

गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी अतिशय घटली आहे. मार्च महिन्यातच वैनगंगा नदी कोरडी पडल्यालगतचे चित्र निर्माण झाले आहे. कडक उन्हाळ्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देकाटकसरीने पाणी वापरा : नदीतील विहिरीचा एक व्हॉल्व पडला उघडा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी अतिशय घटली आहे. मार्च महिन्यातच वैनगंगा नदी कोरडी पडल्यालगतचे चित्र निर्माण झाले आहे. कडक उन्हाळ्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नदी पात्रात असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला दोन वॉल्व देण्यात आले आहेत. त्यापैकी एक वॉल्व पूर्णपणे पाण्याच्या बाहेर आला आहे. तर केवळ एक वॉल्व पाण्यामध्ये आहे. एक महिन्यापूर्वीच पाणी पातळी कमी झाली होती. नगर परिषदेने जेसीबीच्या सहाय्याने पार बांधून विहिरीच्या बाजुने धार वळविली होती. विहिरीजवळ सुध्दा एक पार बांधून पाणी अडवून ठेवले. मात्र पाणी पातळी कमी झाल्याने केवळ एकाच वॉल्व मधून पाणी पुरवठा होत आहे. पंपाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या भरणे अशक्य झाले आहे.मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यात पाणी संकट तीव्र होणार आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात पाणी पुरत नसल्याने काही दिवस कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जात होता. तीच स्थिती यावर्षीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. उन्हाळ्यात पुन्हा पाणी पातळी घटणार आहे. त्यामुळे शहराला पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.- मुक्तेश्वर काटवे,पाणी पुरवठा सभापती,नगर परिषद गडचिरोली

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीटंचाई