शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

पाच महिन्यांपासून वेतन थकले

By admin | Updated: May 3, 2015 01:10 IST

ग्रामीण भागात अंगणवाडी कर्मचारी नियमित सेवा बजावत आहेत. मात्र त्यांना अल्पश: मानधन देऊन त्यांची बोळवण केली जात आहे.

सिरोंचा/अहेरी : ग्रामीण भागात अंगणवाडी कर्मचारी नियमित सेवा बजावत आहेत. मात्र त्यांना अल्पश: मानधन देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. केंद्र व राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेकडो आश्वासने जनतेला दिली. मात्र त्यांची पूर्तता अद्यापही झाली नाही. जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन मागील पाच महिन्यांपासून अडले आहे. त्यामुळे त्वरित निकाली काढावे, अशी मागणी सिरोंचा, अहेरी येथील मेळाव्यात कर्मचाऱ्यांनी केली.सिरोंचा येथे पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नागुबाई मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे, डी. एस. वैद्य, यशोदा दुर्गे उपस्थित होत्या. तेलंगणा राज्यात अंगणवाडी महिलांच्या मानधनात सरकारने वाढ केली. राज्य शासनाच्या वतीने त्यांना साडेचार हजार रूपये देण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्रात दोन हजार रूपयेही मानधन देण्यास शासन हतबल आहे, असे प्रतिपादन सुमन तोकलावार यांनी केले. सरकारने काळा पैसा तर आणला नाहीच, शिवाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही अन्यायपूर्ण वागणूक दिली आहे, असे प्रतिपादन दहिवाडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार पुष्पा बैलवार यांनी मानले. खैकुन शेख, शफिया सय्यद, मुक्ता कोंडी, शोभा गोर्लावार, मंगला रोडावार, सविता ओल्लालवार, जीजाबाई गुरनुले, सुनंदा पुजारी, चंद्रा रंगारी यांनी सहकार्य केले.अहेरी प्रकल्पातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी सी-टू संघटनेच्या नेतृत्त्वात बालविकास प्रकल्प अधिकारी रत्नमाला मेश्राम यांना निवेदन दिले. सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ द्यावा, थकीत टीए, इंधन बिल त्वरित द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता. शासनाकडून निधी प्राप्त होताच बिल दिले जाईल, असे आश्वासन मेश्राम यांनी दिले. निवेदन देताना रमेशचंद्र दहिवडे, मंगला मोहुर्ले, डी. एस. वैद्य, विठाबाई भट, एनप्रेड्डीवार, येनगंटीवार, वडलाकोंडावार, दुर्गे हजर होत्या. (तालुका प्रतिनिधी)